Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

निद्रिस्त किंवा अचेतन मनाची शक्ती

Blog No. 2023/20  

Date 23 rd, January 2024.

मित्रांनो,

            आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे,हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर,आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले,कॉलेज मनासारखे मिळाले नाही,नोकरी मनासारखी मिळाली नाही,नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही,बॉस मनासारखा मिळाला नाही,अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो, काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो, आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्मक घडण्यात होतो. “मन चिंती ते वैरी न चिंती” असे म्हणतात. हे मनच आपलं वैरी होतं.कां,कसं ते पाहू या पुढील पॅराग्राफ मधे.

The Power of your Sub-Conscious Mind

डॉ जोसेफ मर्फी ह्यांचे हे पुस्तक आहे,The Power of your Sub-Conscious Mind.त्यांना हे पुस्तक का लिहावेसे वाटले या बद्दल ते लिहितात. “जीवनात माणसाला हे प्रश्न नेहमी पडतात की,एखादा माणूस हा नेहमी सुखी,आनंदी रहातो.तर त्याच वेळा दुसरा माणूस दुःखी आणि निराश.एखाद्या कडे दृष्ट लागावे असे घर.तर दुसऱ्यास रहाण्यास पुरेसे असे घर देखील नाही.एखादा चांगल्या स्वभावाचा, दयाळू आणि धार्मिक माणूस जीवन जगण्यासाठी झगडत असतो.तर एखादा गुंड,मवाली ऐश्वर्यात लोळत असतो.अशा साऱ्याच प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात मिळतील,असे लेखकाचे म्हणणे. 

काय लिहिले आहे ह्या पुस्तकात

पुस्तकात पुढे म्हंटले आहे की,माणसाचे एकाच वेळी Conscious आणि  Sub- conscious म्हणजेच बाह्य मन आणि आंतरिक मन किंवा जागृत आणि निद्रिस्त मन कार्यरत असतात.काय चांगले आणि काय  वाईट हे निवडण्याचे कार्य मात्र जागृत किंवा बाह्य मन करीत असते.आंतरिक मन किंवा निद्रिस्त मन हे शेतासारखे असते.त्यात जे पेराल तसेच उगवेल.पेरण्याचे काम जागृत किंवा बाह्य मन करीत असते.सकारात्मक विचार का करायचा हे त्यासाठी म्हटले जाते.आपल्या आंतरिक किंवा निद्रिस्त मनात,अशक्य ते देखील घडवायची शक्ती  आहे,असे लेखक म्हणतो.आंतरिक किंवा निद्रिस्त मन,हा आपल्या शरीरात असलेला सुप्त खजिना आहे. आपल्याला काय हवे ते त्याचा वापर करून आपण प्राप्त करु शकतो.आपण दिवस भर जे विचार करीत असतो ते. रात्री आंतरिक किंवा निद्रिस्त मनात store किंवा save केले जाते आणि मग आंतरिक किंवा निद्रिस्त मन त्यावर कार्य करायला लागते.म्हणजे आपण जसा विचार करतो तसेच घडते.

            ह्या पुस्तकात मानसिक स्वस्थ,संपत्ती,यश मिळविणे,श्रीमंत होण्यासाठी,सौख्यपुर्ण वैवाहिक जीवनासाठी, भीती घालविण्यासाठी,एवढेच काय तर शांत झोप लागण्यासाठी काय करावे.ह्याचे वेगवेगळे उपाय सांगितले आहे.खरे तर फार पूर्वी पासून असे म्हटले जाते की “मन चिंती ते वैरी ना चिंती” म्हणून वाईट विचार करीत जाऊ नकोस,असे सांगितले जायचे.तसेच असेही म्हटले जायचे की,काही वाईट विचार घरात बोलू नये,वास्तुदेवता तथास्तु म्हणते.म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी बोलायला हव्यात.असेच पूर्वी वेगळ्या भाषेत सांगितले जायचे.पण आपण मनावर घेतले नाही/घेत नाही.परदेशी लोकांनी सांगितले की आपल्याला पटते. 

अचेतन मनाच्या शक्तीची गोष्ट  

          लेखकाने एका Caruso नावाच्या गायकाची गोष्ट यात सांगितली आहे.ह्या Caruso ला एका संगीत मैफिल मध्ये एकदा गायचे असते.त्याला स्टेजवर जाण्याआधी एका अनामिक भीतीने ग्रासलेले असते.इतके की त्याचा घसा बसतो.त्याला स्वतःची लाज वाटू लागते.आपण अशा परिस्थितीत गाणार कसे,लोक आपल्याला हसतील.मग तो विंग च्या पाठीमागे येऊन जोरात म्हणतो “माझ्या मोठ्या मना (सब-कॉनशियस), माझे छोटे मन (कॉनशियस) माझा गळा आवळण्याचा प्रयत्न करीत आहे”. मग तो लहान मनास म्हणतो “हे लहान मना,माझे मोठे मन माझ्या माध्यमातून गाण्याचा प्रयत्न करीत आहे.तू दूर हो,तू बाजूला हो,तू  दूर हो,तू बाजूला हो.”अन काय आश्चर्य त्याचे अंतर्मन जागृत होते.त्याच्यातील अंतर्गत शक्ती घशापर्यंत पोहोचतात.त्याच्या नावाचा पुकारा होतो.तो  स्टेजवर जाऊन असे काही गातो की रसिक प्रेक्षक बेभान,वेडे होऊन नाचू लागतात.

काय काय करू शकते अचेतन मन

लेखक म्हणतो तुमचे अंतर्मन प्रतिक्रियाशील असते.त्याला तुम्ही साद घाला.ते लगेच प्रतिसाद देते.पण तुम्ही त्याला साद घालतांना,अर्थातच सकारात्मक साद घाला.लेखकाने यात आपले अंतर्मन काय काय करू शकते,ह्याची दिलेली यादी म्हणजेच हे पुस्तक.

1. यशाचा भागीदार म्हणून तुमचे अवचेतन मन काम करते.

2. झोप चांगली लाभावी म्हणून तुमचे अवचेतन मन मदत करु शकते.

3. वैवाहिक समस्या सोडविण्यात तुमच्या अवचेतन मनांची मन होऊ शकते.

4. सुसंवादी संबंध राखण्यासाठी तुमच्या अवचेतन मनाची कशी मदत होऊ शकते.

5. भीती, मानसिक अडथळे दूर करण्यासाठी तुमचे अवचेतन मन कसे वापरावे.

6. कुणाला माफ करावयाचे असल्यास तुमचे अवचेतन मन कसे वापरावे. आणि

7. स्वतःला कायम तरूण राहायचे असेल तर अवचेतन मन कसे वापरावे..         

मी यातील शांत झोप लागण्यासाठी आणि तब्येत ठिक नसतांना बऱ्याच वेळा हा प्रयोग करून पाहिला आणि तो ही यशस्वीपणे.हे पुस्तक वाचल्यावर आधीच सकारात्मक विचार करण्याऱ्या माझ्यावर,असा परिणाम झाला की,मी आजकाल “नाही” हा शब्द उच्चारायला  अक्षरशः घाबरायला लागलो आहे.न जाणो माझ्या sub-conscious मनाने ऐकले तर. हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे, फक्त . तर तुम्ही वाचा आणि सांगा काय परिणाम होतो ते.

 

                    प्रसाद नातु,पुणे                       

         

Comments

  1. अगदी खरं आहेसध्या च्या परिस्थितीत कायम सकारात्मक राहणे खूप गरजेचे आहे पुस्तक वाचायला हवे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...