Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

"पहिले भारतीय गाव माणा."

 Blog No. 2023/105          

Date: 30th, April 2023. 

 

 मित्रांनो,

            आपल्या देशात काही नवीन गोष्टी घडत आहेत.ह्याचे श्रेय निश्चितपणे केंद्र सरकारला आणि त्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.गोष्टी लहान लहान असतात पण हिंदीत म्हणतात ना “छोटी छोटी बाते भी माईने रखती है.” बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने माणा गावात एक साइनबोर्ड लावला आहे, जिथे लिहिले आहे "पहिले भारतीय गाव माणा." हेच माणा गाव पूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे. आजच्या ब्लॉग मध्ये सविस्तर जाणून घेऊया.

प्रास्ताविक

माणा हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले आहे आणि भारतातील अनेक सीमावर्ती गावांपैकी एक आहे.माणा हे गांव आकाराने जरी लहान असले,तरी लोकप्रियतेचा विचार करता ते खूप महत्वाचे आहे. माना गावाबद्दल येथे काही मनोरंजक तथ्ये आहेत.त्यातील एक म्हणजे, हे गाव पांडवांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.

माणा गावापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या बद्रीनाथच्या पवित्र मंदिराच्या सान्निध्यासाठी देखील माणा ओळखले जाते.हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 3,200 मीटर (10,500 फूट) उंचीवर वसलेले आहे आणि येथे रस्त्याने जाता येते.बद्रीनाथ यात्रेला जात असताना बरेच लोक माणाचे दर्शन घेतात.माणा गाव हे बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या एका सुंदर दरीत वसलेले आहे. हे गाव हिमालयाचे विस्मयकारक दृश्य देते आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.माणा गावाला समृद्ध इतिहास आहे आणि भारतातील सर्वात जुन्या वस्ती असलेल्या गावांपैकी एक असल्याचे मानले जाते.

 माणा गावाचे वैशिष्ठ

माणा गाव भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले असल्याने, त्यावर भारतीय आणि तिबेटी दोन्ही संस्कृतींचा प्रभाव आहे. गावामध्ये वास्तुकला, खाद्यपदार्थ आणि परंपरा यांचे अनोखे मिश्रण आहे, जे स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या अनेक पर्यटकांना आकर्षित करते.

केंद्राचा व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम

केंद्राच्या व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचे कौतुक करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सीमावर्ती भाग अधिक चैतन्यशील झाला आहे.ट्वीटरवर मुख्य मंत्री पुढे म्हणाले की २१ ऑक्टोबर,२०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणा या गावाचे “देशाचे पहिले गांव माणा” असे नामकरण केले होते.केंद्राच्या व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमानुसार सीमावर्ती भागातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरविले आहे.ज्यात सीमावर्ती भागातील लोकांच्या स्थानिक संस्कृती, ज्ञान आणि वारसा यांना चालना देऊन आणि समुदाय आधारित संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पर्यटनाच्या क्षमतेचा उपयोग करून गावांचे जीवनमान उंचावणे इत्यादिचा समावेश आहे.ज्यामुळे येथील लोकांमध्ये देशाप्रती प्रेमभावना वाढीस लागेल.देशाच्या सुरक्षेप्रती लोक जागरुक होतील.          

माणा गावात कसे जायचे?

हवाई मार्गे:- माणा येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ डेहराडूनचे जॉली ग्रांट विमानतळ आहे, जे माणा गावापासून सुमारे 222 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून, माणा येथे जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसने जाऊ  शकता.

रेल्वेने:- माणा येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश येथे आहे,जे माणा गावापासून सुमारे 202 किमी अंतरावर आहे.

बसने:- माणा येथे बसने जाण्यासाठी तुम्हाला चमोलीला जावे लागेल. चमोलीला जाण्यासाठी ऋषिकेश, हरिद्वार आणि डेहराडून सारख्या शहरांमधून बस घेऊ शकता.चमोली येथून टॅक्सी भाड्याने घेऊ जाऊ शकता किंवा माणा गावात जाण्यासाठी सामायिक जीप करू शकता.

समारोप

          तर चला या उन्हाळ्यात हिमाचल मधील इतर ठिकाणच्या नियोजनासोबत माणा ला जायचे नियोजन करा आणि देशाच्या पहिल्या गांवी कसे पोहोचायचे ते मी वर दिलेच आहे.आता निरोप घेतो. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मधे तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवारातील सदस्यांची काळजी घ्या.    

 फोटो सौजन्य@ETV 

 

प्रसाद नातु,पुणे

  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...