Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

मकर संक्रांत

Blog No.2023/010

Date:- 14th, January 2023.

 मित्रांनो,

            14 आणि 15 जानेवरीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.सर्वप्रथम सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.गोड बोलण्याचे फायदे खूप आहेत.पण ते नंतर कधी तरी.मकर संक्राती बद्दल मी तुम्हाला बरेच काही सांगणार आहे. त्या पैकी सर्व काही किंवा बरेच काही बऱ्याच जणांना माहित असेलही. पण असंही असू शकतं की बऱ्याच जणांना बरेच काही माहित नसेल.ज्यांना माहित असेल त्यांनी आज संक्रांत आहे, गोड मानून घ्या.


मकर संक्रांत

            मकर संक्रांतीला शनि ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.ह्याच दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते.सोप्या भाषेत सांगायचे तर ते त्याचे संक्रमण दक्षिणेकडून किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे किंवा उत्तर गोलार्धाकडे होते.प्रत्यक्षात सूर्य सरकत नाही तर पृथ्वी झुकते.भारतात आणि नेपाळ मधे प्रामुख्याने मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते.तसे ते इतर काही राष्ट्रांमध्ये साजरे केले जाते,त्या संबंधीही माहिती थोडक्यात बघूया.

मकर संक्रांत, सण एक,नावं अनेक

            मकर संक्रांत हा सण आपल्या देशांत सर्वत्र साजरा केला जातो. पण वेगवेगळ्या नांवाने,महाराष्ट्र, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,गोवा,छत्तीसगढ, बिहार,झारखंड, सिक्कीम,मणीपुर,आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राज्यस्थान, जम्मू, केरळ, ओडिशा मधे संक्रांती म्हणून ओळखल्या जातो.तामिळनाडू मधे ताइ पोंगल,उझवर तिरुनल, गुजरात आणि उत्तराखंड मधे उत्तरायण, काश्मीर घाटी मधे शिशुर सेंक्रात, हरियाणा,हिमाचल प्रदेश,पंजाब मधे माघी आणि आसाम मधे भोगाली बिहु, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि पश्चिम बिहार मधे खिचडी,पश्चिम बंगाल मधे पौष संक्रांति आणि कर्नाटकात मकर संक्रमण या नावाने ओळखला जातो.

मकर संक्रांत सण भारताबाहेरील देशांत

            मकर संक्रांत भारतांबाहेर सुद्धा साजरा केला जातो. जसे बांग्लादेशांत पौष संक्रांति, नेपाळमधे माघे किंवा माघी संक्रांति, थायलंडमधे सोंगकरन, लाओसमधे पि मा लाओ, म्यानमार मधे थिंयान,कंबोडिया मधे मोहा संगक्रान आणि श्रीलंकेत पोंगल किंवा उझवर तिरुनल ह्या नांवाने साजरा केला जातो.

विविध प्रांतात साजरा करण्याची प्रथा            

            महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत आपण सर्व जाणता.तेव्हा या बद्दल फक्त एवढेच सांगेन की ह्या दिवशी घरातील वरिष्ट  लहानांना तीळ गूळ देऊन ‘तीळ गूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. ह्या निमित्त महिला, हळदी कुंकवाचे आयोजन करून काही ना काही वस्तु सुवासिनीस देऊन ओटी भरतात, ह्याला वाणं लुटणे असेही म्हणतात.बालकांचे बोरनहाण किंवा लूट करणे असेही म्हणतात.ह्या दिवशी गुळाची पोळी बनविण्याची पद्धत आहे. इतर बरेच काही आहे,पण इथे देत नाही.

            उत्तर प्रदेश मधे मुख्यत: हा सण ‘दान पर्व’ म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवशी प्रयागराजला गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नानाला महत्व आहे.इथे 14 डिसेंबर ते 14 जानेवरी कुठलेही चांगले काम केले जात नाही. 14-15 जानेवरी पासून चांगल्या कामाला सुरुवात करण्यात येते.येथेही तिळाचे गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे.खिचडी खाण्याची आणि खिचडी दान करण्याची प्रथा आहे.

            बिहारमधे ह्या दिवशी उडीद, तांदूळ,तीळ,चिवडा, गाय, सुवर्ण, गरम कपडे इत्यादि दान करण्याचे महत्व आहे. बंगालमधे तीळ दानाची प्रथा आहे. गंगासागर येथे मकर संक्रांतीला मोठा मेळा लागतो.तेथे स्नानाचे एक वेगळे महत्व आहे.  

            तामिळनाडू मधे “पोंगल” चार दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी भोगी पोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल, तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल किंवा केनु-पोंगल आणि चौथ्या दिवशी कन्या-पोंगल साजरा केला जातो. पहिल्या दिवशी कुडा कचरा जमा करून जाळला जातो, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी पशुपूजन केले जाते. चौथ्या दिवशी मुलगी आणि जावयाचा विशेष स्वागत सत्कार केला जातो.

            देशाच्या काही भागात जसे महाराष्ट्रात आणि गुजरातमधे या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. एवढेच नव्हे तर पतंग उडविण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.नुकतीच एक बातमी वाचण्यात आली की,गुजरातमधे आता स्वतःच्या टेरेस किंवा गच्ची पतंग उडविण्यासाठी भाड्याने देण्याचे सुरु झाले आहे.


पौराणिक दृष्ट्या महत्व

            असे म्हटले जाते की ह्या दिवसांत सूर्य हा मकर आणि कुंभ राशीतून जात असतो.ह्या दोन्ही शनि ग्रहाच्या राशी समजल्या जातात. शनि हा सूर्यपुत्र आहे,म्हणून असे मानले जाते की,सूर्य आपल्या मुलास म्हणजे शनिस त्यांच्या घरी भेटावयास जातो.ह्याच विष्णूने असुरांवर विजय मिळविला होता,असेही म्हटले जाते.  

 वैज्ञानिक महत्व

            मकर संक्रांत हा सण ह्या दृष्टीने महत्वाचा आहे की,ह्या दिवशीपासून दिवस थोडा थोडा मोठा होणे सुरु होते आणि रात्र लहान.                                                                         

            पुनः एकवार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि हो “तीळ गूळ घ्या अन गोड गोड बोला”.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे 

 

                                                                                                            

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...