Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

11 ऑक्टोबर, महानायकाचा वाढदिवस

Blog No 2024/241.

दिनांक:11,ऑक्टोबर2024 

मित्रांनो,

            काल अभिनेत्री रेखाचा वाढदिवस होता आणि आज सुपरस्टार,महानायक,बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.रेखाची आणि अमिताभ यांची एकमेकांशी मैत्री म्हणा, भावनिक जवळीक किती होती माहित नाही.पण त्यांच्या या जन्मतारखेची जवळीक मात्र विलक्षण आहे.अमिताभ यांच्याबद्दल ब्लॉग लिहावा म्हटलं आणि माहिती गोळा करायला सुरुवात केली.अन जवळपास 10 पाने माहिती गोळा झाली.आता ही संकलित करून दोन पानांत कशी बसवायची ही समस्या आहे.बघू या.

प्रास्ताविक:

अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि सामाजिक कार्यकर्ते तेजी बच्चन यांच्या घरी झाला.अमिताभ श्रीवास्तव हे अमिताभ बच्चन यांचे मूळ नांव.त्यांचे शिक्षण नैनिताल येथील शेरवुड कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमध्ये झाले.1969 मध्ये मृणाल सेन यांच्या भुवन शोम या चित्रपटात निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.अमिताभ बच्चन यांना एक लहान भाऊ आहे,त्याचे नांव अजिताभ जो त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.अमिताभ बच्चन यांची एक भारतीय अभिनेताचित्रपट निर्माता,दूरदर्शन होस्ट अशी ओळख  आहे. पाच दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली अभिनेते म्हणून ओळखले जाते.त्यांना बॉलीवूडचा शहेनशाह,सदी के महानायक ("शतकातील महान अभिनेता")स्टार ऑफ द मिलेनियम किंवा बिग बी म्हणून संबोधले जाते.एक विडंबना अशी की ज्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर आपली कारकीर्द गाजविली,त्यांनी ऑल इंडिया रेडिओ,दिल्ली येथे न्यूजरीडर म्हणून भूमिकेसाठी अर्ज केला परंतु "ऑडिशनमध्ये फेल झाले

अभिनय कारकीर्द

बच्चन यांनी 1969 मध्ये मृणाल सेन यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भुवन शोम चित्रपटात निवेदक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित सात हिंदुस्तानी द्वारे हिन्दी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.त्यानंतर 1971 मध्ये आनंद आला,ज्यामध्ये बच्चन यांच्यासोबत राजेश खन्ना होते.त्यानंतर परवाना, रेश्मा और शेरा असे काही चित्रपट आले आणि गेले.अमिताभ यांनी एस.रामनाथन दिग्दर्शित बॉम्बे टू गोवा या अॅक्शन कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारली.जी काही प्रमाणात यशस्वी झाली.त्यानंतर प्रकाश मेहरा यांचा जंजीर आला.या चित्रपटातील "अँग्री यंग मॅन"ची व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर बच्चन यांनी राजेश खन्नासोबत पुन्हा एकदा भूमिका साकारली तो नमक हराम हा हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित खूप चालला. अमिताभनी मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकान मध्ये सहाय्यक भूमिका साकार केली. त्यानंतर बच्चन यांनी मजबूर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

1975 मध्ये, चुपके चुपके,फरार,मिली हे चित्रपट आले.अमिताभने यश चोप्रा दिग्दर्शित दीवार आला, ज्यात शशी कपूरनिरुपा रॉयपरवीन बाबी आणि नीतू सिंग यांच्यासोबत काम केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला.15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला शोले हा त्यावेळचा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.नंतर यश चोप्रा यांच्या कभी कभी मध्ये त्यांनी काम केले. त्यांनी अदालतमध्ये वडील आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका साकारली.1977 मध्येत्यांनी अमर अकबर अँथनी काम केले. हा चित्रपट देखिल हिट ठरला.त्यानंतर आलेल्या हिट चिटपटांमध्ये परवरिश आणि खून पसीना यांचा समावेश होतो.कसमे वादे आणि डॉन या दोन्ही चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या.ज्या यशस्वी ठरल्या. त्यानंतर यश चोप्राच्या त्रिशूल आणि प्रकाश मेहरा यांच्या मुकद्दर का सिकंदर या दोन्ही चित्रपटांमध्येही जबरदस्त अभिनय केला ज्याने त्यांना पुढील फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले.मुकद्दर का सिकंदर,त्रिशूल,डॉन,कस्मे वादेगंगा की सौगंध आणि बेशरम हे सर्व चित्रपट यशस्वी ठरले.त्यानंतर 1979 मध्ये बच्चन यांनी सुहाग,मिस्टर नटवरलालकाला पत्थरद ग्रेट गॅम्बलर आणि मंझिल यांसारख्या चित्रपटांत काम केले. त्यानंतर काला पत्थरदोस्ताना हे चित्रपट आणि यश चोप्रा यांचा सिलसिला,तसेच शानराम बलराम, नसीब, लावारिसकालिया,याराना आणि शक्ती हे चित्रपट आले.त्यांनी सत्ते पे सत्ता आणि देश प्रेमी मध्ये दुहेरी भूमिका केल्या.नमक हलाल,खुद्दार आणि बेमिसाल यांसारखे चित्रपट मेगा हिट ठरले.नंतर आलेला “महान” तेवढा हिट झाला नाही. मग पुकार, अंधा कानून यशस्वी ठरले.26 जुलै 1982 रोजीसह-अभिनेता पुनीत इस्सार सोबत कुली या चित्रपटासाठी भांडणाच्या दृश्याचे चित्रीकरण करत असतानाबच्चन यांना जवळच्या आतड्याला दुखापत झाली होती.ते अनेक महिने रुग्णालयात गंभीर आजारी होऊन राहिले.

