Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

बिमा सुगम विम्यासाठी ऑनलाइन ॲप

 Blog No. 2024/ 076.   

Date: 20th, April 2024. 

मित्रांनो,  

            मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, आपल्या देशातील विमा नियामक IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने विम्यासाठी एक नवीन ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्याला ‘बिमा सुगम’ म्हणतात.हे असे ऑनलाइन ॲप असेल ज्यात विविध विमा कंपन्यांनी जारी केलेल्या सर्व विमा पॉलिसी शोधता येतील.आता पाहू या सविस्तर.    

सविस्तर

            ‘बिमा सुगम’ हा एक वन-स्टॉप प्लॅटफॉर्म असेल,जिथे भारतीय विविध विमा कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या, सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी सापडतील आणि जर एखादी पॉलिसी योग्य वाटली तर,उजवीकडे स्वाइप करून  ती पॉलिसी खरेदी करता येईल.IRDAI चे ध्येय प्रशंसनीय आहे.त्यांना भारतातील विमा उद्योगाचा विस्तार करायचा आहे.कारण देशाच्या GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन) च्या तुलनेत एकूण विमा प्रीमियमची रक्कम ही केवळ 5% आहे.

            याला विमा व्यवसायाच्या उद्देश्याविषयी जागरूकतेचा अभाव एवढेच एक कारण आहे कां? नाही. याला काही इतर कारणे देखिल आहेत.    

1.       विमा कंपन्यांवर विश्वास नाही:- लोक विमा कंपन्यांवर किंवा विम्यावर पुरेसा विश्वास ठेवत नाहीत. याला कारण हे की ग्राहकांना नेमकी कशासाठी विम्याची गरज आहे, हे विचारात न घेता विमा उत्पादने विकणाऱ्या मध्यस्थांकडून चुकीच्या पॉलिसीची विक्री केली जाते.

2.       दाव्याच्या निपटाऱ्या (Claim Settlement)  बाबतचे खराब अनुभव:- हे देखिल पॉलिसीधारकांच्या तक्रारींचे एक प्रमुख कारण आहे. याशिवाय, लोकांचा असाही एक सामान्य समज आहे की,विमाकर्ते विमा दाव्यांची पुर्तता करत नाहीत.पण या बाबत बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघेल सांगतात की हे खरे नाही.उलट पक्षी प्रीमियममध्ये गोळा केलेल्या प्रत्येक ₹100 साठी, सुमारे ₹.118 इतका खर्च आहे.पण विमा उद्योग हा संभाव्यतेच्या नियमावर चालत असल्याने विमा कंपन्यांना व्यवसाय परवडत नाही,असे नाही.    

3.       विमा खरेदी करणे कठीण वाटते:-बऱ्याच लोकांना विमा पॉलिसी खरेदी करणे,ही एक कठीण आणि त्रासदायक प्रक्रिया वाटते.कारण यासाठी अटी व शर्तींची पानेच्या पाने काळजीपूर्वक वाचावी लागतात त्यामुळे बहुतेक लोक पॉलिसी खरेदी करणे पुढे ढकलतात किंवा ऑफलाइन खरेदी करतात. अशाप्रकारे 60% पेक्षा जास्त जीवन आणि आरोग्य विमा योजना भारतात विकल्या जातात.

4.       उत्पन्नातील विषमता:- भारतात, जिथे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 20% पेक्षा अधिक कमाई हे 1% लोक करतात,तिथे विमा काढणे ही महाग गोष्ट वाटणे साहजिक आहे.

5.       विम्याची स्पष्ट कल्पना नाही:- भारतात बऱ्याच लोकांना विम्याच्या प्रीमियमचे वर्षभरासाठी पैसे द्यायचे आणि वर्ष भरानंतर परत काही मिळणार नाही, ही कल्पना पटत नाही किंवा त्यांच्या गळ्याखाली उतरत नाही.ते विम्याला गुंतवणुकीसारखे मानतात आणि त्यांनी ठेवलेल्या प्रीमियमच्या मोबदल्यात काहीतरी अपेक्षा करतात.एका सर्वेमध्ये आढळून आले आहे की,भारतात विकली जाणारी बहुतेक जीवन विमा उत्पादने बचत-संबंधित असतात.त्यामुळे केवळ इन्शुरेंस कवर असलेल्या पॉलिसीचे प्रमाण कमी आढळून येते.याचाच अर्थ विमा संरक्षण कवच 60% पर्यंत कमी होते.जेव्हा विमाधारक एकुलता एक कमावणारा असेल आणि त्याचा मृत्यू झाला,तर या कुटुंबांना धोका निर्माण होतो.

 

            त्यामुळे हे सारेच IRDAI ला दुरुस्त करायचे आहे.लोकांना विमा खरेदी करणे सोपे करून द्यायचे आहे. आणि 2047 पर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाला योग्य जीवन, आरोग्य आणि मालमत्ता विमा संरक्षण मिळेल हे “बिमा सुगम”चे उद्दिष्ट आहे.

