Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059

दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025.

मित्रांनो:

            बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                      

अति-विचार म्हणजे काय? आणि तो कसा थांबवावा?

अति-विचार म्हणजे काय?

अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे, ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त असतो, की निर्णय घेणे कठीण होते. अति-विचारामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होतो.

अति-विचारामध्ये दोन प्रकार असतात:

1.       भूतकाळाचा विचार: आपण भूतकाळात केलेल्या चुका, चुका पुन्हा पुन्हा आठवणे.

2.       भविष्यकाळाची चिंता: भविष्यातील समस्या किंवा अपयश याबद्दल अनावश्यक चिंता करणे.

अति-विचाराचे दुष्परिणाम:

·        मानसिक ताणतणाव

·        झोपेचा अभाव

·        निराशा किंवा नैराश्य

·        निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे

·        स्वतःवरील विश्वास गमावणे

अति-विचार थांबवण्याचे उपाय:

1. वर्तमानात जगा:

भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करा. ध्यान (मेडिटेशन) आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्रामुळे मन शांत होते.

2. समस्या लहान तुकड्यांमध्ये विभागा:

मोठ्या समस्यांकडे पाहून घाबरण्यापेक्षा त्यांची लहान लहान भागांमध्ये विभागणी करा आणि एकेक करून त्या समस्या सोडवा.

3.सकारात्मक विचार करा:

नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

4. ठराविक वेळ द्या:

विचारांसाठी ठराविक वेळ द्या, जसे की रोज 15 मिनिटे विचार करा. या वेळेनंतर मनाला दुसऱ्या कामात गुंतवा.

5.स्वतःवर नियंत्रण ठेवा:

ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही, त्या गोष्टींबद्दल विचार करणे थांबवा. तुम्ही तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकता, परिस्थितीवर नव्हे.

अति-विचार कसा व्यवस्थापित करावा?

1. नियमित व्यायाम करा:

व्यायामामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि मेंदूमध्ये सकारात्मक हार्मोन्सची निर्मिती होते.

2. मनातील विचार कागदावर उतरवा:

आपल्या मनातील विचार कागदावर लिहा. यामुळे विचारांची गोंधळलेली साखळी तुटते आणि तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाते.

3. तज्ज्ञांचा सल्ला घ्या:

जर अति-विचार गंभीर स्वरूपाचा असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काउन्सलिंग किंवा थेरपीच्या माध्यमातून तो नियंत्रित करता येतो.

4. वेळेचे व्यवस्थापन करा:

दिवसभराच्या कामांसाठी वेळ ठरवा.वेळेच्या व्यवस्थापनामुळे मोकळ्या वेळेत अति-विचार टाळता येतो.

5. तंत्रज्ञानापासून विश्रांती घ्या:

मोबाईल, सोशल मीडिया यामुळे अति-विचार वाढतात. त्यापासून वेळ काढा आणि शांततेचा अनुभव घ्या.

शेवटी अति-विचाराचे उदाहरण देतो.तुम्ही लोणावळ्याला वीकएंडसाठी जाण्याचे ठरविले.हॉटेल बूक केलं.पण मग तुमच्या मनांत सुरू होतं,रस्त्याने गर्दी तर नाही लागणार?कुठे जाम असेल  कां? असेल तर पोहोचायला वेळ होईल आणि आपलं वेळेचं गणित कोलमडेल.मग जो वेळ मिळेल,त्यात लोणावळ्यातील महत्वाच्या गोष्टी पहाता येतील कां? आणि या अति-विचाराने डोकं भणभणू लागेल,मनावर ताण येईल,ड्रायव्हिंगवर परिणाम होईल. परिणामी,तुम्ही वीकएंड मजेत घालवायचं ठरवलं असेल,तेच नेमकं होणार नाही.                        

समारोप:

अति-विचार ही एक मानसिक सवय आहे,जी वेळेवर ओळखून थांबवणे गरजेचे आहे. ध्यान, सकारात्मक दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अति-विचारावर विजय मिळवता येतो.आयुष्य एकदाच मिळते; ते विचारांच्या गोंधळात वाया न घालवता सुसंवादी आणि आनंदी बनवा.म्हणून विचार करा पण अति-विचार करू नका.हे लक्षात ठेवा.     

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातु.


Comments

  1. अति विचार केल्यास किती नुकसान होते ते छान समजावले. त्यावर उपाय पण ऊत्तम सुचवले. धन्यवाद
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...