ब्लॉग नं. 2026/ 243. दिनांक: 31 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , रक्तातील साखरेच्या नियंत्रणापलीकडे आधुनिक उपचारांची गरज भारतात टाईप 2 मधुमेहाची समस्या अत्यंत वेगाने वाढत असून , सध्या देशात 10 कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत.आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ( IDF) अंदाजानुसार ,2050 पर्यंत ही संख्या 15 कोटींहून अधिक होण्याचा धोका आहे.धक्कादायक बाब म्हणजे , पाश्चात्य देशांच्या तुलनेत,भारतीयांना हा आजार सुमारे एक दशक आधीच जडतो.त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखर कमी करण्यापुरते मर्यादित न ठेवता , संपूर्ण शरीराचे आणि महत्वाच्या अवयवांचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.जाणून घेऊ याबद्दल आधी काही. सविस्तर: मधुमेह: केवळ साखरेची पातळी नव्हे , तर अनेक अवयवांचा धोका: मधुमेहाकडे केवळ ग्लुकोजची पातळी वाढणे म्हणून पाहणे चुकीचे ठरेल.रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात: 1. हृदयविकार आणि पक्षाघात ( Stroke) , 2.दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ( Kidney Disease) , 3.मज्जातंतूंचे नुकसान ( Nerve Damage)...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .