Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

बुलेट बाबा मंदिर

 

Blog No. 2023/16 

Dated 19th, January 2024.  




मित्रांनो,  

               आपण काही वेळेस काही ठिकाणांना जातो,त्या वेळेस आपल्या काही तरी वेगळेच बघायला मिळतं. बासरला ज्ञान सरस्वतीचे दर्शन हा एक प्रसन्न अनुभव आणि तिथे शिक्षणाचा श्रीगणेशा गिरविण्यास आलेली लहान लहान मुले पाहून कुतुहुल वाटले होते अन काही नवीन अनुभवल्याचे समाधान.देवी देवतांची मंदिरे खूप आहेत पण एका मोटरसायकलच्या मंदिराबद्दल कधी ऐकलेत कां? “बुलेट बाबा मंदिर”, हो चक्क बुलेट मोटरसायकलचे मंदिराबद्दल मी ऐकलेच नाही तर पहिले देखिल. आजचा हा ब्लॉग त्यालाच समर्पित.      

 अजमेरहून जोधपुरकडे

नोव्हेबर 2019 मधे मी माझ्या नोकरीतील शेवटच्या एलटीसीला राजस्थानला गेलो होतो.या ट्रीपमधे मधे 9 नोव्हेबरला,दुपारी 12 च्या सुमारास,आम्ही अजमेर सोडलं अन जोधपूर कडे निघालो.बरेच लांबचे अंतर असल्याने,मधे एक दोन ठिकाणी,चहा साठी कार थांबवली.पण जोधपूर जेव्हा फक्त 50 किमी दूर होतं,तेव्हा त्याने कार थांबवली.तेव्हा मी त्याला विचारलं,अभी क्यो रोक दी कार, तर तो म्हणाला,सर,बुलेट बाबा का मंदिर है.फुल,प्रसाद चढाकर आता हूं.आईये आप भी.पाहिले तर एक बुलेट ठेवली होती आणि लोक तिलाच हार चढवत होते.प्रसाद चढवत होते.कार सुरू केल्यावर,मी कमलेश ला विचारलं, हा काय प्रकार आहे आणि जे ऐकले ते खरोखरचं अमेझिंग आहे. 

बुलेट बाबा मंदिराची कहाणी

खरं तर या जागी,2-4 हॉटेल्स,15-20 हार-फुले,प्रसादाची दुकानं आणि एक मंदिर या शिवाय दुसरे काहीच नव्हतं.या ठिकाणची कहाणी अशी आहे कि,ओम बन्ना उर्फ ओम सिंह राठोड,हा ठाकूर जोग सिंह राठोड,ह्यांचा मुलगा.तो पाली जवळील चोटिला या गांवचा रहिवासी होता.साधारणतः 1991 च्या हिवाळ्यांत,ओम आपल्या गावाकडे, रात्रीच्या वेळेस,आपल्या बुलेट 350 वर चालला होता.त्याचा अपघात झाला आणि या अपघातातच,त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.पोलिसांना ही बातमी मिळताच,त्यांनी पंचनामा करून,बुलेट ताब्यात घेतली आणि पोलिस ठाण्यात आणून ठेवली.आणि आश्चर्य म्हणजे, सकाळी पोलिस बघतात तर, ती बुलेट ठाण्यातून गायब झाली होती. पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यांना कळले,कि बुलेट अपघाताच्या जागी आहे.पोलिसांनी पुन्हा बुलेट ताब्यात घेतली आणि या वेळेस टॅंक पूर्ण रिकामी करून,ठाण्यांत ठेवली.पण दुसऱ्या दिवशी सकाळी,बुलेट गायब होती आणि ती पोलिसांना,अपघाताच्या ठिकाणीच सापडली.पोलिसांनी आता मात्र ती साखळ दंडांनी बांधून ठेवली.तरी तेच.अनेक नाना क्लुप्त्या करून देखिल,हेच घडत होते. 

 बुलेट बाबा मंदिराची स्थापना

शेवटी गावकऱ्यांच्या आग्रहाने आणि जोग सिंह ठाकूरांच्या विनंतीनुसार,ती बुलेट अपघाताच्या ठिकाणीच,ठेवण्यात आली.कालांतराने तिथे एक चबूतरा बांधण्यात आला.तिथे ओम बन्ना चा मोठा फोटो आणि बुलेट ठेवण्यांत आली.अशी आख्यायिका आहे की,ओम बन्ना त्या रोडवरून जाणाऱ्याचे रक्षण करतो.तिथे गाडी अचानक  थांबते किंवा स्लो होते.लोक खाली उतरून ओम बन्ना आणि बुलेटला फुल माला अर्पण करतात आणि पुढे जातात.त्या ठिकाणाला अक्षरशः तीर्थ क्षॆत्राचे स्वरूप प्राप्त झालयं. तिथे हाय वे वर धावणारे,प्रत्येक वाहन थांबत होते.हार फुले घेऊन,लोक ओम बन्ना आणि बुलेटला अर्पण करित होते आणि पुढे जात होते. इतकेच काय तर उदयपूर मध्ये देखिल,ओम बन्नाचे मंदिर बांधल्याचे कळले.माझा अशा गोष्टीवर विश्वास नसला,तरी स्थानिकांच्या श्रध्देपुढे,कधी कधी आपल्याला ही नत मस्तक होणे भाग पडते हेच खरे. कुणाच्याही श्रध्दांना ठेच पोहोचविणे,मला कधी जमलं नाही,सुचलं नाही किंवा तसे करावेसे देखिल वाटले नाही.कारण आपल्या स्वतःच्या देखिल काही श्रध्दा असतात.त्यावर कुणाचे कमेंटस,आपल्याला चालत नाहीत.तेव्हा तसे मलाही करण्याचा अधिकार नाही.प्रत्येकाने दुसऱ्यांच्या श्रध्दांना जपलं,तर निरर्थक वाद टळतो हेच खरे. 

तर अशी आहे अनोखी कहाणी ह्या बुलेट बाबाची,जी मला राजस्थानात अनुभवास मिळाली.

                                                     

 

प्रसाद नातु, पुणे. 

Comments

  1. खूप सुरेख सर मी पण या मंदिरा बाबत ऐकले होते पण आज तुमच्यामुळे सविस्तर माहिती मिळाली.

    ReplyDelete
  2. Beliefs has its own place.Agree with you not to mess with others beliefs since the outcome is counter productive

    ReplyDelete
  3. "आपल्या स्वतःच्या देखिल काही श्रध्दा असतात.त्यावर कुणाचे कमेंटस,आपल्याला चालत नाहीत.तेव्हा तसे मलाही करण्याचा अधिकार नाही.प्रत्येकाने दुसऱ्यांच्या श्रध्दांना जपलं,तर निरर्थक वाद टळतो हेच खरे."
    🙏 एकदम सही बात

    ReplyDelete
  4. खूप छान माहितीपूर्ण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...