Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

अवघा रंग एक झाला

Blog No. 2023/102          

Date: 28th, April 2023. 


 मित्रांनो,

          काही दिवसांपूर्वी म्हणजेच 10 एप्रिल,2023 ला गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची जयंती होती. त्यांनी गायलेल्या एका सुंदर भजनाचा मी त्यात उल्लेख केला होता.संत सोयराबाई म्हणजे संत चोखोबांची पत्नी. “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.” किती सुंदर अर्थ आहे या भजनाचा. आज आपण पहाणार आहोत या निरतिशय सुंदर भजनाचा अर्थ. मी याला निरूपण म्हणणार नाही.तेवढा माझा अभ्यास नाही.

 अवघा रंग एक झाला         

          तर संत सोयराबाई आपल्या अभंगात म्हणतात.

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

       येथे संत सोयराबाई म्हणतात की मी तुझे दर्शन घेतले आणि मी तुझ्या रंगात म्हणजेच तुझ्यात इतकी रंगून गेले की मी एक साधी स्त्री आणि तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस याचे मला भान उरले नाही.माझा रंगच काय माझे सर्वस्व तुझ्यात हरवून गेले आहे.    

          मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥ 

          हे पंढरीच्या राया तुला पहाताच माझे मी पण गळून पडले आहे .तू माझ्याहून कुणी वेगळा आहेस ही भावना देखिल नष्ट झाली.हे सर्व तुझ्या दर्शनाचे महात्म्य आहे की  माझ्यातला अहंभाव नाहीसा झाला.माझ्यातले मी पण लयाला गेले.मी आणि तू कुणी वेगळे नाही,परमेश्वरा या अद्वैताचे भान मला झाले आहे.    

नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥ 

जर हे परमेश्वरा मी, मी तू हा भेद विसरून गेले आणि अद्वैताचे भान मला झाले आहे. तर तिथे भेदाभेद कुठून असणार. तो भेदाभेद नष्ट झाला आणि क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास, लोभ हे सारे केव्हाच दूर निघून गेलेत.   

 देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥

हे परमेश्वरा मला अद्वैताचे भान झाल्यामुळे माझ्या देहात तू असूनही मी तुझे निर्गुण रूप अनुभवते आहे.माझे सगुण रूप तुझ्यात सामावले आहे.तू चरचरात सामावला आहेस.तू सगुणांत आहेस पण हे परमेश्वरा मी तुला समाद्धीस्त अवस्थेत अनुभवत आहे.    

पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥

हे परमेश्वरा तुला भेटण्याची आणि तुला पाहण्याची आस उरात होती. आता ही चोखीया ची महारी म्हणजे पत्नी,सोयराबाई म्हणते आहे की एकदा तुझे रूप पाहिल्यानंतर काही दुसरे किंवा अन्य काही पहायची इच्छा राहिली नाही. 

समारोप

          संत सोयराबाई यांची अवीट भक्ति होती. प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाले आणि त्या स्वतःला विसरून गेल्या. त्यांचे स्वत्व गळून पडले, काम, क्रोध पळून गेले, त्यांना अद्वैताचा साक्षात्कार झाला.एवढे की बस आता तुझे रूप पाहिले,आता ह्या जगी काही पहाण्याची आसक्ती उरली नाही असे त्यांना वाटू लागले.थोडक्यात काय तर खरा भक्त काय असतो आणि त्याचे ईश्वराशी तादात्म पावणे काय असते.हे संत सोयराबाईंनी या अभंगातून दाखवून दिले आहे.त्या स्वतःचे नांव देखिल अभंगात न गुंफता म्हणे चोखीया ची महारी म्हणत असतं. खरोखर कुठलेही शिक्षण नसतांना एवढे प्रगल्भता हे परमेशाचेच देणे होय. 

 

प्रसाद नातु,पुणे                   

  




 

Comments

  1. खूप छान. अवघा रंग एक झाला की, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया अशी स्थिती होते.
    अनंत मिसे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...