Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

शिवाजी साटम

 

Blog No. 2023/98       

Date: 21st, April 2023. 




मित्रांनो,

“दया कूछ ना कुछ तो गडबड जरुर है” ह्या CID ह्या हिन्दी मालिकेतील संवादाने लोकप्रिय झालेल्या शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. माजी बँक अधिकारी असलेले शिवाजी साटम ह्यांच्या वैशिष्ठपूर्ण अभिनयाने CID ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की लोक केवळ C.I.D मधील ACP प्रद्युम्न या भूमिकेसाठी C.I.D बघत असतं.या भूमिकेसाठी लागणारा उंचापुरा देह आणि शरीरयष्टी त्यांना लाभली आहे.त्या आधी 100 डेज आणि एक शून्य शून्य या मराठी मालिकेत देखिल त्यांनी सुरेख अभिनय केला होता.       


 प्रास्ताविक

            शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल. 1950 चा. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली.त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन देखिल केले.चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरी केली. ते एक बॅंकर आणि इन्सपेक्शन ऑफिसर होते.

 

कारकीर्द

            शिवाजी साटम यांनी 1980 ला रिश्ते नाते या नवीन निश्चल अभिनीत टेलिविजन सिरियल मध्ये काम करून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी वास्तव, गुलाम-ए-मुस्तफा, यशवंत, चायना गेट, टॅक्सी नंबर 9211, नायक, जिस देश में गंगा रहता है, सूर्यवंशम, हू तू तू या हिंदी चित्रपटात आणि दे धक्का, दे धक्का 2, उत्तरायण या मराठी सारख्या चित्रपटातून उल्लेखनीय कार्य केले.

             शिवाजी साटम यांनी 1980 मध्ये रिश्ते-नाते या टीव्ही मालिकेतून पडद्यावर पदार्पण केले. 1988 मध्ये, ते फेमस ट्रायल्स ऑफ इंडिया या मालिकेत दिसले. एक शुन्य शुन्य या मराठी शोमध्ये त्यांनी इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते असंख्य मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसले आणि वास्तव, कुरुक्षेत्र आणि 100 डेज या हिंदी चित्रपटांमुळे  प्रसिद्ध झाले.याशिवाय 1988 मध्ये पेस्तनजी, 100 डेज,यशवंत,युगपुरुष, चायना गेट,वजुद,दाग द फायर, सूर्यवंशम, पुकार, बागी, निदान,कुरुक्षेत्र, जोडी नं 1, या चित्रपटातून ही आपल्या अभिनयाची झलक दाखविली.

            शिवाजी साटम यांनी रिश्ते नाते, एक शून्य शून्य (मराठी) आहट, सी आय डी, अदालत,तारक मेहता का उलटा चश्मा या हिन्दी आणि मराठी टेलिविजन मालिकेत काम केले. सर्वात लोकप्रिय झाली ती सी.आय.डी.ही मालिका जी 1998 ते 2018 अशी 20 वर्षे सुरू होती आणि अजूनही लोक या मालिकेचे जूने भाग आवडीने पहातात.

पुरस्कार आणि सन्मान

            2002 मध्ये इंडियन टेली अवार्ड्स तर्फे त्यांना उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार C.I.D मधील ACP प्रद्युम्न साथी मिळाला होता.

            2002 मध्येच एक होती वादी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार महाराष्ट्र स्टेट फिल्म अवार्ड्स कडून मिळाला होता.

            तसेच “ध्यानी मनी” या नाटकातील भूमिकेसाठी उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार महाराष्ट्र स्टेट फिल्म अवार्ड्स कडून मिळाला होता.

समारोप

            आज शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे. त्यांना माझ्याकडून आणि माझ्या ब्लॉगच्या समस्त वाचकांकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आपल्याला त्यांचा सशक्त अभिनय पहावयास मिळो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना   

 

 

प्रसाद नातु,पुणे.  








Comments

  1. शिवाजी साटम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
    तुमचं लिखाण नेहमीप्रमाणे सुरेख, मुद्देसूद. तुमच्या सातत्यपूर्ण रोज नवीन विषयावर लिहिण्याला दाद द्यायला हवी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...