ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो , जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1. तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....
माझ्या बॅकिंग जीवनाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेलू नावाच्या छोट्या गावातून झाली. छोटे यासाठी की त्यावेळे पर्यत अशी गांव आणि खेडी ही केवळ चालत्या रेल्वेतुन आणि बसमधून बघितलेली. अशा ठिकाणी रहाण्याचा अनुभव शुन्य पण कुतूहुल जरूर होतं. पण इतक्या लहान गावात आपण कधी जाऊन राहू अस कधीच वाटल नव्हतं. मोठ्या गांवात किंवा शहरात आताच्या मानाने सोयी सुविधा मानाने कमी असल्या तरीही त्याकाळी टेलिफोनही मोजक्याच घरी असायचं आणि बी एस एन एल चा लॅडलाईन असणं हे प्रतिष्ठित असण्याच लक्षणं समजलं जायचं. खुप जुनी नाही 40 च वर्षापुर्वीची ही गोष्ट आहे.हे बघितलं तर लक्षांत येत कि देशाने खुप प्रगती केलीय.
सेलू हे वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 कि मी दुर नागपूर वर्धा रोडवर वसलेलं एक छोटसच पण टुमदार गांव. वर्ध्याहून सेलूकडे जातांना वाटेत पवनार लागायचं. पवनार म्हणजे आचार्य विनोबा भावेंच गांव. तिथं त्यांचा आश्रम होता. धाम नदीच्या काठावर. मी जेव्हा सेलूला होतो. तेव्हा आचार्य विनोबा भावे हयात होते. त्यांची भेट घेण्याचा योग तेव्हा योग आला. भूदान चळवळी बध्दल काॅलेज जीवनांत खुप काही वाचलं होतं.त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा सेलू पोस्टींगच्या निमीत्ताने योग आला. सेलू केळीच्या बागांसाठी प्रसिध्द. धाम आणि बोर या दोन्ही नद्या आणि त्यावरील धरणं यानी सम्रृध्द असा हा परिसर. अगदी हिरवागार असायचा हा परिसर नेहमी. ज्यानं कधी लहान गांवात वास्तव्य केलेले नाही. त्याच्यासाठी नक्कीच हे अगदी छान ठिकाण होतं. बॅकेत 10 ते 12 जणांचा स्टाफ. कम्प्युटरायझेशन मुळे काम सोपी झाली असली तरी स्टाफ मध्ये जे सौहार्दपुर्ण नातं आणि एकजिनसीपणा होता. तो आजकाल आढळत नाही. मी जाॅईन झाल्यापासून ज्यांची आणि माझी अभेद्य अशी मैत्री झाली ते अनंत मिसे यांनीच मला रूम पाहून दिली. झोपण्यासाठी खाट, स्नानासाठी बादली , पिण्यासाठी भरून ठेवलेला माठ. सौजन्य घरमालक. खोलीवर कौले होती, मंगलोरी कौलं नव्हती जी मी पाहिली होती. जेवायसाठी एक राज्यस्थानी खानावळ होती. खिमजी भाई हाॅटेलचे मालक, अतिशय मनमिळावू स्वभावाचे. हळूहळू त्यांचा स्टाफ ,भाऊ यांच्याशी माझी ओळख झाली. मला झोप तशी कमीच आधी पासून. मी अगदी साडे पाचलाच चहा प्यायला हाॅटेलवर पोहोचत असे. वर्धा नागपूर रोड वर असल्याने पंढरपूर. नांदेड, औरंगाबाद , जालना , लातूर , परभणी वरून रात्री निघणार्या सगळ्याच नागपूरसाठीच्या बसेस सेलूला थांबत.मी चहा प्यायला गेलो असतांना बसचे पॅसेंजर्स इथे चहा, नात्यासाठी उतरत. खिमजी भाईंचा भाऊ रमेश सकाळपासून तिथे असायचा. खुपदा तो सकाळचे विधी आटोपण्यासाठी जात असे. अशा वेळी जर बस आलेली असेल तर तो मला साहबजी जरा गल्ला संभालोंगे. मै आया. असे म्हणून निघून जात असे. सुरूवातीला जरा विचित्र वाटलं. पण सवय झाल्यावर याचीही मजा घेतली. हा एक वेगळाच अनुभव होता. आयुष्यांत विपरित परिस्थितीने कणखर तर बनवलच पण सकारात्मक विचारांच्या संस्कारांनी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलो. मग घरमालकांशी अगदी घरगुती संबंध झाल्यावर मी आपला गाण्याचा छंद जोपासायला सुरूवात केली. सुधीर फडकेंची स्वर आले दुरूनी, प्रिया आज माझी, सखी मंद झाल्या तारका ही खुप छान गाणी होती. ती सर्वच मी म्हणत असे. एक दिवस मी गाणं म्हणत असतांना पलिकडच्या खोलीतुन फर्माईश आली. सखी मंद झाल्या होऊन जाऊन द्या. पलीकडच्या खोलीतच अनंत मिसे रहात असतं. संगीत आणि साहित्य प्रेमी. मग हा सिलसिला सुरू झाला. पलीकडच्या खोलीतून फर्माईश यायची मी पुरवित असे.अशातच स्थानिक यशवंत महाविद्यालयांत भावगीत स्पर्धा होती. मिसेंनी खुपच आग्रह केला. मी स्पर्धेत भाग घेतला. पेटी तबला सगळी व्यवस्था झाली.सरावही केला. स्पर्धेत प्रिया आज माझी म्हटलं. दुसरे बक्षिस मिळाले. पहिले बक्षिस स्थानिकाला द्यायचं हा नियम पहिला दान देवाला प्रमाणेच पाळला गेला. बक्षिसाचं काही नाही हो पण गुणवत्ता जपायला हवी ना.पण बक्षिस समारंभात अंधश्रध्दा निर्मलन समितीचे श्री शाम मानव यांच्या हस्ते बक्षिस मिळालं अन् दुसरं बक्षिस वगैरे विसरायला झालं. सेलूला दीड वर्ष होतो.पण नोकरीची पहिली दिड वर्ष आणि लहान गावाचा पहिलाच अनुभव त्यामुळे सेलू नेहमी करिता स्मरणांत घर करून राहिलय.
खूप चॅन लिहिले आहे सर. बँकेच्या नोकरीतील पहिले पोस्टिंग. ते गाव, तिथली माणसे, शाखेतील पहिला दिवस, तुम्हाला भेटलेले श्री अनंत मिसे सारखे समविचारी मित्र हे सगळं न विसरता येणारे. यातील काही गोष्टीबद्दल आपण खूप छान लिहिले आहे.
ReplyDelete