Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

बटरपासून ते ज्यूसपर्यंत सारं काही फ्रिजमध्ये

 ब्लॉग नं. 2025/355.

दिनांक: 19 डिसेंबर, 2025. 

मित्रांनो,

आजच्या आधुनिक जीवनात फ्रिज ही प्रत्येक घराची मूलभूत गरज बनली आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा—कोणताही ऋतू असो, फ्रिजचा वापर आपण दररोजच करतो.अन्नपदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून आपण अगदी फळे-भाज्या,दूध-दही,रस,मसाले आणि कुकीजसुद्धा फ्रिजमध्ये ठेवतो.पण इथेच चूक होते.सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी योग्य नसतात. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तर ते स्वत: तर खराब होतातच, शिवाय ते खाल्ल्याने आपल्यालासुद्धा त्रास होऊ शकतो. कधी कधी हे अन्न विषारीही बनते. आज 90% लोक रोज करतात या चुका.त्या फ्रिजच्या चुकीमागचे खरे विज्ञान,आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया.

सविस्तर:

1. ज्यूस: ताजाच प्यावा – फ्रिजमध्ये नाही!

फळांचा रस (ज्यूस) हा क्षणभंगुर पदार्थ आहे.घरचा ताजा काढलेला रस आरोग्यासाठी उत्तम, पण,तो तासन् तास किंवा दिवसन् दिवस फ्रिजमध्ये ठेवला,तर त्यात बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात.चव, सुगंध आणि पौष्टिकता नष्ट होते.आणि प्यायल्यास फूड पॉयझनिंगचा धोका वाढतोम्हणून नियम सोपा: रस काढा आणि लगेच प्या. फ्रिजमध्ये साठवू नका.

2. कच्चे मांस (Raw Meat):

कच्च्या मांसाला खूप कमी तापमान आवश्यक असते,जवळजवळ गोठवण्याइतके. फक्त फ्रिजमध्ये ठेवले तर ते लवकर खराब होते. त्यात बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. अन्न विषबाधेचा धोका अनेकदा जास्त वाढतो

कच्चे मांस नेहमी डीप फ्रीजरमध्येच ठेवावे.

3. केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत:

केळी अत्यंत नाजूक फळ आहे.फ्रिजमध्ये ठेवल्याने,ती काळी पडतात,त्यांची चव बदलते आणि आतील पोतही पिवळसर-दमट होते. केळी नेहमी खोलीच्या तापमानावरच ठेवा.

4. दही फ्रिजमध्ये? – पोतच बदलतो.  

दही गरम-थंड तापमानाच्या बदलांना खूप संवेदनशील आहे.फ्रिजमध्ये ठेवले तर, दही पातळ पडते किंवा उलट लवकर आंबट होते.त्याची नैसर्गिक चव आणि जाडसर पोत खराब होते. दही नेहमी मध्यम तापमानात किंवा छायेतील ठिकाणी ठेवा आणि दिवसातच वापरा.

5. दूध फ्रिजच्या दारात ठेवण्याची चूक:

अनेक जण दूध फ्रिजच्या दारात ठेवतात.पण दार उघडणे-बंद करणे यामुळे, गरम हवा दुधाच्या संपर्कात येते. तापमान सतत बदलते आणि दूध लवकर खराब होते. दूध नेहमी फ्रिजच्या आतील थंड भागात ठेवा,दारात नाही.

6. बटर (लोणी):

लोण्याला थंडी लागली कि ते गोठते,आणि पुन्हा मऊ झाले की त्याची चव व पोत बदलते.फ्रिजच्या दारात ठेवणे ही सर्वात सामान्य पण चुकीची सवय आहे.परिणाम: बटर लवकर रँसिड (दुर्गंधीयुक्त) होते. चव अगदी फिकट आणि विचित्र लागते. मग काय करावे? बटर एअरटाइट डब्यात ठेवा. खूप गरमी नसेल तर रूम टेम्परेचरवर ठेवलेले चालते. बाकीचे बटर मात्र फ्रिजच्या खोल भागात ठेवा, दारात नाही

 

मग फ्रिजमध्ये काय ठेवू नये? – झटपट यादी

पदार्थ

फ्रिजमध्ये ठेवू नये कारण

ज्यूस

लवकर खराब होतो, फूड पॉयझनिंगचा धोका

कच्चे मांस

फ्रिज पुरेसे थंड नसते, बॅक्टेरिया वाढतात

केळी

काळी पडतात, चव बदलते

दही

पातळ पडते, लवकर आंबट होते

दूध (दारात)

तापमान बदलामुळे लवकर खराब होते

बटर

गोठते, चव आणि पोत बदलते

समारोप:

फ्रिज म्हणजे जादूची पेटी नाही; ते सर्व अन्नपदार्थ टिकवून ठेवू शकत नाही. काही पदार्थांना नैसर्गिक उब हवी, काहींना खोल थंडी हवी, तर काही पदार्थांना “फ्रिज” हे वातावरणच योग्य नसते.योग्य पदार्थ योग्य ठिकाणी ठेवल्यास अन्नपदार्थही टिकतात.आणि आपले आरोग्यही सुरक्षित राहते

शेवटी, आरोग्य टिकविण्यासाठी ज्ञान हे पहिलं पाऊल आहे. 🌿🧊

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. प्रसाद सर दररोज प्रमाणे आजचा ब्लॉग खूप उपयुक्त
    धन्यवाद सर
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. सॉलिड उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...