Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

मकर संक्रांत

Blog No.2023/010

Date:- 14th, January 2023.

 मित्रांनो,

            14 आणि 15 जानेवरीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.सर्वप्रथम सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.गोड बोलण्याचे फायदे खूप आहेत.पण ते नंतर कधी तरी.मकर संक्राती बद्दल मी तुम्हाला बरेच काही सांगणार आहे. त्या पैकी सर्व काही किंवा बरेच काही बऱ्याच जणांना माहित असेलही. पण असंही असू शकतं की बऱ्याच जणांना बरेच काही माहित नसेल.ज्यांना माहित असेल त्यांनी आज संक्रांत आहे, गोड मानून घ्या.


मकर संक्रांत

            मकर संक्रांतीला शनि ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.ह्याच दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते.सोप्या भाषेत सांगायचे तर ते त्याचे संक्रमण दक्षिणेकडून किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे किंवा उत्तर गोलार्धाकडे होते.प्रत्यक्षात सूर्य सरकत नाही तर पृथ्वी झुकते.भारतात आणि नेपाळ मधे प्रामुख्याने मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते.तसे ते इतर काही राष्ट्रांमध्ये साजरे केले जाते,त्या संबंधीही माहिती थोडक्यात बघूया.

मकर संक्रांत, सण एक,नावं अनेक

            मकर संक्रांत हा सण आपल्या देशांत सर्वत्र साजरा केला जातो. पण वेगवेगळ्या नांवाने,महाराष्ट्र, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,गोवा,छत्तीसगढ, बिहार,झारखंड, सिक्कीम,मणीपुर,आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राज्यस्थान, जम्मू, केरळ, ओडिशा मधे संक्रांती म्हणून ओळखल्या जातो.तामिळनाडू मधे ताइ पोंगल,उझवर तिरुनल, गुजरात आणि उत्तराखंड मधे उत्तरायण, काश्मीर घाटी मधे शिशुर सेंक्रात, हरियाणा,हिमाचल प्रदेश,पंजाब मधे माघी आणि आसाम मधे भोगाली बिहु, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि पश्चिम बिहार मधे खिचडी,पश्चिम बंगाल मधे पौष संक्रांति आणि कर्नाटकात मकर संक्रमण या नावाने ओळखला जातो.

मकर संक्रांत सण भारताबाहेरील देशांत

            मकर संक्रांत भारतांबाहेर सुद्धा साजरा केला जातो. जसे बांग्लादेशांत पौष संक्रांति, नेपाळमधे माघे किंवा माघी संक्रांति, थायलंडमधे सोंगकरन, लाओसमधे पि मा लाओ, म्यानमार मधे थिंयान,कंबोडिया मधे मोहा संगक्रान आणि श्रीलंकेत पोंगल किंवा उझवर तिरुनल ह्या नांवाने साजरा केला जातो.

विविध प्रांतात साजरा करण्याची प्रथा            

            महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत आपण सर्व जाणता.तेव्हा या बद्दल फक्त एवढेच सांगेन की ह्या दिवशी घरातील वरिष्ट  लहानांना तीळ गूळ देऊन ‘तीळ गूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. ह्या निमित्त महिला, हळदी कुंकवाचे आयोजन करून काही ना काही वस्तु सुवासिनीस देऊन ओटी भरतात, ह्याला वाणं लुटणे असेही म्हणतात.बालकांचे बोरनहाण किंवा लूट करणे असेही म्हणतात.ह्या दिवशी गुळाची पोळी बनविण्याची पद्धत आहे. इतर बरेच काही आहे,पण इथे देत नाही.

            उत्तर प्रदेश मधे मुख्यत: हा सण ‘दान पर्व’ म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवशी प्रयागराजला गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नानाला महत्व आहे.इथे 14 डिसेंबर ते 14 जानेवरी कुठलेही चांगले काम केले जात नाही. 14-15 जानेवरी पासून चांगल्या कामाला सुरुवात करण्यात येते.येथेही तिळाचे गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे.खिचडी खाण्याची आणि खिचडी दान करण्याची प्रथा आहे.

            बिहारमधे ह्या दिवशी उडीद, तांदूळ,तीळ,चिवडा, गाय, सुवर्ण, गरम कपडे इत्यादि दान करण्याचे महत्व आहे. बंगालमधे तीळ दानाची प्रथा आहे. गंगासागर येथे मकर संक्रांतीला मोठा मेळा लागतो.तेथे स्नानाचे एक वेगळे महत्व आहे.  

            तामिळनाडू मधे “पोंगल” चार दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी भोगी पोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल, तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल किंवा केनु-पोंगल आणि चौथ्या दिवशी कन्या-पोंगल साजरा केला जातो. पहिल्या दिवशी कुडा कचरा जमा करून जाळला जातो, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी पशुपूजन केले जाते. चौथ्या दिवशी मुलगी आणि जावयाचा विशेष स्वागत सत्कार केला जातो.

            देशाच्या काही भागात जसे महाराष्ट्रात आणि गुजरातमधे या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. एवढेच नव्हे तर पतंग उडविण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.नुकतीच एक बातमी वाचण्यात आली की,गुजरातमधे आता स्वतःच्या टेरेस किंवा गच्ची पतंग उडविण्यासाठी भाड्याने देण्याचे सुरु झाले आहे.


पौराणिक दृष्ट्या महत्व

            असे म्हटले जाते की ह्या दिवसांत सूर्य हा मकर आणि कुंभ राशीतून जात असतो.ह्या दोन्ही शनि ग्रहाच्या राशी समजल्या जातात. शनि हा सूर्यपुत्र आहे,म्हणून असे मानले जाते की,सूर्य आपल्या मुलास म्हणजे शनिस त्यांच्या घरी भेटावयास जातो.ह्याच विष्णूने असुरांवर विजय मिळविला होता,असेही म्हटले जाते.  

 वैज्ञानिक महत्व

            मकर संक्रांत हा सण ह्या दृष्टीने महत्वाचा आहे की,ह्या दिवशीपासून दिवस थोडा थोडा मोठा होणे सुरु होते आणि रात्र लहान.                                                                         

            पुनः एकवार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि हो “तीळ गूळ घ्या अन गोड गोड बोला”.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे 

 

                                                                                                            

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...