1984 ते 1987 या तीन वर्षांच्या राजकारणातील कारकिर्दीनंतरबच्चन 1988 मध्ये चित्रपटांमध्ये परतलेयानंतर आलेला शहेनशाह बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.तथापि,त्यांच्या पुनरागमन चित्रपटाच्या यशानंतर,त्याची स्टार पॉवर कमी होऊ लागली कारण त्याचे त्यानंतरचे जादुगरतुफान आणि मैं आझाद हूं बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.अग्निपथ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.त्यानंतर बडे मियाँ छोटे मियाँ  आणि मेजर साब ने व्यवसायिक यश मिळाले आणि सूर्यवंशम, लाल बादशाह आणि कोहराम  बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

2000 मध्येबच्चन आदित्य चोप्रा दिग्दर्शित यश चोप्राच्या बॉक्स ऑफिस हिटमोहब्बतें मध्ये दिसले. त्यांच्या भूमिकेने त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.कभी खुशी कभी गम आणि बागबान मध्ये अमिताभ बच्चन दिसले.एक अभिनेता म्हणून अक्स,आंखे,कांटे,खाकीदेव आणि वीर-झारा मध्ये अमिताभ चमकले.संजय लीला भन्साळीच्या ब्लॅक साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,चौथा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दुसरा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला.अमिताभ बच्चन यानी मुलगा अभिषेकसोबत बंटी और बबली केला,द गॉडफादर ट्रिब्यूट सरकार आणि कभी अलविदा ना कहना या चित्रपटांमध्ये काम केले. ते सर्व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.मात्र त्या नंतर मात्र त्यांचे चित्रपट पूर्वी इतके यशस्वी ठरले नाहीत.2000 पासून 2023 पर्यन्त त्यांनी टीव्ही वर कौन बनेगा करोडपतीचे अनेक भाग केले.ते सर्व यशस्वी ठरले.सध्या कौन बनेगा करोडपतीचे सत्र सुरू आहे. तसं पाहिला गेलं तर सामान्य ज्ञान या सारख्या सामान्य वाटणाऱ्या विषयावर आधारित या कार्यक्रमाला अमिताभ यांनी एक वेगळी ऊंची प्राप्त करून दिली दिली आहे. ही फक्त अमिताभ यांची जादू म्हणावी लागेल.   

अमिताभ यांचे पारिवारीक जिवन

अमिताभ यांना दोन मुले आहेत.अभिषेक जो एक अभिनेता आहे आणि श्वेता,एक लेखिकापत्रकार आणि माजी मॉडेल.अभिषेकने अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केले आणि त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. श्वेताने उद्योगपती निखिल नंदासोबत लग्न केले आहे.जो कपूर अभिनेत्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यांना एक मुलगीनवीन नवेली आणि एक मुलगाअगस्त्य आहे.अमिताभ यांचे कुटुंब महाराष्ट्रातील मुंबई येथे राहते.

सारांश

            मी या वर्ष भरात बऱ्याच अभिनेत्यांवर ब्लॉग लिहिले,पण मला कमीतकमी शब्दांत ब्लॉग कसा लिहायचा याचं दडपण आलं नव्हतं.जे आज आलं आहे.अमिताभ यांच्या चित्रपटांची आणि ते देखिल हिट चित्रपटांची यादीच एवढी मोठी आहे की त्यांत काठछाट करता येणं शक्य झालं नाही.अमिताभ बच्चन आता त्र्यांशीव्या पदार्पण करत आहे.या अभिनयाच्या सम्राटाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.तसेच अजून अनेक वर्ष आपल्याला त्यांच्या अभिनयाची जादू चाखावयास मिळावी.   

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...