Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

मकर संक्रांत

Blog No.2023/010

Date:- 14th, January 2023.

 मित्रांनो,

            14 आणि 15 जानेवरीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.सर्वप्रथम सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.गोड बोलण्याचे फायदे खूप आहेत.पण ते नंतर कधी तरी.मकर संक्राती बद्दल मी तुम्हाला बरेच काही सांगणार आहे. त्या पैकी सर्व काही किंवा बरेच काही बऱ्याच जणांना माहित असेलही. पण असंही असू शकतं की बऱ्याच जणांना बरेच काही माहित नसेल.ज्यांना माहित असेल त्यांनी आज संक्रांत आहे, गोड मानून घ्या.


मकर संक्रांत

            मकर संक्रांतीला शनि ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.ह्याच दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते.सोप्या भाषेत सांगायचे तर ते त्याचे संक्रमण दक्षिणेकडून किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे किंवा उत्तर गोलार्धाकडे होते.प्रत्यक्षात सूर्य सरकत नाही तर पृथ्वी झुकते.भारतात आणि नेपाळ मधे प्रामुख्याने मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते.तसे ते इतर काही राष्ट्रांमध्ये साजरे केले जाते,त्या संबंधीही माहिती थोडक्यात बघूया.

मकर संक्रांत, सण एक,नावं अनेक

            मकर संक्रांत हा सण आपल्या देशांत सर्वत्र साजरा केला जातो. पण वेगवेगळ्या नांवाने,महाराष्ट्र, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,गोवा,छत्तीसगढ, बिहार,झारखंड, सिक्कीम,मणीपुर,आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राज्यस्थान, जम्मू, केरळ, ओडिशा मधे संक्रांती म्हणून ओळखल्या जातो.तामिळनाडू मधे ताइ पोंगल,उझवर तिरुनल, गुजरात आणि उत्तराखंड मधे उत्तरायण, काश्मीर घाटी मधे शिशुर सेंक्रात, हरियाणा,हिमाचल प्रदेश,पंजाब मधे माघी आणि आसाम मधे भोगाली बिहु, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि पश्चिम बिहार मधे खिचडी,पश्चिम बंगाल मधे पौष संक्रांति आणि कर्नाटकात मकर संक्रमण या नावाने ओळखला जातो.

मकर संक्रांत सण भारताबाहेरील देशांत

            मकर संक्रांत भारतांबाहेर सुद्धा साजरा केला जातो. जसे बांग्लादेशांत पौष संक्रांति, नेपाळमधे माघे किंवा माघी संक्रांति, थायलंडमधे सोंगकरन, लाओसमधे पि मा लाओ, म्यानमार मधे थिंयान,कंबोडिया मधे मोहा संगक्रान आणि श्रीलंकेत पोंगल किंवा उझवर तिरुनल ह्या नांवाने साजरा केला जातो.

विविध प्रांतात साजरा करण्याची प्रथा            

            महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत आपण सर्व जाणता.तेव्हा या बद्दल फक्त एवढेच सांगेन की ह्या दिवशी घरातील वरिष्ट  लहानांना तीळ गूळ देऊन ‘तीळ गूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. ह्या निमित्त महिला, हळदी कुंकवाचे आयोजन करून काही ना काही वस्तु सुवासिनीस देऊन ओटी भरतात, ह्याला वाणं लुटणे असेही म्हणतात.बालकांचे बोरनहाण किंवा लूट करणे असेही म्हणतात.ह्या दिवशी गुळाची पोळी बनविण्याची पद्धत आहे. इतर बरेच काही आहे,पण इथे देत नाही.

            उत्तर प्रदेश मधे मुख्यत: हा सण ‘दान पर्व’ म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवशी प्रयागराजला गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नानाला महत्व आहे.इथे 14 डिसेंबर ते 14 जानेवरी कुठलेही चांगले काम केले जात नाही. 14-15 जानेवरी पासून चांगल्या कामाला सुरुवात करण्यात येते.येथेही तिळाचे गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे.खिचडी खाण्याची आणि खिचडी दान करण्याची प्रथा आहे.

            बिहारमधे ह्या दिवशी उडीद, तांदूळ,तीळ,चिवडा, गाय, सुवर्ण, गरम कपडे इत्यादि दान करण्याचे महत्व आहे. बंगालमधे तीळ दानाची प्रथा आहे. गंगासागर येथे मकर संक्रांतीला मोठा मेळा लागतो.तेथे स्नानाचे एक वेगळे महत्व आहे.  

            तामिळनाडू मधे “पोंगल” चार दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी भोगी पोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल, तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल किंवा केनु-पोंगल आणि चौथ्या दिवशी कन्या-पोंगल साजरा केला जातो. पहिल्या दिवशी कुडा कचरा जमा करून जाळला जातो, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी पशुपूजन केले जाते. चौथ्या दिवशी मुलगी आणि जावयाचा विशेष स्वागत सत्कार केला जातो.

            देशाच्या काही भागात जसे महाराष्ट्रात आणि गुजरातमधे या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. एवढेच नव्हे तर पतंग उडविण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.नुकतीच एक बातमी वाचण्यात आली की,गुजरातमधे आता स्वतःच्या टेरेस किंवा गच्ची पतंग उडविण्यासाठी भाड्याने देण्याचे सुरु झाले आहे.


पौराणिक दृष्ट्या महत्व

            असे म्हटले जाते की ह्या दिवसांत सूर्य हा मकर आणि कुंभ राशीतून जात असतो.ह्या दोन्ही शनि ग्रहाच्या राशी समजल्या जातात. शनि हा सूर्यपुत्र आहे,म्हणून असे मानले जाते की,सूर्य आपल्या मुलास म्हणजे शनिस त्यांच्या घरी भेटावयास जातो.ह्याच विष्णूने असुरांवर विजय मिळविला होता,असेही म्हटले जाते.  

 वैज्ञानिक महत्व

            मकर संक्रांत हा सण ह्या दृष्टीने महत्वाचा आहे की,ह्या दिवशीपासून दिवस थोडा थोडा मोठा होणे सुरु होते आणि रात्र लहान.                                                                         

            पुनः एकवार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि हो “तीळ गूळ घ्या अन गोड गोड बोला”.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे 

 

                                                                                                            

Comments

Post a Comment