Skip to main content

Posts

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

बुलेट बाबा मंदिर

माझ्या नोकरीतील शेवटच्या एल टी सी साठी मी राजस्थान ची निवड केली . भारंभार प्रेक्षणिय स्थळ न निवडता. जयपूर , रणथंबोर, अजमेर जवळील पुष्कर सरोवर, अजमेर शरीफ दरगाह, जोधपूर आणि उदयपूर असा दौरा होता. 4 नोव्हे ते 11 नोव्हे 2019. जातांना येतांना फ्लाईट असल्याने वेळेची बचत झाली आणि प्रत्यक्ष साईट सिईंगला वेळ देता आला. तुम्हाला वाटेल कि आता ह्या ट्रीपचे वर्णन या ब्लाॅग मधे असणार काय? नाही बिल्कुल नाही कारण साईट सिईंग म्हटल कि मला पु ल देशपांडेंनी केलेले वर्णन आठवतं. म्हणून तसल काही करणार नाही. पण मला राजस्थान मध्ये काही वेगळं आढळलं ते सांगणार आहे.       राजस्थान मध्ये किल्ल्यांचा रखरखाव पहाण्यासारखा आहे. तिथे किल्याचा काही भाग सरकारने व्यवसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जसे हॅडी क्राफ्ट , राजस्थानी पेहराव , कारिगरी चे स्टाॅल इ. या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे किल्ले सुस्थितीत आहेत. आपल्या इथे असे काही करायला हवे. असे मला वाटून गेले.     पर्यंटनाला वाहिलेले लोक आहेत. आम्ही ज्या टूर कंपनी...

एक अनोखी सफर भाग 3

मग घरातून जेवायला यायचं निमंत्रण आलं. डाॅक्टरांच्या बहिणीने खुप छान जेवण बनवलं होत.चुलीवरचं जेवण साधंच होत. पण खुपच चविष्ट होतं. खुप दिवसांनी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला होता. गप्पा मारता मारता जेवणं आटोपलं होतं. आमच्या रहाण्याची  व्यवस्था गव्हर्मेट रेस्टहाऊस मध्ये करण्यांत आली होती. आमचे सामान गाडीत ठेवलेले होते. आम्ही टॅक्सीत बसलो. गावाच्या बाहेर अर्थात गांव सुरू होता होताच  रेस्ट हाऊस  होतं. समोर  दोन दिवे रेस्ट हाऊसच्या डाव्या आणि उजव्या बाजूने असे तिरकस लावलेले  होते .  म्हणायला  तेवढाच फक्त उजेड होता. बाकी  आजूबाजूला  जंगल होते त्यामुळे अंधार होता. दिवे यासाठी म्हटलं  कि ते आधी 25 ,60 किंवा 100 वॅटचे दिवे असायचे. ते   दिवे होते.  ट्युब लाईटही नव्हते. तिघा फॅमिलींना तीन रूम्स दिल्या होत्या. आम्हा दोघांच्या वाट्याला सगळ्यांत मधली आणि मोठी खोली आली होती. खोली नाही तो मोठा हाॅल होता. लग्नांत तशा  हाॅलमध्ये 25-30 लोक सहज झोपले असते. डबल बेडचा मोठा पलंग देखिल एका कोपर्यात ठेवल्यासारखा वाटत होता. जरा वर छता कडे बघि...

एक अनोखी सहल भाग 1

नोकरी जर ट्रान्स्फरेबल असेल तर आपलं जीवन हे ट्रेन सारखं असतं. आपली बदलीची ठिकाणं म्हणजे त्यावरची  स्टेशनं. एकदा बदलून दुसरीकडे गेलो कि ती माणसं आणि त्यातही तो स्टाफ परराज्यातील असेल तर भेटण्याचा योग दुर्मिळच असतो. अशा वेळी आपलं माणसं जोडण्याचं कौशल्य कामी येते. पुन्हा तेवढ्याने काम होत नाही. ती माणसं नेहमी करिता जोडून ठेवणं हे सुध्दा कसब तुमच्याकडे असायला हवं. मित्र म्हणून एकदा स्विकारलं की गुण दोषांसकट स्विकारायला हवं. हे करतांना आपणही दोषरहित नाही. हे स्वतःशी कबूल करावं लागत. काम सोप नाही पण करावं लागतं. या अशा ट्रान्स्फर्स मध्ये भेटलेल्या अनेक मित्रांपैकी  दोन मित्र म्हणजे अजय घाटे आणि गुलाबराव खडसे. अजय  जरा धीर गंभीर प्रवृतीचा म्हणजे विनोदाचे हास्याचे वावडे आहे असे नाही. पण चेहरा नेहमीच काहीतरी गहन विचार करीत असल्यासारखा. त्याच्या मनांत काही चालत असावं पण तो ओठावर येऊ देत नसे. एखाद्या वेळेस असही असेल पोरकटपणा त्याच्या ठाई अजिबात नव्हता /नाही.तेच गुलाबराव अतिशय जाॅली ,माणसं जोडायची कशी हे गुलाबरावां कडून शिकावं. त्यांच्या त्या विशिष्ट लयीत मोबाईल नंबर सांग...

एक अनोखी सहल भाग 2

एक अनोखी सहल भाग 2 एक अनोखी सहल हे नांव का दिले म्हणालं तर आम्ही तिघे त्यानंतर कुठेच गेलो नाही आणि अशा प्रकारची सहल नंतर कधीच अनुभवली नाही. अनेक दृष्टीने ती अनोखी होती. तर ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो होतो. रस्त्यात एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि पुढे निघालो. 11.30 ते 12.00 च्या दरम्यान आम्ही गडचिरोलीला पोहोचलो. गडचिरोली गावाबध्दल आणि नावाबध्दल कुतूहुल होतं. गडचिरोली जिल्हा निर्मिती च्या आधी चंद्रपूर हा आकाराने महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा जिल्हा होता. चंद्रपूर हा दुर्गम आणि मागासलेला जिल्हा होता. जास्तीतजास्त भुभाग हा जंगलाने व्यापला असल्याने आणि रस्ते आणि वाहतुकीची साधनेही नव्हती. म्हणून 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले होते आणि गडचिरोली ला गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण घोषित करण्यात आले होते. आता या गोष्टीला 25 वर्षावर झाले होती. शहर तस नविनच वाटत होतं. मागास भागाची लक्षणं शहरांत जाणवत नव्हती. मोटार सायकल चे , मारूतीचे शोरूम . दुमजली ईमारती. जिल्हाधिकारी  कार्यालयाची बिल्डिंग नवीच होती. बरीच स्वच्छताही होत...

खर सुख, आनंद आणि मजा.

ट्रान्स्फरेबल जाॅब ही खर तरं नियोक्त्याच्या           ( Employer)  पैशाने देशाटन करायची संधीच असते. आपली  बदली  अशा ठिकाणी होते. तिथे  जाऊनही आपण   रहातो. जिथे कधी जाण्याचाही विचार केला नसला. आपण शक्यतो पर्यटनाला देव दर्शन, हिल स्टेशन किंवा प्रेक्षणिय स्थळालाच भेट देतो. पण आपली  ट्रान्स्फर होते.  तिथे वरील म्हटल्याप्रमाणे  खुप प्रसिध्द असे काहीच नसतं. पण हे पर्यटनापेक्षा अधिक मनोरंजक असतं. अर्थात या गोष्टीकडे अर्थात बदली कडे सकारात्मक पध्दतीने पहाण्याचा आपला स्वभावही असावा लागतो.  लहान असतांना वडिलाच्या नोकरीमुळे बरेच फिरलो. माझे 15 वर्षाचे शिक्षण 6 ठिकाणी झालं. त्यामुळे कसं 2-3 वर्ष एका ठिकाणी राहिलो की बेचैन व्हायचो.  वाटायचं आता चेज हवा . क्लर्कच असतो तर ट्रान्सफर झाली नसती. पण वडिल ऑफिसर होते. त्यामुळे रक्तातच ऑफिसरकी होती. त्यामुळे ट्रान्सफर त्रासदायक वाटली नाही. अर्थात सौ चे सहकार्य ही जमेची आणि सकारात्मक गोष्ट होती. संसार म्हटलं की दोघांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे असते.  प्रमोशनवर माझी राजुर...

