Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

एअर कंडिशनर बाबत केंद्राचे नवे धोरण

ब्लॉग नं:2025/172.

दिनांक: 22 जून, 2025. 

मित्रांनो,

कधी तरी तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य किंवा जोडीदार,यांच्यात एसीच्या तापमानावरून वाद झाला असेल. टीम 18°C च्या सदस्यांना थंडगार वातावरण हवे असते, तर टीम 24°C ला सौम्य थंडावा हवा असतो. मात्र, लवकरच हे "शीतयुद्ध" संपुष्टात येऊ शकते.कारण केंद्र सरकार संपूर्ण भारतात,एसी तापमानाचे नियमन लागू करण्याची योजना आखत आहे.आजचा ब्लॉग या विषयावर आहे.

सविस्तर:

सरकारचा प्रस्ताव आणि त्यामागील कारणे:

नवीन प्रस्तावानुसार,एसीचे आता 20°C पेक्षा कमी किंवा 28 °C पेक्षा जास्त तापमान सेट करता येणार नाही.सरकारचा हेतू कोणाच्या झोपेची काळजी घेणे नसून वीज बचतीचा आहे.2010 पासून,भारतात एसी वापरणाऱ्या घरांची संख्या तिप्पट झाली आहे.परिणामी, विजेची मागणीही 20% ने वाढली आहे. भारतात सध्या थंड होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण एकूण विजेच्या 10% इतके आहे.

एसी तापमान आणि ऊर्जा बचत:

एसी तापमान 24-26°C दरम्यान ठेवले तर वीजेची बचत होऊ शकते.तापमान 20°C वरून 24°C पर्यंत वाढवल्यास वीज वापर 24% पर्यंत कमी होतो. यामुळे ग्राहकांचे विजेचे बिल कमी होऊन,देशाला लाखो कोटी रुपयांची बचत करता येईल.

इतर देशांत काय आहे:

इटली,स्पेन,जपानसारख्या देशांनीही,सार्वजनिक ठिकाणी एसी तापमान नियंत्रित करण्याचे नियम लागू केले आहेत. मात्र, भारतीय हवामानातील उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेता,आपल्याला वेगळ्या उपायांची गरज आहे.

रस्त्यांवरील उष्णतेचा परिणाम आणि उपाय:

भारतातील डांबरी रस्त्यांमुळे उष्णता शोषली जाते आणि आसपासच्या परिसराचे तापमान वाढते. यावर उपाय म्हणून थंड पृष्ठभागाचा वापर, पांढऱ्या रंगाचा कोटिंग, तसेच उष्णता-प्रतिबंधक रस्ते वापरण्याचे प्रयोग होऊ शकतात. ठाणे आणि लॉस एंजेलिसमधील उदाहरणे यशस्वी ठरली आहेत.

भारतीय वास्तुकला: उपायांचा वारसा

भारतीय पारंपरिक वास्तुकलेतून प्रेरणा घेऊन,उष्णतेचा परिणाम कमी करण्याचे उपाय करता येऊ शकतात.जाली,जाड भिंती,सावली देणारे डिझाइन अशा गोष्टी उष्णतेपासून संरक्षण करतात.नोएडातील मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसने जाली-आधारित डिझाइन वापरून LEED प्लॅटिनम रेटिंग मिळवले आहे.

कर धोरणांमध्ये सुधारणा:

सध्या एसीला 28% GST लागू आहे. यामुळे स्वस्त आणि कमी कार्यक्षम मॉडेलला प्राधान्य दिले जाते. परंतु,एसीच्या कार्यक्षमतेवर आधारित कर धोरण राबवले तर ग्राहक अधिक कार्यक्षम मॉडेल निवडतील, ज्यामुळे विजेची आणि खर्चाची बचत होईल.

संपूर्ण दृष्टीकोनाची गरज

सरकारने केवळ एसी तापमान नियंत्रित न करता,रस्ते,घरे,शहरे यांची रचना,तसेच कर धोरणांमध्ये सुधारणा केली, तर वीज बचतीसाठी व्यापक उपाययोजना करता येईल.शेवटी, ही योजना दीर्घकालीन लाभासाठी उष्णता नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

समारोप:

            एसीच्या तापमानाचे नियमन करून जर ग्राहकांचे पैसे वाचत असतील आणि त्यासोबत विजेची बचत होत असेल तर सोने पे सुहागा. इतर देशातील अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले गेले तर चांगलेच आहे.असं मला वाटतं.तसेही खूप कमी तापमान ठेवणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.त्यासोबत मला असं वाटतं की दर वर्षी एसीचा मेंटेनेंस केला तर देखील वीचेची आणि पर्यायाने पैश्याची बचत होऊ शकते.     

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

         

           


 



Comments

  1. सुंदर माहिती दिली आपण साहेब.

    ReplyDelete
  2. छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...