Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

नोटांवरील चित्र आणि बरेच काही

 


मित्रांनो, 

नोटांवरील चित्र आणि बरेच काही  :-

            आज काल देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी सुचवायचे आणि मग  त्याला इतरांनी विरोध करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे  चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या नोटांवरचे महात्मा गांधी यांचे  चित्र बघून देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय बोलावे.        

            काही वर्षापूर्वी पोस्टाच्या तिकिटे महापुरुषांच्या नांवे छापण्यावर राजकारण करून झाले.पोस्टाच्या तिकिटावर कुणाचे का चित्र असेना.त्याने  सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही.पण तरी आपल्या पक्षाचे सरकार आले की,लगेच आपल्या नेत्याचे चित्र असलेले तिकीट छापायचे असे रूढ झाले होते.मग काही लोक असे म्हणत विरोध करु लागले की ते तिकीट त्याचे काम झाले की कचऱ्यात दिसते आणि त्या महापुरुषांचाचा/ नेत्यांचा अपमान होतो. म्हणून कुणाचा फोटो छापायला नको, हे सुद्धा झाले.काही वर्षांनी हे सर्व विस्मरणात गेले.

            आज खरे तर रुपयांचे अवमूल्यन होतं आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आहे.म्हणून एका बाजूला  ओरड चालू आहे.रुपयाचे अवमूल्यन रुपया मजबूत झाला की किंवा डॉलरची घसरण झाली तर थांबेल ही.पण  पैशाची क्रयशक्ती कमी होत चालली आहे.ती वाढणे केवळ अशक्य. आज रु.100/- ची नोट बाजारात घेऊन गेलो,  की एखाद्या छोट्याशा पिशवीत मावेल एवढे तरी सामान येते कां हो? त्या अर्थी जे पैश्याचे मूल्य कमी झाले आहे.आता त्या नोटेवर महापुरुषांचे चित्र छापून,त्या महापुरुषांचे अवमूल्यन करू नका. एवढीच विनंती करावीशी वाटते.कारण नोटांवर ह्या महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्या महापुरुषांचे विचार, आपल्या मनावर कोरले जावेत ह्यासाठी काही करायची आवश्यकता आहे. महापुरुषांचे नुसते गोडवे गाण्यापेक्षा,त्यांचे आचरण प्रत्यक्ष नेत्यांनी करून लोकांपुढे आदर्श निर्माण करायला हवा. देशात महापुरुषांचे इतके पुतळे उभारले आहेत, पण त्या पुतळ्याकडे बघून,कुणी बोध घेतल्याचे काही बघायला मिळत नाही.त्यामुळे नोटांवर महापुरुषांचे फोटो छापून काही साध्य होईल असे मला तरी वाटत नाही. आपल्या काय वाटते हे ह्या ब्लॉगवर कोमेंट्स बॉक्समधे लिहा आणि आपले विचार व्यक्त करा.

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे,   

Comments

  1. नोटांवर महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्यांचे विचार मनावर कोरणे व त्याप्रमाणे आचरण करणे हा आपला विचार खरोखरच अनुकरणीय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...