Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

उपाशीपोटी चालणे की जेवणानंतर चालणे,कोणते चांगले?

ब्लॉग नं 2025/025

दिनांक:- 25 January, 2025. 

मित्रांनो,

            सकाळी सकाळी फिरायला जाणे हा खरं तर भारतीय व्यायाम प्रकार नाही.पण जेवल्यानंतर शतपावली करायला जाणे हा भारतीय प्रकार आहे. विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर शतपावली घालणे हे पोटासाठी म्हणजे पचनासाठी चांगले समजले जाते.कारण त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा आडवे होणे टाळले जाते. शतपावली म्हणजे सावकाश अगदी मोजून शंभर पावले नव्हे पण थोडे चालणे.पण आज माझ्या वाचनात एक पोस्ट आली, ज्यात उपाशी पोटी चालणे अर्थात मॉर्निंग वॉक आणि जेवल्यानंतर चालणे यातील फायदेशीर कुठले हे सांगितले आहे. आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. 

सविस्तर:

चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार आहे, ज्याचा फायदा सर्व वयोगटातील लोकांना होतो. उपाशीपोटी चालावे की जेवणानंतर चालावे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. या लेखात आपण या दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे आणि कोणती पद्धत कुणासाठी चांगली आहे, हे पाहणार आहोत.

उपाशीपोटी चालणे अर्थात मॉर्निंग वॉक:

फायदे:

1. चरबी कमी होणे:

सकाळी उपाशीपोटी चालल्याने शरीर, साठवलेली चरबी उर्जेसाठी वापरते. वजन कमी करण्यासाठी आणि मसल्स टिकवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

2. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते:

उपाशीपोटी चालल्याने शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, जी मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त आहे.

3. ऊर्जा वाढते आणि मूड सुधारतो:

सकाळी चालल्यानंतर ‘एंडॉर्फिन्स’ नावाचे हॉर्मोन्स स्रवतात, ज्यामुळे दिवसाची सकारात्मक सुरुवात होते.

4. मानसिक स्पष्टता:

उपाशीपोटी चालण्याने मेंदू सक्रिय होतो, एकाग्रता वाढते आणि दिवसभराच्या कामांचे नियोजन सोपे होते.

तोटे:

1. कमी सहनशक्ती:

रात्रीच्या उपवासानंतर शरीरात ग्लायकोजेन कमी असल्यामुळे थकवा किंवा चक्कर येण्याची शक्यता असते.

2. सर्वांसाठी योग्य नाही:

मधुमेह असलेल्या किंवा कमी रक्तशर्करा होणाऱ्या व्यक्तींनी उपाशीपोटी चालणे टाळावे, कारण त्यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणजे शुगर लेवल आत्यंतिक कमी होण्याची शक्यता असते.शुगर लेवल कमी होणे हे फार जिकिरीचे असते. कारण ती फारच कमी झाल्यास कोमात जाण्याचा धोका असतो.

जेवणानंतर चालणे:

फायदे:

1. पचन सुधारते:

जेवणानंतर हलक्या चालण्याने पचन प्रक्रिया वेगवान होते, गॅस कमी होतो आणि पोषणमूल्ये चांगली शोषली जातात.

2. रक्तातील साखर नियंत्रण:

जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, जी मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्याचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.

3. कॅलरीज जळतात:

जेवणानंतर 10-15 मिनिटे चालल्याने कॅलरीज साठण्यापासून रोखता येते आणि मेटाबॉलिझम चांगले राखले जाते.

4.अॅसिड रिफ्लक्स कमी होतो:

अॅसिडिटी किंवा जळजळ होणाऱ्या लोकांसाठी जेवणानंतर चालल्याने त्रास कमी होतो.

5.मधुमेहावर नियंत्रण शक्य:

जेवल्यानंतर चालल्याने चयापचयाची प्रक्रिया सुधारते.याचा परिणाम शुगर लेवल नियंत्रणात राहते. रात्रीचे किंवा जेवल्यानंतर चालणे मधुमेही साठी फायद्याचे आहे.

तोटे:

1. तीव्र चालणे कठीण:

जड जेवणानंतर लगेच चालल्यास पोट जडसर वाटू शकते आणि वेगाने चालणे कठीण होते.

2. सर्वांसाठी योग्य नाही:

पचनासंबंधित समस्या असलेल्या लोकांना जेवणानंतर चालल्याने पोटात दुखणे किंवा क्रॅम्प्स येऊ शकतात.

मग कोणते चांगले?

उपाशीपोटी चालणे आणि जेवणानंतर चालणे याचा फायदा तुमच्या उद्दिष्टांवर आणि शरीराच्या गरजांवर अवलंबून आहे.

वजन कमी करायचे असल्यास:

उपाशीपोटी चालणे फायदेशीर ठरते, कारण ते चरबी जाळण्यास मदत करते.

पचन सुधारायचे असल्यास:

जेवणानंतर चालणे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी प्रभावी ठरते.

सामान्य आरोग्यासाठी:

दोन्ही पद्धती फायदेशीर आहेत. सकाळी चालल्याने मानसिक ताजेतवानेपणा येतो, तर जेवणानंतर चालल्याने पचन सुधारते.

समारोप:

चालणे फायदेशीर आहे, वेळ कोणतीही असो. तुमच्या शरीराच्या गरजा ओळखून, तुमच्या आरोग्य उद्दिष्टांनुसार चालण्याची वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी चालणे योग्य ठरते, तर पचन सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी जेवणानंतर चालणे उपयुक्त आहे. सतत चालण्याची सवय ठेवा, पुरेसे पाणी प्या, आणि चांगल्या आरोग्यासाठी नियमितता जपा.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा. 

तेवीस जानेवारीचा ब्लॉग वाचला नसल्यास जरूर वाचा.तुमच्याने शारिरीक क्रियाकलाप होत नसतील तर काय करावे हे त्यात सांगितले आहे.  

 

प्रसाद नातुपुणे. 

Comments

  1. योग्य वजन राखण्यासाठी उत्तम ब्लॉक

    ReplyDelete
  2. छान माहिती सर 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...