ब्लॉग नं. 2026/115.
दिनांक: 25 एप्रिल, 2026.
मित्रांनो,
मला आठवतंय, 20 तारखेला,मी प्रत्येक जेवणानंतर
दहा मिनिटे चालायला हवं,आणि त्यामुळे होणारे फायदे यावर एक ब्लॉग लिहिला होता.आज एक
पोस्ट माझ्या वाचनांत आली, जेवणानंतर काय नाही करायला हवे. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून
ते मी तुम्हाला शेअर करत आहे.
सविस्तर:
तुम्ही काय खाता याकडे जर तुम्ही लक्ष देत असाल, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की,जेवणानंतर
तुम्ही काय करता,हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,कारण त्याचा
तुमच्या पचनक्रियेवर आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.तुम्ही झोपून
राहता की थोडा वेळ चालता,यावर तुमचे शरीर अन्न कसे पचवते हे
अवलंबून असते.
जयपूर येथील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील मधुमेह आणि अंतःस्रावशास्त्र विभागातील
डॉ. हेताश्वी गोंदलिया यांनी सांगितले की, “जेवणानंतर लोकांच्या अशा अनेक सवयी आहेत,ज्यामुळे केवळ पचनक्रियाच बिघडत नाही, तर रक्तातील
साखरेची पातळीही बिघडते.”
झोपणे:
जेवणानंतर लोक सोफ्यावर किंवा पलंगावर झोपतात, ही एक सामान्य गोष्ट आहे.“यामुळे छातीत
जळजळ तर होतेच, पण तुमच्या पचनक्रियेवरही परिणाम होतो,”
असा इशारा डॉ. गोंदलिया यांनी दिला.
चहा किंवा
कॉफी पिणे:
जेवणानंतर लगेचच लोक पेये पितात,हे एक सामान्य दृश्य आहे, जे योग्य नाही. “जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोषक तत्वांच्या
शोषणात अडथळा येऊ शकतो,” असे त्या म्हणाल्या.
धूम्रपान:
जेवणानंतर धूम्रपान करण्यासाठी बाहेर जाणे,ही आणखी एक वाईट सवय आहे. यामुळे
पोटाच्या समस्या वाढतात आणि पचनक्रियेत अडथळा येतो.
तीव्र
व्यायाम करणे:
जर तुम्ही फिटनेसप्रेमी असाल,तर जेवणानंतर लगेचच जास्त व्यायाम न करणे उत्तम. “जेवणानंतर
लगेचच खूप तीव्र व्यायाम करणे योग्य नाही, कारण त्यामुळे
रक्तप्रवाह पचनसंस्थेऐवजी स्नायूंकडे वळतो,” असे त्यांनी
निदर्शनास आणले.
साखरयुक्त
पेये घेणे:
यामध्ये रिकाम्या कॅलरीज भरपूर असतात. "जेवणानंतर कँडी किंवा साखरयुक्त
पेये घेतल्याने,मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या व्यक्तींच्या,रक्तातील
साखरेची पातळी खूप वाढू शकते," असा इशारा डॉ. गोंदलिया यांनी दिला.
अति पाणी
पिणे: त्यांच्या
मते, जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावू शकते.
याऐवजी:
हलका
व्यायाम: 10-15 मिनिटे
चालल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहते आणि संपूर्ण चयापचय
क्रियेला आधार मिळतो.
“जेवणानंतर 10-15 मिनिटे केलेली हलकीशी चाल,(walk) पचनास
मदत करते आणि जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करते.पुरेसे तंतुमय पदार्थ
(फायबर), प्रथिने आणि आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ, (healthy
fats) यांचा समावेश असलेली संतुलित जेवणे घेणे, हा शरीराला दीर्घकाळापर्यंत ऊर्जा पुरवण्याचा आणि चयापचय प्रक्रिया (metabolism)
सुधारण्याचा,एक उत्तम मार्ग आहे,” असे डॉ.
गोंदलिया यांनी स्पष्ट केले.
संतुलित
जेवण घेण्याव्यतिरिक्त, ठराविक अंतराने जेवणे घेणे देखील महत्त्वाचे आहे.त्यांनी रात्री उशिरा जड
जेवण घेण्याचे टाळण्याचा सल्ला दिला.
समारोप:
पचनास मदत करण्यासाठी, जेवणानंतर पाणी मोठ्या प्रमाणात घटाघटा पिण्याऐवजी,लहान-लहान घोट घेऊन
प्यावे.तसेच,‘जागरूकपणे जेवण्याचा’ (mindful eating) सराव करणे,जसे की अन्न नीट चावून खाणे, आणि जेवताना इतर विचलित करणाऱ्या
गोष्टींपासून दूर राहणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, या
सवयींचे पालन केल्यास, तुम्हाला सुधारलेले पचन आरोग्य आणि
रक्तातील साखरेची स्थिर पातळी यांसारख्या फायद्यांचा दीर्घकाळापर्यंत आनंद घेता
येईल.
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टिक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन
करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

उपयुक्त माहिती
ReplyDeleteछान उपयोगी माहिती 🙏 RR
ReplyDeleteछान उपयोगी माहिती 🙏 RR
ReplyDelete