पण बिमा सुगम या मोठ्या समस्या सोडवणार कशा?

            विमा सुगम हा विमा विकणारा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे.1999 मध्ये जेव्हा Fabmart* नावाच्या वेबसाइटने भारतात ऑनलाइन खरेदी सुरू केली, तेव्हा बहुतेक लोकांनी ते वापरले नाही.याचं कारण त्यावेळेस अनेकांकडे इंटरनेट कनेक्शन नव्हते म्हणून नाही,तर लोकांचा या ऑनलाइन इकोसिस्टमवर विश्वास नव्हता.यास थोडा वेळ लागला,परंतु स्नॅपडील, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन उदयास आल्यावर गोष्टी हळूहळू बदलल्या. अर्थातच,त्यांच्या सवलती लोकांना आकर्षित करतात,परंतु पुस्तकांसारख्या छोट्या गोष्टींची विक्री केल्याने लोकांना ते वापरून पहावेसे वाटले.ते काम करत असल्याचे पाहून ऑनलाइन शॉपिंगवर विश्वास निर्माण होऊ लागला आणि आता ऑनलाइन शॉपिंग ही प्रत्येकाची आवडती प्रक्रिया झाली आहे.

            बिमा सुगमकडे डिजिटल युगाचा सहारा आहे.बिमा सुगमकडे ऑनलाइन शॉपिंगच्या मूलभूत गोष्टी आहेत,त्यामुळे  लोक विमा खरेदीसाठी याचा उपयोग करू शकतात. याचे वैशिष्ट असे असणार आहे की, हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो विमा कंपनीला थेट खरेदीदाराशी जोडेल,एजंट किंवा मध्यस्थ,तुमच्या विमा-खरेदी व्यवहारात हस्तक्षेप करू शकणार.तुम्ही एजंटला द्याव्या लागणाऱ्या कमिशनची बचत करू शकता.FY23 मध्ये आयुर्विमा कंपन्यांनी,त्यांच्या एजंटना कमिशन म्हणून गोळा केलेल्या एकूण प्रीमियमपैकी 5% रक्कम दिली.या ॲपमुळे दोन फायदे होणार आहेत. विमा एजेंट किंवा मध्यस्थ तुमच्या माथी चुकीची पॉलिसी थोपणार नाहीत. कंपनीकडून सरळ पॉलिसी खरेदी केल्याने विमा प्रीमियमची रक्कम कमी पडू शकेल.     

            याशिवाय, IRDAI लाही या सेवेसाठी पैसे द्यावे लागणार नाही.तुमच्या सर्व पॉलिसी एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.त्यामुळे कुठल्या पॉलिसीची कुठली इन्शुरन्स कंपनी किंवा ती जीवन, आरोग्य, वाहन किंवा इतर सामान्य कुठली विमा पॉलिसी असली तरीही त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी, दावे करण्यासाठी किंवा तक्रारी मांडण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तुमच्या सर्व पॉलिसीचे व्यवस्थापन करणे तुम्हाला सोपे होईल.ही गोष्ट खरी आहे की हे नवीन व्यासपीठ भारतातील विमा खरेदीदारांना त्रास देणाऱ्या सर्व समस्या सोडवू शकणार नाही.पण तुमचे काम सोपे होईल हे निश्चितपणे सांगता येईल.    

समारोप:-

            मध्यंतरी एका जनरल इन्शुरंस कंपनीचा प्रतिनिधि माझ्या घरी आला होता.मला कधी काळी इंसुलिन घ्यावे लागले होते,त्यामुळे मला हेल्थ इन्शुरंसची सामान्य पॉलिसी मिळणार नाही.मला खास मधुमेही आणि ब्लड प्रेशर साठी एक युनिक पॉलिसी आहे,ती घ्यावी लागेल.असे तो म्हणाला.मी म्हटलं हरकत नाही,तुम्ही मला ब्रोशर द्या,मी वाचतो.ते 6/6 आय साइट असणाऱ्या व्यक्तींना देखिल वाचणे कठीण जाईल अशा फॉन्ट मधील,सगळ्या अटी आणि शर्ती वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की यात 24 महिन्याचा प्रतीक्षा अवधि (waiting period) आहे.म्हणजे 24 महिने मधुमेह आणि ब्लड प्रेशरशी संबंधित कुठला रोग झाला,तर त्याचा क्लेम मिळणार नाही.मग युनिक पॉलिसी कसली? तर अशा गोष्टी या ऑनलाइन ॲपने दूर होणार की नाही माहित नाही.बघू या.    

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. छान माहिती. 🙏
    आर आर जोशी

    ReplyDelete
  2. Media has a lot of work to do here for earning goodwill

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...