Skip to main content

दुधाला पर्याय 6 भारतीय सुपरफूड्स

  ब्लॉग नं. 2026/1 98.   दिनांक: 17 जुलै, 2026.   मित्रांनो , चार चौघात जेव्हा जेव्हा गप्पा चालतात,कॅल्शियम आणि हाडांच्या आरोग्याचा विषय निघतो , तेव्हा सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो पदार्थ म्हणजे ' दूध '. लहानपणापासूनच आपल्याला शरीराच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी,दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.पण तुम्हाला माहीत आहे का ? आपल्याच स्वयंपाकघरात असे अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ उपलब्ध आहेत , ज्यांमध्ये दुधापेक्षाही कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम आढळते.प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक माहितीपूर्ण पोस्ट शेअर केली आहे , ज्यामध्ये त्यांनी दुधाला उत्तम पर्याय ठरू शकतील अशा 6 आश्चर्यकारक आणि स्थानिक भारतीय सुपरफूड्सची यादी दिली आहे.ही यादी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.तर चला आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ ही यादी. सविस्तर: सामान्यतः प्रति 100 ग्रॅम दुधामध्ये,सुमारे 125 मिग्रॅ कॅल्शियम असते.परंतु , लवनीत बत्रा यांनी सुचवलेल्या 6 भारतीय पदार्थांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे.या यादीत पहिल्या क्...

Select your Language

दुधाला पर्याय 6 भारतीय सुपरफूड्स

 ब्लॉग नं. 2026/198.  

दिनांक: 17 जुलै, 2026. 

मित्रांनो,

चार चौघात जेव्हा जेव्हा गप्पा चालतात,कॅल्शियम आणि हाडांच्या आरोग्याचा विषय निघतो,तेव्हा सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो पदार्थ म्हणजे 'दूध'.लहानपणापासूनच आपल्याला शरीराच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी,दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.पण तुम्हाला माहीत आहे का?आपल्याच स्वयंपाकघरात असे अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ उपलब्ध आहेत,ज्यांमध्ये दुधापेक्षाही कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम आढळते.प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक माहितीपूर्ण पोस्ट शेअर केली आहे,ज्यामध्ये त्यांनी दुधाला उत्तम पर्याय ठरू शकतील अशा 6 आश्चर्यकारक आणि स्थानिक भारतीय सुपरफूड्सची यादी दिली आहे.ही यादी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.तर चला आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ ही यादी.

सविस्तर:

सामान्यतः प्रति 100 ग्रॅम दुधामध्ये,सुमारे 125 मिग्रॅ कॅल्शियम असते.परंतु,लवनीत बत्रा यांनी सुचवलेल्या 6 भारतीय पदार्थांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे.या यादीत पहिल्या क्रमांकावर 'तीळ' आहेत,ज्यांमध्ये दुधाच्या तुलनेत जवळपास 8 पट अधिक कॅल्शियम असते.चला तर मग जाणून घेऊया,या पदार्थांविषयी आणि त्यांच्या वापराच्या सोप्या पद्धती:

·        1. तीळ (975 मिग्रॅ): तीळ हे कॅल्शियमचे सर्वात मोठे भांडार आहे.तुम्ही याचा वापर चटणी किंवा लाडूमध्ये करू शकता किंवा रोजच्या सॅलडवर भुरभुरून खाऊ शकता.

·      2. नाचणी (344 मिग्रॅ): नाचणी हे एक अत्यंत पौष्टिक धान्य आहे.आठवड्यातून किमान दोनदा याची चपाती, डोसा किंवा आंबील (पेज) बनवून तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता.

·     3. राजगिरा (215 मिग्रॅ): राजगिरा केवळ उपवासासाठीच नाही, तर नियमित धान्य म्हणूनही वापरला जाऊ शकतो. याच्या लाह्या किंवा लाडू आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

·        4. शेवग्याची पाने / मोरिंगा (185 मिग्रॅ): शेवग्याच्या पानांमध्ये प्रचंड जीवनसत्त्वे असतात. ही पाने तुम्ही डाळ, सूप किंवा रोजच्या स्मूदीमध्ये सहज मिसळू शकता.

·        5. सुके अंजीर (162 मिग्रॅ): दोन सुके अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते.

·        6. राजमा (143 मिग्रॅ): आपल्या नेहमीच्या जेवणात भाजी किंवा उसळ म्हणून राजमाचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते.

भारतातील पोषणविषयक आरोग्यासाठी हे का महत्त्वाचे आहे?

आज भारतात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता,ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. एका प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 1,000 मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यकता असते.परंतु,आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रादेशिक आहारपद्धतीमुळे,सरासरी भारतीय व्यक्तीच्या शरात या गरजेच्या निम्म्यापेक्षाही कमी (सुमारे 400-500 मिग्रॅ) कॅल्शियम पोहोचते. काही भागांत दुग्धजन्य पदार्थांचा कमी वापर आणि आर्थिक अडचणींमुळे दूध न परवडणे,यामुळे ही तफावत अधिक वाढते.म्हणूनच,स्थानिक पातळीवर सहज आणि परवडणाऱ्या दरात,उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास,हाडांचे आरोग्य सुधारू शकते आणि भविष्यात होणारा ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होणे) धोका टाळता येऊ शकतो.

वैद्यकीय तज्ज्ञांचा 'आहाराला प्राधान्य' देण्याचा दृष्टिकोन:

या गंभीर समस्येवर 'एंडोक्राइन सोसायटी ऑफ इंडिया' (Endocrine Society of India) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.त्यानुसार,कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी,महागड्या गोळ्या किंवा सप्लीमेंट्सवर अवलंबून राहण्याऐवजी,नैसर्गिक आहारालाच मुख्य उपाय मानण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे प्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांच्या मते, "आहारातील विविधता, परवडणारी किंमत, दुग्धजन्य पदार्थांचे कमी सेवन यामुळे अनेक व्यक्तींना केवळ अन्नातून कॅल्शियमची गरज पूर्ण करणे कठीण जाते.म्हणूनच,पहिली पायरी म्हणजे आहारातील कॅल्शियमचे मूल्यांकन करणे आणि परवडणाऱ्या,स्थानिक पदार्थांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.जेव्हा नैसर्गिक आहार पूर्णपणे अपुरा पडतो, केवळ तेव्हाच सप्लीमेंट्सचा वापर विशिष्ट वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा." तसेच,विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती वगळता, कॅल्सिट्रिऑलसारख्या सक्रिय व्हिटॅमिन डीच्या प्रकारांचा अनावश्यक वापर पूर्णपणे टाळला पाहिजे, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

मार्गदर्शक तत्त्वांपासून ते लोकांच्या ताटापर्यंत: आरोग्याचा सोपा मार्ग

या मोहिमेचा मुख्य उद्देश लोकांच्या सवयी बदलणे हा आहे.औषधांच्या गोळ्यांऐवजी घरच्या घरी, परवडणाऱ्या आणि पोषक-समृद्ध पदार्थांबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.पोळीमध्ये नाचणीचे पीठ वापरणे किंवा सॅलडवर थोडे तीळ भुरभुरणे या अत्यंत व्यावहारिक आणि सोप्या टिप्स आहेत, ज्यांमुळे कोणीही आपल्या दैनंदिन आहारात बदल करू शकतो.

समारोप:

शेवटी,किडनी स्टोन आणि हृदयाच्या आरोग्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत.म्हणूनच,तज्ज्ञ असा सल्ला देतात की,आहारातून नैसर्गिकरित्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि आवश्यकतेनुसार संयमाने व स्वतःच्या वैयक्तिक गरजेनुसारच डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार (म्हणजेच गोळ्या किंवा इंजेक्शन)  (सप्लिमेंट्स) घ्यावा.आजच तुमच्या आहारात या स्थानिक सुपरफूड्सचा समावेश करा आणि निरोगी व मजबूत हाडांसाठी एक पाऊल उचला !

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

होलीस्टिक हेल्थ कोच

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...