Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

ओ.पी.नय्यर

 Blog No. 2023/12

Dated 16th, January 2023

मित्रांनो.

            आज अशा एका ग्रेट व्यक्तीवर मी हा ब्लॉग लिहीत आहे, ज्या व्यक्तीने आपल्या कर्णमधुर संगीताने 30-40 वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. 1950 ते 1970 ही 20 वर्षे त्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ (चांगल्या अर्थाने) घातला. मित्रांनो, त्या व्यक्तीचे नांव ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओ.पी. नय्यर आहे. 16 जानेवरी, 1926 ला आताच्या पाकिस्तानमधे लाहोर येथे त्यांचा जन्म झाला. म्हणजे अजून तीन वर्षांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे. आज त्यांची जयंती.

ओ.पी. नय्यर ह्यांच्याविषयी बरेच काही

            मी जरी सेवानिवृत्ती नंतर लेखन सुरु केले,तरी माझे पहिले प्रेम “संगीत” आहे.ओ.पी. नय्यर ह्यांच्याविषयी मला थोडी जास्त आपुलकी वाटण्याचे कारण ते एक संगीतकार आहेत,एवढेच नसून माझे दैवत स्व. किशोरकुमारला पहिल्यांदा गायक म्हणून 1955 मधे “बाप रे बाप” चित्रपटासाठी ओ.पी. नय्यर ह्यांनी संधी दिली. त्या नंतर या दोघांचा 1958 ला “रागिणी” हा चित्रपट आला  होता. पण त्या नंतर ह्या दोघांच्या मधे तेवढे नाते राहिले नाही.

            ओ.पी. नय्यर ह्यांनी मुख्यत्वे मोहम्मद रफी, आशा भोसले आणि गीता दत्त ह्यांच्या सोबत अधिक गाणी केली. आश्चर्य म्हणजे त्यांनी लता मंगेशकर ह्यांच्या सोबत गाणी केली नाहीत. एक तालबद्ध् संगीत हे त्यांचे वैशिष्ठ. 1958 मधे त्यांना “नया दौर” ह्या चित्रपटातील गाण्यांसाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. 1949 ला ‘कनीज’ ह्या चित्रपटास त्यांचे पार्श्वसंगीत होते. 1952 ला ‘आसमान’ ह्या चित्रपटास प्रथम त्यांनी पूर्ण संगीतकार म्हणून संगीत दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 75 चित्रपटांना संगीत दिले.त्यांच्या निवडक चित्रपटांमधे “छम छम छम’, ‘बाज’, ‘आरपार’. मिस्टर अँड मिसेस 55’, ‘’भागम भाग’, ‘सी.आय.डी.’ ‘श्रीमती 420’, ‘उस्ताद’, ‘जॉनी वॉकर’, ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’, ‘हावरा ब्रिज’, ‘फागुन', ‘सोने की चुडीया’, ‘एक मुसाफिर एक हसीना’,’फिर वोही दिल लाया हूं’, ‘कश्मीर की कली’, ‘मेरे सनम’, ‘बहारे फिर भी आयेगी’, ‘हमसाया’, ‘एक बार मुसकुरा दो’ ह्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘ये देश है वीर जवानोका’ हे ‘नया दौर’ ह्या चित्रपटातील गीत एक देशभक्ती गीत म्हणून खूप प्रसिद्धीस पावले. ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’ ह्या गीताचा खरे तर ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ह्या चित्रपटात समावेश केला जाणार होता.पण चित्रपटाला अंतिम स्वरूप देतांना ते वगळले गेले.याच गाण्यासाठी आशा भोसले ह्यांना 1975 साली फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. ओ.पी. नय्यर ह्यांनी हिंदी चित्रपटांना संगीत दिलेच,तर त्या बरोबर ‘निरंजनम’ ह्या तेलगू चित्रपटाला संगीत दिले. ‘जिद’ हा ओ.पी. नय्यर यांचा संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. 28 जानेवरी,2007 ला त्यांचे मुंबईत निधन झाले.

ओ.पी. नय्यर ह्यांची निवडक लोकप्रिय गीते

1. आईये मेहेरबां बैठीये जानेजा  2. कभी आर कभी पार लागा तिरे  3.जाइये आप कहाँ जाएंगे ये नजर लौट के फिर आएगी 4. एक परदेसी मेरा दिल ले गया 5. लेके पहला पहला प्यार 6. हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार क्या 7. पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की 8. आप युही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा 9. तू है मेरा प्रेम देवता 10. मांग के साथ तुम्हारा मैंने 11. इशारों इशारों मैं दिल लेने वाले 12. बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी मेरी जिंदगीमे हुजूर आप आए 13. आँखों ही आँखों मे इशारा हो गया 14. तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्हें बनाया 15. जाने कहाँ मेरा जिगर गया जी अभी अभी इधर था किधर गया जी.

ही तर काही निवडक गाणी आहेत. पण अशा अनेक गीतांनी रसिकांना मंत्र मुग्ध करणाऱ्या,ओ.पी. नय्यर यांना  माझी त्यांच्या 97 व्या जयंती निमित्त आदरांजली.        

                                                                                                                       प्रसाद नातु, पुणे 

Comments

  1. नातूजी सुप्रभात.
    O P नय्यर जी से सम्बंधित जानकारी आपने ब्लॉग द्वारा बहुत अच्छी तरह प्रस्तुत की.
    यहाँ वर्धा में हर वर्ष नय्यर जी की याद में 'एक शाम ओ पी नय्यर के नाम' आयोजित किया जाता हैं जिसके आयोजन में हमारे साथी श्री प्रकाश राइटर एवं श्री नायडूजी का सहयोग होता हैं. आज शाम को इसी कड़ी में सार्वजनिक बजाज ग्रंथालय में उक्त कार्यक्रम का आयोजन किया गया हैं.
    आप संगीत के रसिया तो हो ही साथ ही अब ब्लॉग के द्वारा भी हम सभी ज्ञान वर्धन कर रहे हो जिसके लिए धन्यवाद बधाई.
    जय श्री राम 🙏

    ReplyDelete
  2. अनिल जोगळेकर।ओ. पी. नय्यर ह्यांना 97 व्या जयंती निमित्त आदरांजली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...