आम्हा भारतीयांना संबंध प्रस्थापित करण्याची अतिशय घाई असते. आपल्या शहरांत एखादा जिल्हाधिकारी
आपल्याच आडनावाचा आला की झाले,त्याचे आपले नाते किती जवळचे आहे हे सांगण्याची,आपल्याला
खूप घाई झालेली असते.ही घाई तोपर्यन्त टिकते,जोपर्यंत आपल्याला एखादा अत्यंत जवळचा
मित्र येऊन, कलेक्टर ऑफिस मधले त्याचे काम,आपल्या
ओळखीने, करून देण्याची गळ घालत नाही. असे कुणी काम सांगितलेच तर, पोस्ट मिळाली खूप
गर्व होतो एकेकाला,असेच असते रे,आपल्या लोकांचेच काम करीत नाही.नंतर तो आपला so-called नातेवाईक जिल्हाधिकारी, कसा घाबरट आहे,
नको उगीच आपल्या लोकांचे काम करून, कशाला वादात का पडायचे.किंवा, नाही तो करून देईल
पण नियमाने होत असेल तर करेल, तो माझ्या मित्राचे आहे म्हणून तो कुठलेही नियमात न बसणारे
काम,करून देईल असे नाही.नियमांच्या बाबतीत अतिशय कडक आहे तो ! असे वेगवेगळे दाखले देतील,कारणे
शोधतील आणि सांगतील.
असा तथाकथित ओळखीचा किंवा जवळच्या संबंधातील व्यक्ति दूर असेल,साता समुद्रापार असेल तर मग काही फिकीर नाही असेच काहीसे घडले आहे ते म्हणजे.भारतीय वंशाचे “ऋषि सुनक” ब्रिटनचे पंतप्रधान झाले. खरं म्हणजे ऋषिचे कुळ आणि नदीचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करू नये म्हणतात. पण ऋषिचे (सुनकांचा ऋषि) मुळ शोधून ते भारतीय वंशाचे कसे आहेत, ते शोधून काढले गेले. झालं त्यांचे दादा,परदादा कधी काळी भारतात होते.म्हणून त्यांचा खूप उदोउदो सुरु झाला.
कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या.तेव्हा भारतात अतिशय आनंदी वातावरण होतं. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या. थोडा अधिक विचार केला तर,ह्या दोघांच्या मुळ भारतीय वंशाचे असल्याचा,भारताला काही फायदा होईल.अजिबात नाही.कारण भारतीय रक्तातील तत्व जपण्याच्या (भ्रष्टाचार करतांना,जाती जाती पाळतांना, स्त्रियांवर अत्याचार करतांना सोडून, कारण तत्व जपण्याच्या जीन्स पेक्षा ह्याचे जीन्स अधिक स्ट्रॉंग आहेत.) वृत्तीने ते दोघेही, अमेरिकेत आणि ब्रिटनमधे आपल्यासाठी कसा आपली देशाशी निष्ठा प्रथम, अर्थात अमेरिका आणि ब्रिटनशी आणि भारत वगैरे नंतर असाच पवित्र घेतील ह्यांत वाद नाही. म्हणूनच 23 सप्टेंबर, 2021 ला आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी अमेरिकेत गेले,तेव्हाच नेमका भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ह्यांना भारतातील तथाकथित मानवाधिकाराचा मुद्दा आठवला आणि त्यांनी पंतप्रधानांना त्याबद्दल छेडले देखिल.त्या नंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस, ह्यातील हवाच निघून गेली.
असे ऋषि सुनक ह्यांच्या बाबतीत न होवो
अशी अपेक्षा आहे.पण माझं हेच म्हणणे आहे,की फार अपेक्षा न बाळगलेल्या बऱ्या. ऋषि सुनक भारतीय वंशाचे आहेत म्हणून,एवढीच अपेक्षा करूया की ब्रिटनमधे गेल्या चार वर्षात हे चौथे पंतप्रधान,
किमान त्यांना तरी पूर्ण कारकीर्द पार पाडता यावी.
प्रसाद
नातु,पुणे.
Realistic post
ReplyDelete