मित्रांनो,
आजच्या
धावपळीच्या आयुष्यात पित्त, अॅसिडिटी,
छातीत जळजळ, करपट ढेकरा हे त्रास जणू सामान्य
झाले आहेत.आणि त्यावरचा सर्वात सोपा उपाय म्हणून आपण काय करतो? आपण एक पित्ताची गोळी घेतो. आणि तिने क्षणात आराम मिळतो, पण…हा आराम पुढे गंभीर आजारांची नांदी ठरू शकतो, हे
फार थोड्यांना माहिती आहे.या बद्दल अधिक जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
पित्ताच्या गोळ्या –
तात्पुरता उपाय,
डॉक्टरांच्या
सल्ल्याशिवाय, रोज किंवा
वारंवार पित्तशामक औषधे (Acidity Tablets) घेणे अत्यंत घातक
ठरू शकते.तज्ञांचा इशारा असा आहे की, पित्ताच्या गोळ्या
जास्तीत जास्त 5-7 दिवस घेणे सुरक्षित आहे.मात्र 6 आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या
घेत राहिल्यास, त्याचे दुष्परिणाम हळूहळू शरीरावर दिसू
लागतात.
पित्ताच्या गोळ्यांचे
भयंकर दुष्परिणाम:
1. किडनीवर
गंभीर परिणामः
पित्तशामक
औषधांच्या दीर्घकालीन वापरामुळे मूत्रपिंडांवर (Kidneys) घातक परिणाम होतो.यामुळे किडनी हळूहळू निकामी होण्याचा
धोका वाढतो. म्हणूनच फूड अँड ड्रग असोसिएशनने आता या औषधांवर “सावधानतेचा इशारा” (Warning)
लिहिणे बंधनकारक केले आहे.
2. मेंदू
आणि हृदयालाही धोका:
सतत अॅसिड
कमी केल्यामुळे शरीरातील जैविक संतुलन बिघडते. त्याचा परिणाम मेंदू व हृदयाच्या
कार्यक्षमतेवर हळूहळू होऊ शकतो.
3. पोटाची
नैसर्गिक संरक्षणशक्ती कमी होते:
पित्ताच्या
गोळ्या जठरातील अॅसिड कमी करतात. पण हेच अॅसिड आपल्याला जंतुसंसर्गापासून
वाचवण्याचे काम करते.अॅसिड सतत कमी झाल्यास, पोटात वारंवार इन्फेक्शन, जुलाब, गॅस,
सूज,पचनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती कमी हे
त्रास सुरू होतात.
4. लोहाची
कमतरता (Anaemia):
या
औषधांमुळे Iron absorption कमी होते, परिणामी:रक्ताची कमतरता, थकवा, चक्कर, अशक्तपणा यालाच Anaemia
(रक्ताल्पता) म्हणतात.
5. हाडे
ठिसूळ होतातः
कॅल्शियमचे
शोषण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत व ठिसूळ बनतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो
6. Vitamin B12 ची कमतरता:
दीर्घकाळ
पित्ताच्या गोळ्या घेतल्याने: तोंडात वारंवार छाले, जीभ जळजळ, स्मरणशक्ती कमी,हातापायांत मुंग्या असे त्रास होतात.“पित्त काढणे”
ही सवय अत्यंत धोकादायक असते. अनेक लोक
सकाळी दात घासल्यानंतर घशात बोट घालून उलटी काढतात. ही सवय अत्यंत घातक आहे. यामुळे,
अन्ननलिकेच्या आतील अस्तराला सूज, जखमा आणि
दीर्घकाळ असे केल्यास अन्ननलिकेचा कर्करोग (Esophageal Cancer) होण्याचा धोका वाढतो.
पित्त टाळायचं असेल तर
लक्षात ठेवा – “हरी, करी आणि वरी”
1. हरी (घाई): सतत धावपळ, अनियमित दिनचर्या, अपुरी झोप, उशिरापर्यंत
जागरण हे टाळायला हवे.
2. करी
(चमचमीत सवयी): तळलेले, मसालेदार पदार्थ,हॉटेलचे खाणे,
सिगारेट, मद्य, अतिप्रमाणात
चहा–कॉफी
कोल्डड्रिंक्स हे टाळायला
हवे.
3. वरी
(विचारांचा ताण): चिंता, काळजी,
ताणतणाव, असमाधान, नैराश्य (Depression)
हे टाळायला हवे.
औषधांपेक्षा जीवनशैली
बदला: 🌿
पित्त
झाल्यावर लगेच गोळी घेण्यापेक्षा, पित्तच होणार नाही यासाठी प्रयत्न करा.त्यासाठी, वेळेवर
जेवण घ्या, साधे, घरचे अन्न, पुरेशी झोप, ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, पाणी योग्य प्रमाणात प्या.
✨ समारोपः
पित्ताची
गोळी हा उपाय नाही, ती फक्त तात्पुरतं
समाधान आहे आहे. शरीर सांगत असते – “काहीतरी चुकीचं चाललंय.” तो इशारा दुर्लक्ष
करून रोज गोळ्या घेणे म्हणजे आरोग्याशी खेळणे. तेव्हा, आजच
निर्णय घ्या गोळीवर अवलंबून राहायचं नाही,अगदी आवश्यक असेल तरच
गोळी घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा आणि जीवनशैली सुधारायचा प्रयत्न करा.
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
मला डॉक्टर ने दररोज पित्ताची गोळी घ्या म्हणून लिहून दिले आहे
ReplyDeleteमी कित्येक महिने ़झाले दररोज पित्ताची गोळी, डॉक्टरांनी सांगितले म्हणून घेत आहे
तुमच्या सल्ल्याने दररोज पित्ताची गोळी घेतल्यास शरीराचे बरेच नुकसान होऊ शकते
कृपया मी पित्ताची गोळी सुरू ठेवावी कि नाही हे सांगावे
मिलिंद निमदेव
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असे ब्लॉगमध्ये लिहिले आहे. शेवटी डॉक्टरांचा सल्ला हा अंतिम.
Deleteश्री मिलिंद सर नमस्कार,
ReplyDeleteमाझ्या कार्डियाक ट्रीटमेंट मुळे ज्या गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे पित्त होतं. ते पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ऍसिडिटी वर गोळ्या दिल्या आहेत. त्या गोळ्या बंद केल्या वर त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला पाळणे मला तरी हितकारक वाटतं. मला वाटतं नातू सर आपल्या ब्लॉग मध्ये नेहमीच डॉक्टरांचा सल्ला ला प्राधान्य दे ण्यात यावा या वर भर देतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अमलात आणणं हितकारक आहे असं मला वाटतं
अगदी खरं आहे. आवश्यक असेल तरच डॉक्टर गोळ्या घेण्यास सांगत असतात.
ReplyDeleteGood advice
ReplyDelete