ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले “कशाबद्धल? काय केले आहे मी? “. “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र, सारेच तुला शोधत आहेत , आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल. “अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच...