Skip to main content

Posts

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

नोटांवरील चित्र आणि बरेच काही

  मित्रांनो,  नोटांवरील चित्र आणि बरेच काही  :-             आज काल देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी सुचवायचे आणि मग  त्याला इतरांनी विरोध करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे  चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या नोटांवरचे महात्मा गांधी यांचे  चित्र बघून देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय ...

संबंध प्रस्थापित करण्याची घाई

                                                                                                                 नमस्कार,               आम्हा भारतीयांना संबंध प्रस्थापित करण्याची अतिशय घाई असते. आपल्या शहरांत एखादा जिल्हाधिकारी आपल्याच आडनावाचा आला की झाले,त्याचे आपले नाते किती जवळचे आहे हे सांगण्याची,आपल्याला खूप घाई झालेली असते.ही घाई तोपर्यन्त टिकते,जोपर्यंत आपल्याला एखादा अत्यंत जवळचा  मित्र येऊन, कलेक्टर ऑफिस मधले त्याचे काम,आपल्या ओळखीने, करून देण्याची गळ घालत नाही. असे कुणी काम सांगितलेच तर, पोस्ट मिळाली खूप गर्व होतो एकेकाला,असेच असते रे,आपल्या लोकांचेच काम करीत नाही.नंतर तो आपला so-called नातेवाईक जिल्हाधिकारी, कसा घाबरट आ...

इस्त्रीचे कपडे की चेहरा

                        इस्त्रीच्या कपड्यावरुन आठवले. आज बहुधा निवृत्तीनंतर पहिल्यांदाच ज्याला फॉर्मल म्हटले जाते ते म्हणजे शर्ट आणि टेरीकॉटची पॅन्ट घालून गेलो असेन. निमित्त होतं, दोन सत्कार सोहोळयांचे.माझा लेखक म्हणून सर्वात आधी सत्कार झाला तो 14 डिसेंबर 2021 ला बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, कोल्हापूरच्या हॉलमधे. झोनल मॅनेजर श्री. हेमंत खेर सर यांच्या  शुभ हस्ते हा सत्कार आणि माझ्या "होस्ट इज घोस्ट" ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन  संपन्न झाले.त्याचा आनंद, मित्रांनो,काही वेगळाच होता.गेल्या 38 वर्षे एक कुटुंब समजून मी ज्या बँक ऑफ इंडियामधे होतो. त्या माझ्या लोकांनी , घरच्या लोकांनी केलेला सत्कार मला रोमांचित करून गेला.                         बरोबर 10 महिन्यांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर,2022 ला वाकड,पुणे येथील शब्दा बुक्स आणि लायब्ररीने कस्पटे सभागृहात  "साहित्यातील योगदाना" बद्दल माझा सत्कार केला. वाकड येथील वाचक प्रेमी मोठ्या संख्येने ह्या कार...

सकाळची सफर

   आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला तरी. रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते. झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते. किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले तर एवढ्या calories कमी होतात,हे बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं नाही...

किशोरावस्थेतील काही प्रसंग

मित्रांनो    चाळीसगाव सुटलं. तसा मी ही आपला प्रवास किशोरवस्थेकडे सुरू केला होता.आमच्या ध्यानी मानी नसतांना आबासाहेबांना सिकंदराबादच्या   डी.बीआर.मिल्स कडून नोकरीची ऑफर आली.ते इंटरव्ह्यु साठी गेले अन तिकडे कामावर रुजू झाले.आबासाहेब आता डी.बीआर.मिल्स, सिकंदराबाद येथे नोकरीला लागले होते.1970 साली रु.1200/-पगाराची नोकरी म्हणजे गंमत नव्हती.हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मधोमध, टॅंक बंद रोडच्या समोर, डी.बीआर.मिल्स अर्थात दिवाण बहादूर रामगोपाल मिल्स. विस्तीर्ण पसरलेला हुसैन सागर अगदी समोर होता.त्यात एक रोटरी पार्क होता. डी.बीआर.मिल्स.ही सिकंदराबाद आणि हैदराबादच्या सीमा रेषेवर होती. कवाडीगुडा हे त्या भागाचे नांव जिथे ही मिल होती.घरातून टॅंक बंद रोडची ट्राफिक दिसत असे.               चाळीसगाव सारख्या लहान गावातून एकदम हैदराबाद-सिकंदराबाद सारख्या मोठ्या गावात रहायला जाणे.एक चॅलेंज होतं हे. हैदराबाद आता इतके मोठे नसले तरी जवळपास 350 वर्षाचा इतिहास आणि एकेकाळी निझामाची राजधानी असलेले शहर होते.हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जु...

