Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

T-20 वर्ल्ड कपवर भारताचा कब्जा

Blog No. 2024/ 138.  

Date: 2nd,July 2024

मित्रांनो,

            अखेर T-20 च्या वर्ल्ड कप मधील 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ परवा 29 जूनला संपला. आणि एका अटीतटीच्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवत,विश्वचषकावर आपलं नांव कोरलं.विराट कोहलीने आधीच्या सर्व सामन्यात मिळून 75 धावा केल्या होत्या.आणि या एकाच सामन्यात 75 धावा नोंदविल्या.रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिघेही स्वस्तात निपटल्यानंतर,विराट कोहलीने अक्षर पटेलच्या साथीने भारताला एका चांगल्या धांवसंख्ये पर्यन्त, म्हणजे 176 धावांपर्यंत पोहोचविले.

            पण ज्यावेळेस क्लासन आणि डेविड मिलर खेळत असतांना,एका वेळेस अक्षरक्ष: भारत कुठे तरी मोठी धावसंख्या उभी करायला कमी पडला की काय?असं वाटू लागलं होतं.अक्षर पटेलच्या,डावाच्या 15 व्या ओवरमध्ये 24 रन फटकावल्यानंतर,शेवटच्या पांच ओवर्समध्ये, म्हणजे 30 बॉलमधे 30 धावा इतके सोपे समीकरण असतांना,हार्दिक पंड्या,जसप्रीत बूमराह आणि अर्शदिप सिंगने कमालीची किफायती बॉलिंग टाकत 5 ओवर्समध्ये केवळ 23 धावा दिल्याने,भारताने विश्वचषक 7 धावांनी जिंकत 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवला.

विराट आणि रोहितची निवृत्ती:  

            त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये,भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने हा माझा शेवटचा  T-20 चा वर्ल्ड कप आणि T-20 चा शेवटचा सामना मी खेळल्याचे सांगत T-20 मधून सेवानिवृत्ती घेतल्याची घोषणा केली.यानंतर, कर्णधार रोहित शर्माने देखील T20 विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर T20 फॉरमॅटला निरोप दिला. 2007 च्या विश्वचषकात भारताच्या विजयाने रोहितच्या उल्लेखनीय T20 कारकिर्दीची सुरुवात झाली. 2024 मध्ये,त्याच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर,एक वर्तुळ पूर्ण झाल्याची त्याची भावना दिसली.T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर,रोहितने दोन वर्षांहून अधिक काळ सांभाळलेल्या कर्णधारपदाचा अंतिम निरोपही घेतला.रोहितने घोषणा केली की तो क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारातून निवृत्त होत आहे,पण तरीही तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. संघ सहकारी विराट कोहलीने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर,काही वेळातच रोहितने त्याची घोषणा केली.

समारोप:

            भारताने विश्वचषक जिंकला असला तरी,धडाकेबाज फलंदाज हिट मॅन रोहित शर्माची जबरदस्त बॅटिंग आणि महान खेळाडू विराट कोहलीची शैलीदार फलंदाजी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला मिळणार नाही. हे सतत जाणवतं राहिल. एखाद्या सामन्यात किंवा एखाद्या मालिकेत अपयश आले तरं आपण खेळाडूंना नांव ठेवत असतो.पण तो खेळाडू यापुढे खेळतांना दिसणार नाही,ही कल्पना नकोशी वाटते.पण काय करणार? शेवटी “इसी का नाम जिंदगी है !” असचं म्हणावं लागेल.     

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. सुंदर विश्लेषण प्रसाद जी... रोहीत आणि विराट यापुढे T20 त दिसणार नाहीत ह्याचे निश्चितच वाईट वाटतेय..पण हीच ती योग्य वेळ होती...आपण हवेहवेसे असतानाच निघून जाणे केव्हाही चांगलेच ना..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...