Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

इस्त्रीचे कपडे की चेहरा



                    इस्त्रीच्या कपड्यावरुन आठवले. आज बहुधा निवृत्तीनंतर पहिल्यांदाच ज्याला फॉर्मल म्हटले जाते ते म्हणजे शर्ट आणि टेरीकॉटची पॅन्ट घालून गेलो असेन. निमित्त होतं, दोन सत्कार सोहोळयांचे.माझा लेखक म्हणून सर्वात आधी सत्कार झाला तो 14 डिसेंबर 2021 ला बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, कोल्हापूरच्या हॉलमधे. झोनल मॅनेजर श्री. हेमंत खेर सर यांच्या  शुभ हस्ते हा सत्कार आणि माझ्या "होस्ट इज घोस्ट" ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन  संपन्न झाले.त्याचा आनंद, मित्रांनो,काही वेगळाच होता.गेल्या 38 वर्षे एक कुटुंब समजून मी ज्या बँक ऑफ इंडियामधे होतो. त्या माझ्या लोकांनी , घरच्या लोकांनी केलेला सत्कार मला रोमांचित करून गेला. 
                   बरोबर 10 महिन्यांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर,2022 ला वाकड,पुणे येथील शब्दा बुक्स आणि लायब्ररीने कस्पटे सभागृहात  "साहित्यातील योगदाना" बद्दल माझा सत्कार केला. वाकड येथील वाचक प्रेमी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. शाल,श्रीफळ आणि मोमेन्टो देऊन माझा सत्कार करण्यात आला. आणि योगायोगा असा की भारतरत्न डॉ. ए. पी.जे  अब्दुल कलाम , भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती,ह्यांचा जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर,2022 ला माझा कॉसमॉस सहकारी बँक लिमिटेड आणि ग्रीन वर्ल्ड publication तर्फे  "साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल" सन्मान करण्यात आला. हा थोडा कॉर्पोरेट कार्यक्रम होता. महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे, IAS, ह्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. ह्या दोन्ही कार्यक्रमाला फॉर्मल ड्रेस घालून जाणे आवश्यक होते. 
                    यंदाच्या वर्षी पावसाची जरा जास्त थांबायची इच्छा दिसते आहे. त्यामुळे ऊन म्हणण्यापेक्षा उघाड असेल तर पॅन्ट,शर्ट आदि कपडे धुता येतात. अन्यथा कठीण काम. तर कपडे धुवून वाळल्यानंतर सौ म्हणाली जरा कपड्यांना इस्त्री करून आणा म्हणजे पुनः कुठे जायचे असल्यास कामांत येतील.मी हसलो.तुम्हाला वाटेल ह्यात हसण्यासारखे काय? तुमचेही बरोबर आहे म्हणा, सौ ने कुठलाच विनोद केला नव्हता. मला हसायला आलं ते कारण वेगळेच होते. मी बँकेच्या नोकरीत असतांना रोज अगदी इस्त्री केलेले कपडे वापरत नसे. ह्याला कारण तसेच होते. मी मांडगाव येथे असतांना Cashier होतो. मांडगावला आधी एक दीड वर्ष जाऊन राहिलो. पण नंतर अपडाउन केले. जवळपास 25 किमीचा कच्चा रस्ता, धुळीचा ,कपड्यांची एका दिवसांत वाट लागायची.मी 1983-84 साली प्रचलित असलेली स्टोनवॉशची पॅंट शर्ट वापरत असे.मळतं तेही असतं,पण जाणवतं नसे.एकदा माझा एक मांडगावातील शेतकरी मित्र मला म्हणाला, "तुम्ही हे ताडपत्रीच्या कापडाची पॅंट का वापरता?" तेथील स्थानिक शाळेतील शिक्षकाचे नांव  घेऊन तो म्हणाला, "ते गुरुजी रोज इस्त्रीचे कपडे वापरतेत. मंग तुम्ही तर साहेब हाय." त्याचे म्हणते खरे होते. मी त्याला म्हटले,  "मित्रा,इस्त्रीचे कपडे वापरले की आपोआप चेहरा सुद्धा इस्त्री केल्यासारखा घेऊन वावरतांना बघतोस ना लोकांना. मला ना ते  नको आहे. माझा चेहरा बघ सदा कसा हसरा असतो. त्याला पटलं.तो म्हणाला,"बराबर हाय, कपडे कोन पहाते,थोबाड जर हसतमुख असलं तरं. आज खरं तर ते आठवले म्हणून मला हसायला आले. 
                        माझा पेहराव जरी इस्त्री केलेला नसायचा तरी माझ्या पदाला शोभेल असा नेहमीच असायचा. पण सेवाक्षेत्रातील माझ्या मित्रांना मला हेच सांगायचे आहे की तुम्ही ईस्त्रीचे कपडे वापरा, जरुर वापरा. पण चेहरा मात्र केवळ हसतमुख नव्हे तर संवेदनशील ठेवा. कुणाचे नुकसान झाले, कुणाला त्रास झाला तर त्याचे ते दुख: त्या प्रतीची संवेदनशीलता  आपल्या चेहऱ्यावर दिसायला हवी  माझ्या मते यशाच्या काही घटकातील एक घटक संवेदनशील चेहरा हा देखिल असतो. हे सांगण्यासाठीच हा प्रपंच. 
                            माझे विचार कसे वाटले हे माझा ईमेल आयडी pknatoo25360@gmail. com वर जरून कळवा. 



                                                                                                                               प्रसाद नातु , पुणे 
                                                                                                                               88888 18589                                                         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...