Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

बाय बाय 2024

ब्लॉग नं. 2024/318

दिनांक:- 31 डिसेंबर, 2024.

मित्रांनो,

            आज वर्ष 2024 चा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर,2024. भिंतीवरील कॅलेंडरचं शेवटचं पान. या वर्षात मी 318 ब्लॉग लिहिले,मागच्या वर्षातील 325 च्या पेक्षा सातने कमी.आज मी कुठलाच विषय निवडलेला नाही.उद्यापासून एखादा विषय घेऊन लिहिन. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे,नवीन वर्षाचा प्रत्येक जण एक नवीन संकल्प करत असतो. हिन्दी कवि सोहनलाल द्विवेदी यांनी कुठला संकल्प या कवितेतून सांगितला आहे ते आजच्या ब्लॉग मध्ये बघूया.           

सविस्तर:

स्वागत! जीवन के नवल वर्ष आओ, नूतन-निर्माण लिये,
इस महा जागरण के युग में जाग्रत जीवन अभिमान लिये;

संसार क्षितिज पर महाक्रान्ति की ज्वालाओं के गान लिये,
मेरे भारत के लिये नई प्रेरणा नया उत्थान लिये;

मुर्दा शरीर में नये प्राण प्राणों में नव अरमान लिये,
स्वागत!स्वागत! मेरे आगत! तुम आओ स्वर्ण विहान लिये!

युग-युग तक पिसते आये कृषकों को जीवन-दान लिये,
कंकाल-मात्र रह गये शेष मजदूरों का नव त्राण लिये;

श्रमिकों का नव संगठन लिये,पददलितों का उत्थान लिये;
स्वागत!स्वागत! मेरे आगत! तुम आओ स्वर्ण विहान लिये!

सत्ताधारी साम्राज्यवाद के मद का चिर-अवसान लिये,
दुर्बल को अभयदान, भूखे को रोटी का सामान लिये;

जीवन में नूतन क्रान्ति क्रान्ति में नये-नये बलिदान लिये,
स्वागत! जीवन के नवल वर्ष आओ, तुम स्वर्ण विहान लिये! 

कवितेचा अर्थ:

            किती सुरेख अर्थ आहे या कवितेचा, कवि म्हणतो या महाजागरणाच्या युगात जागृत जीवनाचा अभिमान  बाळगत, नवीन काही निर्माण करण्याचा संकल्प करत, या सुवर्ण सकाळ घेऊन येणाऱ्या जीवनाच्या नवीन वर्षांचे स्वागत करू या.या जगाच्या क्षितिजावर क्रांतीच्या ज्वालांचे गीत गात,माझ्या भारतासाठी नवी प्रेरणा घेऊन, मृतवत झालेल्या शरीरामद्धे नवीन प्राण फुन्कुन,तसेच मनांत नव्या इच्छा घेऊन सुवर्ण सकाळ घेऊन येणाऱ्या जीवनाच्या नवीन वर्षांचे स्वागत करू या.      

            युगेयुगे पीडित राहिलेल्या शेतकऱ्यांना या नविन वर्षात नवे जीवन प्रदान करू या.हाडांची काडे झालेल्या मजुरांच्या त्राण निर्माण करू या, त्यांची एक नविन संघटना उभारू या.पददलितांच्या उत्थानासाठी या वर्षात प्रयत्न करू या. नव्या इच्छा घेऊन सुवर्ण सकाळ घेऊन येणाऱ्या जीवनाच्या नवीन वर्षांचे स्वागत करू या.      

        जे साम्राज्यवादी हेतु मनांत ठेऊन आहेत,त्यांचा या नविन वर्षात अंत करू या,दुर्बलांना अभयदान देऊन,भुकेल्याना अन्नाचे भांडार उपलब्ध करून जीवनात नवी क्रांती आणूया. सुवर्ण सकाळ घेऊन येणाऱ्या जीवनाच्या नवीन वर्षांचे स्वागत करू या.        

                मी माझ्या परीने कवितेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.कुणी माझी काही चूक नजरेस आणून दिली तर स्वागत आहे.    

समारोप:

            नविन वर्षाच्या प्रत्येक जण स्वतःचा असा काही संकल्प ठरवित असतो. तो तर प्रत्येक जण ठरवेलच,पण भारताचे सुजाण नागरिक म्हणून हिन्दी कवि सोहनलाल द्विवेदी यांनी आपल्याला संकल्प दिला आहे,तो ही संकल्प करण्याचा प्रयत्न करू या. उद्या माझा ब्लॉग येईल तेव्हा,नवे वर्ष उगवले असेल.. म्हणून माझ्या ब्लॉगच्या  सगळ्या वाचकांना हे नविन वर्ष यश,सुख,समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा आणि हो माझ्या सगळ्या सीनियर वाचकांना आणि मित्रांना विशेष करून दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ह्या शुभेच्छा देत आहे. आज वर्ष 2024 ला निरोप देऊ या. त्या सोबत राग,द्वेष,मत्सर,हेवे दावे यांना देखिल निरोप देऊ या. आणि प्रेम,आपुलकी,ममत्व,बंधुत्व आणि जिव्हाळा यांना जवळ करू या.         

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातुपुणे.

 

           

Comments

  1. सर, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, स्वस्थ रहा, मस्त रहा, ब्लॉग लिहित रहा आणि आनंदी रहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...