Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

संबंध प्रस्थापित करण्याची घाई


                                                                                                                
नमस्कार,  

            आम्हा भारतीयांना संबंध प्रस्थापित करण्याची अतिशय घाई असते. आपल्या शहरांत एखादा जिल्हाधिकारी आपल्याच आडनावाचा आला की झाले,त्याचे आपले नाते किती जवळचे आहे हे सांगण्याची,आपल्याला खूप घाई झालेली असते.ही घाई तोपर्यन्त टिकते,जोपर्यंत आपल्याला एखादा अत्यंत जवळचा  मित्र येऊन, कलेक्टर ऑफिस मधले त्याचे काम,आपल्या ओळखीने, करून देण्याची गळ घालत नाही. असे कुणी काम सांगितलेच तर, पोस्ट मिळाली खूप गर्व होतो एकेकाला,असेच असते रे,आपल्या लोकांचेच काम करीत नाही.नंतर तो आपला so-called नातेवाईक जिल्हाधिकारी, कसा घाबरट आहे, नको उगीच आपल्या लोकांचे काम करून, कशाला वादात का पडायचे.किंवा, नाही तो करून देईल पण नियमाने होत असेल तर करेल, तो माझ्या मित्राचे आहे म्हणून तो कुठलेही नियमात न बसणारे काम,करून देईल असे नाही.नियमांच्या बाबतीत अतिशय कडक आहे तो ! असे वेगवेगळे दाखले देतील,कारणे शोधतील आणि सांगतील.

            असा तथाकथित ओळखीचा किंवा जवळच्या संबंधातील व्यक्ति दूर असेल,साता समुद्रापार असेल तर मग काही फिकीर नाही असेच काहीसे घडले आहे ते म्हणजे.भारतीय वंशाचे “ऋषि सुनक” ब्रिटनचे पंतप्रधान झाले. खरं म्हणजे ऋषिचे कुळ आणि नदीचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करू नये म्हणतात. पण ऋषिचे (सुनकांचा ऋषि) मुळ शोधून ते भारतीय वंशाचे कसे आहेत, ते शोधून काढले गेले. झालं त्यांचे दादा,परदादा कधी काळी भारतात होते.म्हणून त्यांचा खूप उदोउदो सुरु झाला. 

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या.तेव्हा भारतात अतिशय आनंदी वातावरण होतं. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या. थोडा अधिक विचार केला तर,ह्या दोघांच्या मुळ भारतीय वंशाचे असल्याचा,भारताला काही फायदा होईल.अजिबात नाही.कारण भारतीय रक्तातील तत्व जपण्याच्या (भ्रष्टाचार करतांना,जाती जाती पाळतांना, स्त्रियांवर अत्याचार करतांना सोडून, कारण तत्व जपण्याच्या जीन्स पेक्षा ह्याचे जीन्स अधिक स्ट्रॉंग आहेत.) वृत्तीने ते दोघेही, अमेरिकेत आणि ब्रिटनमधे आपल्यासाठी कसा आपली देशाशी निष्ठा प्रथम, अर्थात अमेरिका आणि ब्रिटनशी आणि भारत वगैरे नंतर असाच पवित्र घेतील ह्यांत वाद नाही. म्हणूनच 23 सप्टेंबर, 2021 ला आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी अमेरिकेत गेले,तेव्हाच नेमका भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ह्यांना भारतातील तथाकथित मानवाधिकाराचा मुद्दा आठवला आणि त्यांनी पंतप्रधानांना त्याबद्दल छेडले देखिल.त्या नंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस, ह्यातील हवाच निघून गेली.

            असे ऋषि सुनक ह्यांच्या बाबतीत न होवो अशी अपेक्षा आहे.पण माझं हेच म्हणणे आहे,की फार अपेक्षा न बाळगलेल्या बऱ्या. ऋषि सुनक भारतीय वंशाचे आहेत म्हणून,एवढीच अपेक्षा करूया की ब्रिटनमधे गेल्या चार वर्षात हे चौथे पंतप्रधान, किमान त्यांना तरी पूर्ण कारकीर्द पार पाडता यावी.                                                

                                                                                                                      प्रसाद नातु,पुणे.  

                                                                                                                        88888 18589

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...