Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

छातीत दुखतंय हृदयविकाराचा त्रास की गॅस्ट्रिक ट्रबल?

ब्लॉग नं 2025/029

दिनांक:- 29 January, 2025. 

मित्रांनो,

            बऱ्याचदा असं होतं की,पोटात गॅस झाल्यामुळे हृदयविकाराचा (अंजायना किंवा हृदयविकाराचा झटका) आणि गॅसच्या वेदनांमधील फरक ओळखणे कठीण असू शकते, पण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास याचा अंदाज बांधता येतो.छातीत वेदना सुरू होतात,अगदी काही वेळा हृदयविकाराचा त्रास असल्यासारखे वाटते आणि आपण घाबरून घेल्यामुळे चिंता केल्याने वेदना अधिक वाढू शकतात. अशा वेळी हा नेमका हृदयविकाराचा त्रास आहे की गॅस्ट्रिक ट्रबल आहे,याचा अंदाज न आल्यामुळे जर दुर्लक्ष झाले आणि आपण हृदयविकाराच्या त्रासाला गॅसमुळे होणारा त्रास समजून निवांत बसलो,तर विपरित घडू शकतं. आज या ब्लॉगमध्ये हा हृदयविकाराचा त्रास आहे की गॅस्ट्रिक ट्रबल आहे,हे कसं समजायचं यावर हा प्रकाश टाकला आहे.हा एक केवळ माहितीसाठी ब्लॉग असून,वैद्यकीय सल्यासाठी नेहमीच डॉक्टरांशी  संपर्क करावा.पण यांत दिलेली लक्षणे पाहून तुम्हाला होणारा त्रास कुठल्या प्रकारचा त्रास आहे,हे लक्षात आले तर तुम्ही न घाबरता प्रसंगाला सामोरे जावे,यासाठी शेअर करत आहे.                  

हृदयविकाराचा त्रास (अंजायना किंवा हृदयविकाराचा झटका):

1.       ठिकाण:

o   वेदना साधारणतः छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूस जाणवतात.

o   हात (विशेषतः डावा हात), जबडा, मान, पाठ किंवा खांद्यापर्यंत पसरू शकतात.

2.       वेदनेचा प्रकार:

o   दाबल्यासारखे, दाटल्यासारखे, जडसर किंवा जळजळल्यासारखे वाटते.

o   टोकदार वेदनेपेक्षा ताठरपणा किंवा अस्वस्थता जाणवते.

3.       कालावधी:

o   काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते आणि हालचालींमुळे वाढू शकते.

o   पोझिशन बदलल्याने किंवा ढेकर दिल्याने वेदना कमी होत नाहीत.

4.       इतर लक्षणे:

o   श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, भोवळ येणे, मळमळ किंवा हृदयाची धडधड जाणवणे.

o   भीती किंवा संकटाची भावना असते.

5.       प्रेरक कारणे:

o   शारीरिक श्रम, भावनिक ताणतणाव किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर वेदना होऊ शकते.

o   अंजायनाच्या वेळी विश्रांती घेतल्यास किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने आराम मिळू शकतो (हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी नाही).

गॅसच्या वेदना:

1.       ठिकाण:

o   वरच्या पोटात किंवा खालच्या छातीत जाणवतात.

o   क्वचितच इतर भागांमध्ये पसरतात.

2.       वेदनेचा प्रकार:

o   पोट फुगल्यासारखे, तीव्र कळ किंवा मुंग्या आल्या सारखे वाटते.

o   पोझिशन किंवा हालचालींमुळे वेदना कमी होतात.

3.       कालावधी:

o   वेदना मधून-मधून येते आणि ढेकर देणे किंवा गॅस पास केल्याने कमी होते.

4.       इतर लक्षणे:

o   ढेकर, गॅस जास्त होणे  किंवा पोटात भरलेपणाची भावना (Bloating) .

o   श्वास लागणे, घाम येणे किंवा इतर ठिकाणी वेदना पसरल्याचे लक्षण नसते.

5.       प्रेरक कारणे:

o   मसालेदार, तुपकट किंवा जास्त प्रमाणात गॅस तयार करणारे अन्न खाल्ल्याने वेदना होतात.

o   जास्त खाणे किंवा कार्बोनेटेड पेये पिण्यामुळेही गॅस होतो.

डॉक्टरांकडे कधी जायचे?

            तसं पाह्यला गेलं तर डॉक्टरकडे दोन्ही प्रकारच्या त्रासात जाऊन येणे केव्हाही फायद्याचे पण जर छातीत वेदना:

  • तीव्र आणि सतत असेल.
  • श्वास लागणे, घाम येणे किंवा इतर भागात वेदना जाणवणे यांसारखी लक्षणे असतील.
  • अँटॅसिड्स घेतल्याने किंवा पोझिशन बदलल्याने वेदना कमी होत नसतील.

तर अशा कोणत्याही वेळी chest pain ला गंभीर समजावे. शंका असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

समारोप:

            छातीत दुखलं की,आपल्याला घाबरायला होणं हे स्वाभाविक आहे. घाबरल्याने त्रास दूर न होता अधिक वाढतो. म्हणून घाबरून जाऊ नये. त्यात आपल्याला या वेदना वारंवार होत असतील आणि त्यांचे स्वरूप तसेच असेल तर आपण निरधास्त होऊन संकटाला सामोरे जातो. ज्यात रोग लवकर बरा होण्याची शक्यता बऱ्याचदा वाढते. दुखणे हे नेहमीच डॉक्टरच्या सल्ल्यामुळे आणि औषधांमुळेच नव्हे,तर आपले मनोबल कसे आहे,यावर देखिल अवलंबून असते.म्हणून मनोबल सकारात्मक असावे.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा. 

 

प्रसाद नातुपुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...