Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

स्नान केव्हा करावे? सकाळी कां संध्याकाळी?

ब्लॉग सं. 2025/145

दिनांकः 26 मे, 2025.

मित्रांनो

            आपला देश हा विविधतेने नटलेला आहे,तसाच तो वेगवेगळ्या विचारसरणीने देखील नटलेला आहे. अशा या देशात स्नान किंवा आंघोळ नेमकी केव्हा केली पाहिजे यात एकवाक्यता नाही.हे मी रोज नियमितपणे स्नान किंवा आंघोळ करणाऱ्याविषयी बोलतो.म्हणजे काही लोक म्हणजे बहुमताने लोक स्नान हे सकाळी केले पाहीजे या मताचे आहेत.साधारणतः 60-70% लोक असे समजतात आणि बाकीचे समजतात की आंघोळ ही संध्याकाळी करावी किंवा याचा काही फिक्स्ड टाइम नाही. 2022 मध्ये स्लीप फाउंडेशनने केलेल्या अमेरिकेतील सर्वेक्षणानुसार, 42% अमेरिकन लोक सकाळी स्नान करणे पसंत करतात. त्यांना दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि उत्साहाने करायला आवडते.यावर एक अभ्यास करण्यात आला आहे. त्या अभ्यासानुसार आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूया की आंघोळ सकाळी करावी की रात्री कां केव्हाही.

सविस्तर:

स्नान करण्याची योग्य वेळ – एक अभ्यास

स्नान करण्यासाठी योग्य वेळ निवडणे ही वैयक्तिक सवयी, दिनचर्या, आणि शारीरिक गरजांवर अवलंबून असते. सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करणे यावर अनेक वाद आहेत, पण कोणती वेळ योग्य आहे याचा निर्णय तुमच्या गरजांवर आधारित असतो.

सकाळी स्नान – म्हणजे ताजेपणाची सुरुवात:

सकाळी स्नान करण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळी स्नानाचे फायदे:

1.       शरीराला ताजेतवाने करते आणि दिवसभर उर्जावान ठेवते.

2.       रक्ताभिसरण सुधारते आणि मनाला शांतता मिळते.

3.       दिवसभराच्या कामांसाठी मानसिक तयारी होते.

सकाळी स्नान कोणासाठी योग्य आहे?

·        ज्या लोकांना दिवसभर सक्रिय राहायचे आहे.

·        ज्या लोकांना व्यायाम किंवा जॉगिंगनंतर स्वच्छता राखायची आहे.

संध्याकाळी स्नान – विश्रांतीची तयारी:

संध्याकाळी स्नान करणाऱ्यांसाठी,हा दिवसाचा शेवटचा ताजेतवाने करणारा क्षण असतो. 25% लोक झोपण्यापूर्वी स्नान करणे पसंत करतात, कारण यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो आणि झोप शांत लागते.

संध्याकाळी स्नानाचे फायदे:

1.       दिवसभरातील घाम, धूळ आणि प्रदूषण साफ होते.

2.       झोपेपूर्वी शरीर आणि मन शांत होते.

3.       झोप चांगली लागण्यास मदत होते.

संध्याकाळी स्नान कोणासाठी योग्य आहे?

·        ज्या लोकांना दिवसभर प्रवास किंवा शारीरिक श्रम करावे लागतात.

·        ज्या लोकांना झोपेआधी विश्रांती हवी आहे.

आंघोळ आणि मानसिक स्वास्थ्य:

आंघोळ केवळ शारीरिक स्वच्छतेसाठीच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाची आहे. तज्ज्ञांच्या मते,आंघोळ केल्याने ताण आणि चिंता कमी होतात. यामुळे शरीरात सकारात्मक संप्रेरक सक्रिय होतात, आणि मज्जासंस्था शांत होते.

भारतीय परंपरा आणि सवयींनुसार स्नानाचे महत्व:

भारतात बहुतेक लोक (60-70%) सकाळी स्नान करणे पसंत करतात, कारण धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून याला अधिक महत्त्व आहे.शहरी भागातील सुमारे 30-40% लोक संध्याकाळी स्नान करतात, विशेषतः त्यांची व्यस्त दिनचर्या लक्षात घेता.

योग्य वेळ कधी?

जर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळा स्नान करणे शक्य नसेल, तर तुमच्या गरजा, सवयी आणि दिनचर्येनुसार स्नानासाठी वेळ निवडणे उत्तम आहे.तुम्ही सकाळी स्नान करा किंवा संध्याकाळी, महत्त्वाचे म्हणजे ती क्रिया केवळ शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही ताजेतवाने करणारी असावी.

समारोप:

            यावर अभ्यास जरी करण्यात आला असला तरी शेवटी, अभ्यासात हेच म्हटले आहे की ज्याच्या त्याच्या गरजा,सवयी आणि तो व्यक्ती कुठल्या प्रकारचे काम करतो यावर अवलंबून आहे. यात असेही म्हंटले आहे की, तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेत स्नान केलेत तर ते उत्तम.कारण स्नानामुळे केवळ शारीरिक स्वच्छता साधली जाते असे नव्हे तर त्याने मनाला देखील टवटवी मिळते.       

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...