Skip to main content

Posts

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

दही वि योघर्ट: काय फरक आहे?

Blog No. 202 4 /   080.    Date: 24 th , April 202 4.   मित्रांनो,             दही आणि योघर्ट हे दोन अनेकदा समानार्थी शब्द मानले जातात.पण हे शब्द वेगळे आहेत.पण या दोन्ही मधे नेमका फरक काय आणि वजन कमी करण्यासाठी दही आणि योघर्ट यातील कशाचा उपयोग होतो,हे पाह्यला हवे.दही आणि योघर्ट या दोहोंचे स्वरूप सारखेच आहे . प्रत्यक्षात , ही दोन्ही दुधाची भिन्न उत्पादने आहेत , जी वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात आणि विविध आरोग्य लाभ देतात.दोन्ही उत्पादने अत्यंत पौष्टिक आहेत आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानली जातात.यातील जास्त फायदेशीर आहे हे आजच्या ब्लॉग मधे बघू या. सविस्तर: दही वि योघर्ट : काय  फरक  आहे ?             लिंबाचा रस , व्हिनेगर किंवा दही यासारख्या आम्लयुक्त पदार्थाचा वापर करून दूध आंबवून दही बनवले जाते.तर दुसरीकडे , योघर्ट एक दुग्धजन्य पदार्थ आहे,जो बॅक्टेरियाचा वापर करून दूध आंबवून तयार केला जातो.दुधाला आंबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिवाणू...

भात खाणे सोडता येईल काय ?

  Blog No. 202 4 /   079.    Date: 23 rd , April 202 4.   मित्रांनो ,               कुणालाही मधुमेह झाल्याचे निदान झाले की,ज्याला इंग्लिश मधे “ले मॅन” म्हणतात तो देखिल पहिला अनाहूत सल्ला काय देत असेल? तर तो म्हणजे भात खाणं बंद कर. खरं आहे हे की भात न खाण्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.पण म्हणून तुम्ही ठरवलं , की आता मी महिनाभर भात खाणार नाही तर काय होईल. या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये शोधणार आहोत.          सविस्तर महिनाभर भात न खाल्ल्यास काय होईल ? भात खाणे पूर्णपणे सोडून दिल्याने,आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो.तांदूळ , विशेषत: आशियातील अनेकांसाठी मुख्य अन्न आणि दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनला आहे. इतकं की प्रत्येक जेवणात किमान एकदा भात खाल्याशिवाय बरेच लोक राहू शकत नाहीत.पण भातावर आपले अवलंबित्व, आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं असं नाही.भात अत्यावश्यक कर्बोदके पुरवत असतो, पण त्याच वेळा   त्यात स्टार्चचे प्रमाण जास्त अ...

संविधान खतरे मे आहे कां?

  Blog No. 202 4 /   078.    Date: 22 nd , April 202 4.   मित्रांनो ,               आजकाल जो कुणी उठतो आणि ओरड सुरू करतो की “संविधान” वाचवायचं आहे.पण मोदी सरकार पुनः सत्तेत आले तर ते संविधान बदलवतील.आश्चर्य म्हणजे त्यात जे वकिलीची पदवी घेतलेले नेते आहेत,ते देखिल सुरात सुर मिळवून “संविधान बचाव” चा नारा लावतात. तेव्हा मला हसायला येतं.संविधान बदलणे इतके सोपे नाही.या बद्दल आज ब्लॉगमध्ये चर्चा करू या. सविस्तर:-             घटना दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारांना देखिल मर्यादा आहेत.या बाबतीत 1973 च्या केशवानंद भारती प्रकरणात एक “लॅंडमार्क जजमेंट” म्हणता येईल असा निर्णय देण्यात आला.केशवानंद भारती प्रकरण हे भारतीय घटनात्मक कायद्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा पाऊल म्हणून ओळखले गेले आहे.कारण याने संविधानाच्या सर्वोच्चतेची आणि संविधानाच्या मूलभूत संरचनेचे संरक्षण करण्यासाठी,न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याची पुष्टी केली आहे. भारतातील संवैधानिक कायद्...

साखर खरंच वाईट आहे का? तिचे सेवन दररोज किती प्रमाणात करावे.

Blog No. 202 4 /   077.    Date: 21 st , April 202 4.   मित्रांनो,               कुणाला मधुमेह झाला की सर्वात आधी सांगितले जाते की,आजपासून साखर खाणे बंद करा.मधुमेह होण्यासाठी साखरेला पूर्णतः जबाबदार धरले जाते. साखर खरंच वाईट आहे का ? किंवा साखर जर वाईट असेल तर तिचे सेवन दररोज किती प्रमाणात करावे.(अर्थातच मधुमेही नसलेल्यांनी) या विषयावर नुकतेच एक आर्टिकल माझ्या वाचण्यात आले,ते मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे.         सविस्तर:     साखर , तिच्या अनेक रूपांमध्ये , आरोग्य आणि पोषण (न्यूट्रिशन) जगतामध्ये व्यापक चर्चेचा विषय आहे.साखरेचा वाढत्या वजनापासून ते एकूणच आरोग्यावर होणाऱ्या परिणामापर्यंत , साखरेच्या वापराबाबत वादविवाद आणि चर्चा सतत होत असते.पण साखर खरंच तितकी वाईट आहे कां? जितकी ती अनेकदा दाखवली जाते ? आणि आपण दररोज किती प्रमाणात सेवन केले पाहिजे ? आपल्या आहारातील साखरेच्या वापरामागील सत्य उघड करण्यासाठी येथे सर्व तथ्ये आणि मिथकं आपण तपासणार आहोत. साखर वजन वाढण्यास...

बिमा सुगम विम्यासाठी ऑनलाइन ॲप

  Blog No. 202 4 /   076.    Date: 20 th , April 202 4.   मित्रांनो,               मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, आपल्या देशातील विमा नियामक IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने विम्यासाठी एक नवीन ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्याला ‘बिमा सुगम’ म्हणतात.हे असे ऑनलाइन ॲप असेल ज्यात विविध विमा कंपन्यांनी जारी केलेल्या सर्व विमा पॉलिसी शोधता येतील.आता पाहू या सविस्तर.       सविस्तर             ‘बिमा सुगम’ हा एक वन-स्टॉप प्लॅटफॉर्म असेल,जिथे भारतीय विविध विमा कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या, सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी सापडतील आणि जर एखादी पॉलिसी योग्य वाटली तर,उजवीकडे स्वाइप करून   ती पॉलिसी खरेदी करता येईल. IRDAI चे ध्येय प्रशंसनीय आहे.त्यांना भारतातील विमा उद्योगाचा विस्तार करायचा आहे.कारण देशाच्या GDP ( एकूण देशांतर्गत उत्पादन) च्या तुलनेत एकूण विमा प्रीमियमची रक्कम ही केवळ 5% आ...