माझं बालपण भाग 3 रा

मित्रांनो  चाळीसगाव जरी सुटलं तरी आठवणी सुटल्या नव्हत्या.आमच्या चाळीसगाव मुक्कामातच माझ्या मोठ्या बहिणीचे,सुनंदा ताईचे लग्न झाले.1965 साली तिचे लग्न झाले,ती लहान होती तेव्हा.मी तर अवघ्या 5 वर्षाचा होतो.माझा जन्म झाल्यापासूनचे ते पहिले लग्न.मला जेवढे आठवते त्या प्रमाणे तिचे लग्नही नगर पालिकेच्या शाळेत झाले होते.त्या नंतर 1967 साली नगर पालिकेच्या शाळेत एकदम दोन लग्ने अनुभवायला मिळाली.एक माझ्या मोठ्या मामाचे अनिल मामाचे आणि सुधा मावशीचे.ह्या खरं तर पूर्णतः कौटुंबिक घटना, पण सांगतोय यासाठी की,त्या वेळेसची लग्न ही खरोखर मंगल विवाह असायची, त्यांत पावित्र्य असायचं.जपलं जायचं.आज काल लग्न हा एक इवेंट असतो.                            माझ्या मामा आणि मावशीच्या लग्नातलं आठवतंय.कुणाचे विशेष लक्ष मेनू काय वगैरे याकडे नव्हते.लग्न सकाळी लागलं.त्यानंतर विधी आणि मग पंगतीच जेवण.कुणाला काय आवडतं आहे,काय हवे आहे त्याची दखल घेतली जात होती.सर्व विधी होईपर्यंत वऱ्हाडी मंडळी नवरदेव...

माझं बालपण भाग 2 रा

मित्रांनो,             चाळीसगावला पहिली ते पाचवी,अशी पाच वर्षे शिकलो.ह्याच काळांत बऱ्याच घटना घडल्या.त्यातील एक म्हणजे,माझा धाकटा बंधु श्रीनिवासचा जन्म झाला.त्या वेळी सुतिका गृह वगैरेच्या सोयी लहान गावात नसायच्या.घरीच सुईणीला बोलावून घेत असतं.दुसरी महत्वाची घटना म्हणजे, कोयना नगरचा भूकंप.आधी दारांना कड्या असायच्या,त्या कड्या कोंडयात अडकवून त्याला कुलूप लावले जाई.11 डिसेंबर 1967 च्या पहाटे अचानक दाराच्या कड्या अचानक वाजू लागल्या.माझे वडील आबासाहेब,सर्वात आधी उठले आणि दरवाज्याकडे धावले.चोर असेल का? अशी शंका त्यांच्या मनाला शिवली देखील नव्हती.तर त्यांच्या डिपार्टमेंटला काही प्रॉब्लेम झाला तर नसेल ना,म्हणून कुणी बोलवायला आले असेल.बराच वेळ कड्या वाजलेल्या मी ऐकल्या आणि पाहिल्या.स्वयंपाकघरांत कपाटांत लावून ठेवलेले डब्बे,भांडी सारेच खाली पडले होते.आता सारखी त्या वेळेस प्रसार माध्यमे नव्हती. प्रसार माध्यम एकच तो म्हणजे रेडियो.आबासाहेबांनी मला ऑर्डर केली.“राजा, पटकन रेडियो लाव. रेडियोवर न्यूज सुरू होत्या.       ...