Blog No. 2024/ 138.
Date: 2nd,July 2024
मित्रांनो,
अखेर T-20 च्या वर्ल्ड कप मधील 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ परवा 29 जूनला संपला.
आणि एका अटीतटीच्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवत,विश्वचषकावर आपलं
नांव कोरलं.विराट कोहलीने आधीच्या सर्व सामन्यात मिळून 75 धावा केल्या होत्या.आणि या
एकाच सामन्यात 75 धावा नोंदविल्या.रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिघेही
स्वस्तात निपटल्यानंतर,विराट कोहलीने अक्षर पटेलच्या साथीने भारताला एका चांगल्या धांवसंख्ये
पर्यन्त, म्हणजे 176 धावांपर्यंत पोहोचविले.
पण
ज्यावेळेस क्लासन आणि डेविड मिलर खेळत असतांना,एका वेळेस अक्षरक्ष: भारत कुठे तरी मोठी
धावसंख्या उभी करायला कमी पडला की काय?असं वाटू लागलं होतं.अक्षर पटेलच्या,डावाच्या
15 व्या ओवरमध्ये 24 रन फटकावल्यानंतर,शेवटच्या पांच ओवर्समध्ये, म्हणजे 30 बॉलमधे
30 धावा इतके सोपे समीकरण असतांना,हार्दिक पंड्या,जसप्रीत बूमराह आणि अर्शदिप सिंगने
कमालीची किफायती बॉलिंग टाकत 5 ओवर्समध्ये केवळ 23 धावा दिल्याने,भारताने विश्वचषक
7 धावांनी जिंकत 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवला.
विराट आणि रोहितची निवृत्ती:
त्यानंतर
घडलेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये,भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज
विराट कोहलीने हा माझा शेवटचा T-20 चा वर्ल्ड कप आणि T-20 चा शेवटचा सामना मी खेळल्याचे
सांगत T-20 मधून सेवानिवृत्ती घेतल्याची घोषणा केली.यानंतर, कर्णधार
रोहित शर्माने देखील T20 विश्वचषक
ट्रॉफी उचलल्यानंतर T20 फॉरमॅटला
निरोप दिला. 2007 च्या
विश्वचषकात भारताच्या विजयाने रोहितच्या उल्लेखनीय T20 कारकिर्दीची सुरुवात झाली. 2024 मध्ये,त्याच्या नेतृत्वाखालील
संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर,एक वर्तुळ पूर्ण झाल्याची त्याची भावना दिसली.T20 फॉरमॅटमधून
निवृत्ती घेतल्यानंतर,रोहितने दोन वर्षांहून अधिक काळ सांभाळलेल्या कर्णधारपदाचा
अंतिम निरोपही घेतला.रोहितने घोषणा केली की तो क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारातून
निवृत्त होत आहे,पण तरीही तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळणार
आहे. संघ सहकारी विराट कोहलीने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
जाहीर केल्यानंतर,काही वेळातच रोहितने त्याची घोषणा केली.
समारोप:
भारताने
विश्वचषक जिंकला असला तरी,धडाकेबाज फलंदाज हिट मॅन रोहित शर्माची जबरदस्त बॅटिंग आणि
महान खेळाडू विराट कोहलीची शैलीदार फलंदाजी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
बघायला मिळणार नाही. हे सतत जाणवतं राहिल. एखाद्या सामन्यात किंवा एखाद्या मालिकेत
अपयश आले तरं आपण खेळाडूंना नांव ठेवत असतो.पण तो खेळाडू यापुढे खेळतांना दिसणार नाही,ही
कल्पना नकोशी वाटते.पण काय करणार? शेवटी “इसी का नाम जिंदगी है !” असचं म्हणावं लागेल.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Apratim
ReplyDeleteसुंदर विश्लेषण प्रसाद जी... रोहीत आणि विराट यापुढे T20 त दिसणार नाहीत ह्याचे निश्चितच वाईट वाटतेय..पण हीच ती योग्य वेळ होती...आपण हवेहवेसे असतानाच निघून जाणे केव्हाही चांगलेच ना..
ReplyDelete🙏👌
ReplyDelete