Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

लयबद्ध आणि मधुर गीतांचा निर्माता ओ पी नय्यर

 Blog No.2024/011. 

Date: -16th, January,2024. 

मित्रांनो,

            लयबद्ध आणि मधुर संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या ओ.पी. नय्यर अर्थात ओंकार प्रसाद नय्यर यांची आज 98 वी जयंती. ‘आस्मान” या 1952 साली आलेल्या चित्रपटापासून सुरु झालेली ओपीची कारकीर्द अगदी 1994 पर्यन्त विस्तारलेली होती. ‘जिद’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.अशा या संगीत दिग्दर्शकाला आज त्यांच्या 98 व्या जयंती दिनी माझा मानाचा मुजरा. 

प्रास्ताविक

            ओपी नय्यर यांचा जन्म 16 जानेवारी, 1926 ला पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. त्यांना तीन भाऊ होते.ओपी यांची पत्नी सरोज ही लग्नापूर्वी स्टेज डान्सर होती.सरोज यांनी “प्रीतम आन मिलो” हे गीत लिहिले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.

कारकीर्द

            ओपी नय्यर यांनी सर्वप्रथम 1952 ला “आस्मान” या चित्रपटासाठी संगीत दिले. त्यानंतर छम छमा छम, बाज या चित्रपटांसाठी संगीत दिले.चित्रपट निर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त यांनी त्यांना “आरपार”, “मिस्टर अँड मिसेस 55” आणि CID चित्रपटासाठी करारबद्ध केले.नय्यर यांनी प्रामुख्याने संगीत दिग्दर्शन देतांना मोहम्मद रफी,शमशाद बेगम आणि आशा भोसले यांचा आवाज वापरला. “सारी सारी रात तेरी याद सताए” हे एक गाजलेले गीत जरी लता मंगेशकर यांनी गायलेले असले तरी त्यांनी लता मंगेशकर यांच्या सोबत नंतर काम केले नाही.भारतीय शास्त्रीय संगीतातील “पिलु” हा ओपी यांचा आवडता राग ज्याचे कर्नाटक संगीतातील कपी या रागाशी साम्य आहे. ओपी यांची बरीचशी गाणी या रागावर आधारित असतं.1957 मधे त्यांची नासिर हुसेन यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यासाठी ओपी नी “तुमसा नाही देखा” आणि “फिर वही दिल लया हूं” या चित्रपटांना संगीत दिले.

            मोहम्मद रफी यांचेशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी महेंद्र कपूर यांच्यासोबत काम केले. “बहारे फिर भी आयेगी” मधील गाजलेले चित्रपटगीत ‘बदल जाये अगर माली,चमन होता नही खाली. बहारे फिर भी आती है बहारे फिर भी आयेगी” महेंद्र कपूर यांनी गायले होते. त्या नंतर ‘संबंध’ या चित्रपटासाठी “चल अकेला चल अकेला” हे गाणे मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड केले. ‘शमशाद बेगम’ यांच्या सोबत केलेले गाणे “कजरा मोहब्बत वाला” हे गाणे खूप हित झाले. त्यानंतर “नया दौर” या चित्रपटातील गाणी खूप गाजली.या चित्रपटातील “ये देश हे वीर जवानोका” हे अजूनही देशभक्ती गीत म्हणून लोकप्रिय आहे. CID मधे जॉनी वॉकरवर चित्रांकित झालेले “ए दिल है मुश्किल जीना यहा” हे गाणे देखिल खूप गाजले. किशोर कुमार मधील कलाकार त्यांनी खूप आधी ओळखला होता. त्यांनी  किशोर कुमारला त्यांनी ‘बाप रे बाप’ आणि ‘रागिनी’ या दोन चित्रपटात संधि देखिल दिली.पण त्यांचे नाते जास्त टिकले नाही. “प्राण जाये पर वचन न जाये” या 1973 ला आलेल्या चित्रपटापासून ओपी नय्यर यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. त्यांनी एकंदर 75 चित्रपटासाठी संगीत दिले.

ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी

            ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी पुढील प्रमाणे ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’,‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, “रेशमी सलवार कुर्ता’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘इशारो इशारो मे दिल’, ‘दिवाना हूवा बादल’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘जायिए आप कहा जाएगी’, ‘मन मोरा बांवरा’, ‘मेरा नाम चीन चीन चु’, ‘चल चल अकेला’, ‘बदल जाए अगर माली चमन होता नही खाली’, ‘सवेरे का सूरज तुम्हारे लिये है’, ‘लेके पहला पहला प्यार’, ‘ऐ दिल है मुश्किल जिना यहा’, ‘आँखों ही आँखों मे इशारा हो गया’, ‘कभी आर कभी पार’, ‘बाबूजी धीरे चलना’, ‘आओ हुजूर तुमको’ आणि इतर खूप सारी, ज्यांची यादी द्यायची झाली तर ती खूप मोठी होईल.

मृत्यू  

            28 जानेवारी,2007 ला हा महान संगीतकार आपल्याला सोडून गेला. त्यांचे मृत्यू समयी वय 81 वर्षे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी,एक मुलगा आणि तीन मुली एवढा परिवार ते सोडून गेले.

समारोप

अशा या लयबद्ध आणि मधुर संगीताच्या बादशहाला त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त माझ्या कडून विनम्र अभिवादन. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.

photo courtesy @music unrestricted 

Comments


  1. दर वर्षी यादें OP नैय्यर कार्यक्रम वर्धेत साजरा करण्यात येतो. दर्दी लोक आवर्जुन हजेरी लावतात.
    नैय्यरजीना विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. छान माहितीपूर्ण लेख. ओ.पी. नय्यर व आशा भोसले हे समीकरण खूप गाजले.सुंदर सुंदर गाणी देऊन ती गाणी ह्या जोडीने अजरामर केली.ओ.पी ना विनम्र अभिवादन!! very good write up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...