Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

भारतात नवश्रीमंतांची संख्या वाढते आहे !

 Blog No.2024/014. 

Date: -19th, January,2024.       

 

मित्रांनो,

            भारतातील श्रीमंत लोकांमध्ये भर पडत आहे आणि मुख्य म्हणजे त्यात नवश्रीमंताची संख्या अधिक आहे.आपल्या देशातील लोकांचा हॅचबॅक म्हणजे अगदी प्रायमरी कार,त्यानंतर मोडणारी म्हणजे सेडान यापेक्षा सध्या लोकांचा एसयुव्ही म्हणजे मोठ्या गाड्या,उंची कार खरेदी करण्यामागचा कल हेच दर्शवितो.या संबंधात आपण आज चर्चा करणार आहोत.         

प्रास्ताविक

गोल्डमन सॅचही एक आघाडीची जागतिक वित्तीय संस्था आहे.जिचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचा श्रीमंत वर्ग हा अर्थव्यवस्थेतील उपभोग्य वस्तूंच्या बाजारावर हुकूमत गाजविणार आहे.त्यांचा अंदाज आहे की भारतातील 60 दशलक्ष लोक असे आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 8 लाख आहे आणि ही लोकसंख्या 2027 मधे म्हणजे तीनच वर्षांनी 100 दशलक्षपर्यंत वाढेल.यासाठी त्यांनी यावर्षी फाइल झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा आधार घेतला आहे.

गेल्या 5 वर्षांत ₹10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगून कर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या वार्षिक 19% वाढली आहे. याउलट, कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत मात्र एकूण वाढ केवळ 8% झाली आहे.याचा अर्थ हा ₹10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

गेल्या वर्षी SBI रिसर्चने देखील याचा शोध घेतला आणि सांगितले होते की एका दशकापूर्वी भारतीय करदात्यांचे मध्यम उत्पन्न सुमारे ₹4.4 लाख होते.ते आता ₹13 लाख आहे.याचा अर्थ असा की या वर्गातील लोकांचे कमी-उत्पन्न गटातून उच्च-उत्पन्न गटात संक्रमण झाले आहे. 

या वाढत्या श्रीमंत वर्गाचा फायदा कोणाला होतो?

जेव्हा एखादा देश असा बदल अनुभवत असतो तेव्हा सर्वात आधी या गोष्टीचा विचार केला जातो की या वाढलेल्या उत्पन्नाचा विवेकाधीन वापर होतो की नाही.अशा लोकांकडे अधिक खर्च करण्याजोगे उत्पन्न असते आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता असते.त्यांना असुरक्षितेची फारशी काळजी वाटतं नाही.1950 च्या दशकातील अमेरिकेचा विचार करा. देशात बऱ्यापैकी तरुण लोकसंख्या होती, मजुरी वाढत होती आणि उपभोगतावाद वाढला होता. भारतातही असंच काहीसं चालू आहे का? हा प्रश्न उभा ठाकतो.

कारण या उपभोगात मोठी लवचिकता असते,म्हणजे उत्पन्न 1 ने वाढल्यास, उपभोग 1.25 ने वाढू शकतो.याचे एक कारण असे असू शकते की लोक कर्ज काढून उपभोग घेण्यास अधिक इच्छुक असतात. GS अहवाल हे स्पष्टपणे दर्शवतो की भारतात जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या गेल्या 4 वर्षांत दुप्पट झाली आहे. आणि क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या रकमेत 2.5 पट वाढ झाली आहे. 

हा नवश्रीमंत कुठे पैसे खर्च करतो?

          पुढील ट्रेंड हे दर्शवितो की FMCG क्षेत्रात हिंदुस्तान युनिलिव्हरपेक्षा नेस्ले इंडिया वेगाने वाढत आहेत. फुटवेअर क्षेत्रात बाटापेक्षा वेगाने वाढणारी कंपनी मेट्रो आहे,फॅशन क्षेत्रात V-Mart पेक्षा वेगाने वाढणारी ट्रेंट ही कंपनी आहे  प्रवासी वाहनांमद्धे एंट्री-लेव्हल कारपेक्षा वेगाने वाढणारी SUV आहे आणि दोनचाकी वाहनांमद्धे आयशर ही कंपनी  उद्योगापेक्षा वेगाने वाढत आहे.

          यासाठी उत्पादक हे उत्पादनांमध्ये अधिक वैशिष्ट्ये (features) जोडत आहेत आणि त्यांना जास्त किंमतीत विकत आहेत. त्यांना असा विश्वास आहे की या ग्राहकांकडून ते जितक्या जास्त किंमती आकारतील तितका त्यांचा नफा ते टिकवून ठेवू शकतील. भारतातील रेफ्रिजरेटर आणि शूज यांसारख्या अनेक श्रेणींमध्ये उत्पादनांची सरासरी विक्री किंमत (ASP) वाढली आहे.म्हणजेच श्रीमंत लोक उपभोगाच्या मोहिमेवर जात आहेत.

 समारोप

            भारतात नवश्रीमंतांची लोकसंख्या वाढत आहे.पण क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या खर्चाची संख्या वाढणे, कर्जाची संख्या वाढणे म्हणजे जे पैसे तुमचे नाहीत ते खर्च करणे असा होतो.त्या सोबत तुम्ही स्वतः बचत करत असाल किंवा ही कर्ज वेळेआधी संपविण्याची तुमची योजना असेल तर तुम्ही डेब्ट ट्रॅप मधे अडकणार नाही. अन्यथा कठीण आहे असा निष्कर्ष काढता येईल.अर्थात भारतात कुठे काही चांगले होतं असेल तर दृष्ट लावणाऱ्यांची संख्या कमी नाही.कारण भारताची अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने वाटचाल करत आहे.सरकारचा जो पर्यन्त उद्योगांना पाठिंबा असेल तोपर्यंत अर्थव्यवस्थेची वाटचाल अशीच होत राहील. फक्त खर्च आणि कर्ज वाढवितांना आपले अंथरुण पाहून हातपाय पसरावे एवढेच मी म्हणेन.  

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.

image courtesy@finshots

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...