Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

लिना चंदावरकर-सुस्वरुप अभिनेत्री

 Blog No.2023/227

Date:- 30th, August,2023. 

मित्रांनो,

            1969 ला सुनील दत्तने त्याचा भाऊ सोम दत्त याला चित्रपटात आणण्यासाठी ज्याला introduce म्हणतात. तसं introduce करण्यासाठी “मन का मीत” बनविला.मुख्य म्हणजे या चित्रपटात एकूण तीन नवे चेहरे होते. एकक सोमदत्त, दूसरा लिना चंदावरकर आणि तिसरा म्हणजे विनोद खन्ना.पण नशीब बघा कसं असतं. ज्याच्यासाठी चित्रपट काढला,त्याला ब्रेक न मिळता लिना चंदावरकर आणि विनोद खन्ना यांना ब्रेक मिळाला. लिना चंदावरकर तरी 25 वर्षी लग्न करून चित्रपटसृष्टीतून निघून गेली होती.पण विनोद खन्नाने आधी खलनायक आणि त्यानंतर नायकाच्या आणि सहनायकाच्या भूमिकेत काम करून काही वर्षे गाजविली.अमिताभ बच्चन सोबत त्याची जोडी बरीच गाजली. आज लिना चंदावरकर हिचा जन्म दिवस. तिचे अभिष्टचिंतन करण्यासाठी हा ब्लॉग.                    

 पूर्वायुष्य

लिना चंदावरकरचा जन्म 1950 मध्ये कर्नाटकातील धारवाड येथे कोकणी मराठी भाषिक सेना अधिकारी श्रीनाथ चंदावरकर यांच्या घरात झाला. तिचे पहिले पती सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी तिचा विवाह झाला, ते गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे बंधु. लग्नानंतर काही दिवसांतच बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेमुळे त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि लीना वयाच्या २५ व्या वर्षी विधवा झाली.नंतर तिने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.किशोरकुमार आणि लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमितकुमार हा सुद्धा गायक आहे. लग्नानंतर तिने बॉलीवूड सोडले. 1987 मध्ये किशोर यांचे निधन झाले, लीना पुन्हा एकदा वयाच्या 37 व्या वर्षी विधवा झाली.

करिअर

सुनील दत्तच्या दिग्दर्शनाखाली 1968 मध्ये मन का मीत या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आणि सुनील दत्त यांच्या पत्नी नर्गिसने तिला अभिनेत्री बनवले. हेमा मालिनी आणि मुमताज यांच्यासोबत ७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील ती सर्वोच्च नायिकांपैकी एक होती. तिचा एक मोठा भाऊ अनिल चंदावरकर होता.१९६९ ते १९७९ दरम्यान लीनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

तिने सास भी कभी बहू थी आणि चिंगारी मध्ये संजय खानसोबत,तिने जितेंद्र सोबत जवाब,हमजोली,बिदाई नालायक आणि सरफरोश हे चित्रपट केले.राजेश खन्ना सोबत मेहबूब की मेहंदी, ममता की छावो में हे चित्रपट केले. मैं सुंदर हूं” आणि :नामी चोर विश्वजित सोबत, शम्मी कपूर सोबत जाने-अंजाने आणि प्रीतम हे चित्रपट केले. संजीव कुमार सोबत “अनहोनी’’, इमान इमली”,”मनचली”, अपने रंग हजार’ हे चित्रपट केले. धर्मेंद्र सोबत “रखवाला”, “एक महल हो सपना का” हे चित्रपट केले. राज कुमार सोबत “दिल का राजा”, “हनीमून अनिल धवन सोबत, राकेश रोशन सोबत “एक कुंवारी एक कुंवारा”, “चोर चोर” विजय आनंद सोबत, शत्रुघ्न सिन्हा सोबत “जग्गू”,” यारों का यार” काम केले. “कैद”, “डाकू और जवान”, जालीम” हे चित्रपट विनोद खन्नासोबत केले. सुनील दत्त सोबत “आखरी गोली”, दिलीप कुमार सोबत “बैराग” आणि नवीन निश्चल सोबत “आफत” हे चितपट केले. “प्यार अजनबी है किशोर कुमार सोबतचा हा चित्रपट प्रकाशित झाला नाही.  तिने 1971 मध्‍ये राजेश खन्‍नासोबत मेहबूब की मेहंदीमध्‍ये तिचा सर्वोत्‍तम परफॉर्मन्स दिला.

 आता रिअलिटी शो मध्ये काम केले  

डिसेंबर 2007 मध्ये सोनी टीव्हीने सुरू केलेला नवीन रिअॅलिटी टीव्ही सिंगिंग शो, "के फॉर किशोर" च्या पहिल्या 2 भागांसाठी ती अतिथी न्यायाधीश म्हणून दिसली. ती आता रिअॅलिटी शोसाठी हजेरी लावत आहे. तिने एका म्युझिक अल्बमसाठी अमित कुमार आणि राजेश बांबल यांच्यासाठी काही गाणीही लिहिली.

 सारांश

            लिना चंदावरकर चित्रपटसृष्टीत आली,ती अशा एका चित्रपटातून,जो चित्रपटाचा हीरो सोमदत्त साठी लॉंच झाला होता. पण ती सुदैवी ठरली, त्याचा तिला अधिक फायदा झाला. ती चित्रपटसृष्टीत स्थिरावली.अनेक मोठमोठ्या नायकांसोबत काम केले. एक आघाडीची नायिका असतांना ती लग्न करून निघून गेली.25 व्या वर्षी विधवा झाली. 5 वर्षांनी किशोरकुमार सोबत लग्न केले.37 व्या वर्षी पुन्हा विधवा झाली सध्या त्या अमितकुमार,त्याची पत्नी आणि सुमितकुमार सोबत रहाते.लिना चंदावरकर यांना जिवनाची 73 वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा.  

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 


प्रसाद नातु,पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...