शाबासकी

Blog No.2022/ Date 22-07-2020 मित्रांनो,   बॅकेच्या नोकरीच्या निमित्ताने बराच फिरलो. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा होता. चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यांत राजुरा या शहरापासून 13 कि मी अंतरावर विहीरगांव येथे बॅकेची शाखा होती. 25 सप्टेंबर 1999 ला मी  राजुरा येथून विहीरगांवला जाॅईन होण्यासाठी आपली राजदुत मोटार सायकल घेऊन निघालो. रस्ता बघितलेला नव्हता पण कुठून जायचं एवढं फक्त माहित होत. रस्त्यात आधी रेल्वे क्राॅसिंग लागलं. गेट बंद असल्यामुळे थोडं थांबाव लागलं. मग 2 कि मी. वर   एक गांव लागलं. सातरी अन् त्यानंतर उजव्या हाताला जंगल सुरू झालं. मग चनाखा नांवाचं गाव लागल. जंगल एका बाजूला चालूच होत. मी खरं तर जाम घाबरलो होतो. रोज सकाळी या रोडने जायच विशेष टेंशन नव्हत. पण संध्याकाळी याच रस्त्याने परत यायचं म्हणजे कठीण काम. जंगलातून बसमध्ये बसून गेलेलो पण त्यात रिस्क अशी काही नव्हती. पण मोटार सायकल वर एकट्याने फर्स्ट टाईम . मग जंगल संपलं. उजव्या हाताला शाळा लागली. बहुतेक हायस्कूल असावी. पुढे चौकात येऊन पोहोचलो. बॅक कुठेच दिसली नाही.  चौकात एकाला विचारलं. तो म्हणाला " ...

माझे नोकरीतील पहिले वर्ष

माझ्या बॅकिंग जीवनाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेलू नावाच्या छोट्या गावातून झाली. छोटे यासाठी की त्यावेळे पर्यत अशी गांव आणि खेडी ही केवळ चालत्या रेल्वेतुन आणि  बसमधून बघितलेली. अशा ठिकाणी रहाण्याचा अनुभव शुन्य पण कुतूहुल जरूर होतं. पण इतक्या लहान गावात आपण कधी जाऊन राहू अस कधीच वाटल नव्हतं. मोठ्या गांवात किंवा शहरात आताच्या मानाने सोयी सुविधा मानाने कमी असल्या तरीही त्याकाळी टेलिफोनही मोजक्याच घरी असायचं आणि बी एस एन एल चा लॅडलाईन असणं हे प्रतिष्ठित असण्याच लक्षणं समजलं जायचं. खुप जुनी नाही 40 च वर्षापुर्वीची ही गोष्ट आहे.हे बघितलं तर लक्षांत येत कि देशाने खुप प्रगती केलीय.  सेलू हे वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 कि मी दुर नागपूर वर्धा रोडवर वसलेलं एक छोटसच पण टुमदार गांव. वर्ध्याहून सेलूकडे जातांना वाटेत पवनार लागायचं. पवनार म्हणजे आचार्य विनोबा भावेंच गांव. तिथं त्यांचा आश्रम होता. धाम नदीच्या काठावर. मी जेव्हा सेलूला होतो. तेव्हा आचार्य विनोबा भावे हयात होते. त्यांची भेट घेण्याचा योग तेव्हा योग आला. भूदान चळवळी बध्दल काॅलेज जीवनांत खुप काही वाचलं होतं.त्यांच्या प्रत...