Blog No.2023/293
Date: -23rd,
November 2023.
मित्रांनो,
बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 1973 या वर्षी अनेक हिन्दी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही “ट्रेंड सेटर” होते.या चित्रपटामधील एक नांव घेण्यासारखा चित्रपट म्हणजे “जंजीर”. अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीलाच नव्हे तर हिन्दी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा देणारा हा चित्रपट ठरला. अमिताभ बच्चनला यात "अंग्री यंग मॅन" च्या भूमिकेत सादर करण्यात आले होते आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांची हीच भूमिका डोळ्यासमोर ठेऊन अनेक चित्रपट लिहिले गेले.एवढेच नव्हे तर ते बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालले.आज बघू जंजीर या चित्रपटाविषयी.
प्रास्ताविक
अमिताभ बच्चन,जया भादूरी, अजित आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट.यात त्यांना साथ लाभली ती असरानी,बिंदु,इफ्तेखार,गुलशन बावरा यांची. प्रकाश मेहरा निर्मित,दिग्दर्शित या चित्रपटाची कथा,संवाद सलीम-जावेद यांचे होते.गीतं गुलशन बावरा आणि प्रकाश मेहरा यांची आणि संगीत दिले होते, कल्याणजी-आनंदजी यांनी. या चित्रपटातील प्राणच्या तोंडी असलेले आणि मन्ना डे यांनी गायलेले “यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी” हे गाणं जबरदस्त हिट झाले.त्यासोबतच “दिवाने है दिवानोको ना घर चाहिये” हे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे देखिल हिट झाले होते.मुख्य म्हणजे यात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एकही गाणं नव्हतं.”
चित्रपटाची कथा
दिवाळीच्या दिवशी तेजा (अजित) नांवाचा गुंड,विजय
खन्ना (अमिताभ बच्चन) नावाच्या लहान मुलाच्या डोळ्यादेखत त्याच्या आई वडिलांची हत्या
करतो.हा गुंड तेजा त्याच्या हातात एक साखळी (जंजीर) लावलेले घडयाळ घालून आणि पांढऱ्या
घोड्यावर बसून आलेला असतो.या अत्यंत क्लेशकारक घटनेमुळे,
विजयला पांढऱ्या घोड्याची वारंवार भयानक स्वप्ने पडतात.लहानपणी विजय
इतर मुलांपासून दूरदूरच असतो आणि स्वत:ला एकटा मानतो. 20 वर्षांनंतर,विजय एका गावात इन्स्पेक्टर बनून जातो.तिथे त्याच्याकडे शेरखान (प्राण) नावाच्या स्थानिक व्यक्तीबद्दल तक्रारी
येतात,ज्याचा जुगाराचा अड्डा असतो.जेव्हा तो खानला चौकशीसाठी
बोलावतो,तेव्हा शेरखानचा आत्मसन्मान जागृत होतो.तो जात नाही.तो
विजयला खडसावतो.त्याची आणि विजयची लढाई होते. लढाई नंतर शेरखान इंस्पेक्टर विजयशी दोस्ती
करतो,त्याचे जुगाराचे अड्डे बंद करतो आणि विजयला सहकार्यांचे आश्वासन देतो.शेरखान ऑटो
मेकॅनिक बनतो आणि त्याचा मार्ग सुधारतो. क्राइम सिंडिकेटचे विविध व्यवहार संपूर्ण
शहरात अव्याहतपणे सुरू असतात.ते सर्व तेजा नावाच्या गुंडाची टोळी करत असते.
या टोळीच्या सदस्यांनी केलेल्या
ट्रॅफिक अपघातात अनेक मुलांचा मृत्यू होतो,या गुन्ह्याची
माला (जया भादूरी) नावाची स्ट्रीट परफॉर्मर साक्षीदार असते.तिला शांत राहण्यासाठी
तेजाच्या माणसांकडून लाच दिली जाते.विजयला हे कळते,तेव्हा विजय मालाला मुलांचे छिन्न
विछिन्न मृतदेह दाखविण्यासाठी तिला
शवगृहात घेऊन जातो.मालाचे मन पाझरते. ती तिला मिळालेली लाच एका अनाथाश्रमाला दान देऊन
टाकते. ती ट्रॅफिक अपघात घडविणाऱ्या त्या माणसाला ओळखते. मालाने आपला शब्द
मोडल्याचे समजल्यानंतर, तेजाचे लोक रात्रभर तिचा पाठलाग
करतात. ती धावत पळत रेल्वे रुळ ओलांडून पळून जाते आणि आश्रयासाठी हताश होऊन
विजयच्या घरी पोहोचते.तो तिला राहण्याची परवानगी देतो आणि दोघांना कळते की ते
दोघेही अनाथ आहेत.विजय तिला त्याच्या भावाकडे आणि वहिनीकडे घेऊन जातो. या घटनेमुळे
तेजा चेकाळतो आणि खोटे कुभांड रचून तेजा विजयला खोट्या लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करायला
भाग पडतो.विजयला खोट्या आरोपाखाली 6 महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागतो.विजय
तुरुंगातून सुटल्यावर बदला घेण्याची योजना आखतो.शेवटी विजय आपल्या आई-वडिलांच्या मारेकऱ्याला
शोधून काढतो आणि त्यांच्या खुनाचा बदला घेतो.अशी ही एकंदर कथा आहे.
या चित्रपटाच्या वेळेसच अमिताभ बच्चन आणि
जया भादूरी यांच्यात विवाह निश्चिती झाली असे म्हटले जाते.आज जरी पाह्यला मिळाला तरी
पहायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे.अमिताभ बच्चनच्या विजय खन्ना या भूमिकेनंतर त्यांच्या
यानंतर आलेल्या अनेक चित्रपटात त्यांनी अभिनित केलेल्या पात्राचे नांव विजयच असायचे
हे विशेष.या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि प्राण यांनी अनेक सफल चित्रपटातून सोबत
काम केलं.
सारांश
अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट आधी एवढा
चालला नाही, पण नंतर या चित्रपटाने चित्रपटगृहात 25 आठवडे पूर्ण केले.या चित्रपटानंतर
अनेक तरुण लोक अभिताभचे फॅन झाले. त्यात मीही एक होतो.त्यानंतर ओळीने आलेले सगळे चित्रपट
मी अगदी दर शनिवारी एक असे पाहिले. वाचकांमध्ये असे बरेच असतील याची मला खात्री आहे. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट
बॉक्समध्ये जरूर लिहा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
यारी हैं ईमान मेरा यार मेरी जिंदगी👍👌
ReplyDelete