Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

इस्त्रीचे कपडे की चेहरा



                    इस्त्रीच्या कपड्यावरुन आठवले. आज बहुधा निवृत्तीनंतर पहिल्यांदाच ज्याला फॉर्मल म्हटले जाते ते म्हणजे शर्ट आणि टेरीकॉटची पॅन्ट घालून गेलो असेन. निमित्त होतं, दोन सत्कार सोहोळयांचे.माझा लेखक म्हणून सर्वात आधी सत्कार झाला तो 14 डिसेंबर 2021 ला बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, कोल्हापूरच्या हॉलमधे. झोनल मॅनेजर श्री. हेमंत खेर सर यांच्या  शुभ हस्ते हा सत्कार आणि माझ्या "होस्ट इज घोस्ट" ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन  संपन्न झाले.त्याचा आनंद, मित्रांनो,काही वेगळाच होता.गेल्या 38 वर्षे एक कुटुंब समजून मी ज्या बँक ऑफ इंडियामधे होतो. त्या माझ्या लोकांनी , घरच्या लोकांनी केलेला सत्कार मला रोमांचित करून गेला. 
                   बरोबर 10 महिन्यांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर,2022 ला वाकड,पुणे येथील शब्दा बुक्स आणि लायब्ररीने कस्पटे सभागृहात  "साहित्यातील योगदाना" बद्दल माझा सत्कार केला. वाकड येथील वाचक प्रेमी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. शाल,श्रीफळ आणि मोमेन्टो देऊन माझा सत्कार करण्यात आला. आणि योगायोगा असा की भारतरत्न डॉ. ए. पी.जे  अब्दुल कलाम , भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती,ह्यांचा जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर,2022 ला माझा कॉसमॉस सहकारी बँक लिमिटेड आणि ग्रीन वर्ल्ड publication तर्फे  "साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल" सन्मान करण्यात आला. हा थोडा कॉर्पोरेट कार्यक्रम होता. महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे, IAS, ह्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. ह्या दोन्ही कार्यक्रमाला फॉर्मल ड्रेस घालून जाणे आवश्यक होते. 
                    यंदाच्या वर्षी पावसाची जरा जास्त थांबायची इच्छा दिसते आहे. त्यामुळे ऊन म्हणण्यापेक्षा उघाड असेल तर पॅन्ट,शर्ट आदि कपडे धुता येतात. अन्यथा कठीण काम. तर कपडे धुवून वाळल्यानंतर सौ म्हणाली जरा कपड्यांना इस्त्री करून आणा म्हणजे पुनः कुठे जायचे असल्यास कामांत येतील.मी हसलो.तुम्हाला वाटेल ह्यात हसण्यासारखे काय? तुमचेही बरोबर आहे म्हणा, सौ ने कुठलाच विनोद केला नव्हता. मला हसायला आलं ते कारण वेगळेच होते. मी बँकेच्या नोकरीत असतांना रोज अगदी इस्त्री केलेले कपडे वापरत नसे. ह्याला कारण तसेच होते. मी मांडगाव येथे असतांना Cashier होतो. मांडगावला आधी एक दीड वर्ष जाऊन राहिलो. पण नंतर अपडाउन केले. जवळपास 25 किमीचा कच्चा रस्ता, धुळीचा ,कपड्यांची एका दिवसांत वाट लागायची.मी 1983-84 साली प्रचलित असलेली स्टोनवॉशची पॅंट शर्ट वापरत असे.मळतं तेही असतं,पण जाणवतं नसे.एकदा माझा एक मांडगावातील शेतकरी मित्र मला म्हणाला, "तुम्ही हे ताडपत्रीच्या कापडाची पॅंट का वापरता?" तेथील स्थानिक शाळेतील शिक्षकाचे नांव  घेऊन तो म्हणाला, "ते गुरुजी रोज इस्त्रीचे कपडे वापरतेत. मंग तुम्ही तर साहेब हाय." त्याचे म्हणते खरे होते. मी त्याला म्हटले,  "मित्रा,इस्त्रीचे कपडे वापरले की आपोआप चेहरा सुद्धा इस्त्री केल्यासारखा घेऊन वावरतांना बघतोस ना लोकांना. मला ना ते  नको आहे. माझा चेहरा बघ सदा कसा हसरा असतो. त्याला पटलं.तो म्हणाला,"बराबर हाय, कपडे कोन पहाते,थोबाड जर हसतमुख असलं तरं. आज खरं तर ते आठवले म्हणून मला हसायला आले. 
                        माझा पेहराव जरी इस्त्री केलेला नसायचा तरी माझ्या पदाला शोभेल असा नेहमीच असायचा. पण सेवाक्षेत्रातील माझ्या मित्रांना मला हेच सांगायचे आहे की तुम्ही ईस्त्रीचे कपडे वापरा, जरुर वापरा. पण चेहरा मात्र केवळ हसतमुख नव्हे तर संवेदनशील ठेवा. कुणाचे नुकसान झाले, कुणाला त्रास झाला तर त्याचे ते दुख: त्या प्रतीची संवेदनशीलता  आपल्या चेहऱ्यावर दिसायला हवी  माझ्या मते यशाच्या काही घटकातील एक घटक संवेदनशील चेहरा हा देखिल असतो. हे सांगण्यासाठीच हा प्रपंच. 
                            माझे विचार कसे वाटले हे माझा ईमेल आयडी pknatoo25360@gmail. com वर जरून कळवा. 



                                                                                                                               प्रसाद नातु , पुणे 
                                                                                                                               88888 18589                                                         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...