Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

21 वे शतक आणि महात्मा गांधीचे विचार

  Blog No.2024/021.   Date: -30 th , January,2024.        मित्रांनो,             आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथि.मी ब्लॉग लिहितांना राजकारणी लोकांना टाळायचं हा माझा निर्णय कटाक्षाने पाळतो. पण महात्मा गांधीं हे केवळ राजकारणी नव्हते.ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते.त्यामुळे त्यांची ओळख ही राजकारणी अशी नाहीच.त्यांच्यावर लोक कितीही टीका करोत त्यांचे स्वतंत्रता आंदोलनातील योगदान उल्लेखनीय होते,हे निश्चित.   सविस्तर                 आजकाल आपल्या नेत्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत किंवा विचारांची लढाई हे खूप वेळा ऐकायला मिळते.पण ठळकपणे मांडता येतील असे महात्मा गांधी यांचे विचार होते. Gandhian Thoughts हा विषय सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशन मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पीएमटीमध्ये असायचा. असायचा यासाठी लिहिले कारण आताचे मला माहित नाही. पण पूर्वी होता.        ...

कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेताय?

  Blog No.2024/020.   Date: -29 th , January,2024.      मित्रांनो,             भारतीय विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस यांचे आजकाल एक घट्ट नाते झाले आहे.हे पूर्वी नव्हते असे नाही. पण आजकाल पालकांना देखिल असे वाटते की,आपल्या मुलाला आपण कोचिंग क्लासेसमध्ये घातले नाही याचा अर्थ आपण मुलाचे नुकसान करत आहोत किंवा आपण अगदीच जुन्या आणि मागास विचारांचे आहोत.पण तुम्हाला माहिती आहे की भारताच्या कोचिंगच्या राजधानीत म्हणजे राजस्थानातील कोटा येथे  2023 मधे एकूण 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.म्हणजे सरासरी दोन आठवड्यामागे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.आता केंद्र सरकारने यात लक्ष घातले आहे.त्या बाबत सविस्तर पाहू आजच्या ब्लॉगमध्ये.   सविस्तर गेल्या आठवड्यातच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटर्सना त्याच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.ही मार्गदर्शक तत्वे काय आहेत हे पाहण्याआधी आपण हे बघूया की कोटा येथील कोचिंग सेंटर्सचे प्रकरण केव्हापासून आणि त्यानंतर ते इतरत्र कस...

यु टर्न चा खरा अर्थ

  Blog No.2024/01 9 .  Date: -2 8 th , January,2024.        मित्रांनो,            परवाच्या दिवशी मी बिहारचे भूतपूर्व मुख्यमंत्री,जननायक म्हणून प्रसिद्धीस पावलेले स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर)  प्रदान करण्याची घोषणा हा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे,असे लिहिले होते.पण त्या मास्टर स्ट्रोकचा इफेक्ट हो परिणाम म्हणण्यापेक्षा इफेक्ट जास्त परिणामकारक वाटतो, इतक्या लवकर जाणवेल किंवा होईल असं वाटलं नव्हतं.मी कालपासून ब्लॉग लिहिण्यासाठी ज्या बातमीची वाट पहात होतो. ती बातमी सकाळी 10.00 च्या सुमारास आली.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी 7.00 वाजता पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी.पण या वेळेस एनडीए च्या सोबत.सर्वच अनाकलनीय, कल्पनातीत.   सविस्तर              असं म्हटलं जातं की आजकाल किंवा कलियुगात ज...

अल्झायमर एक कठीण रोग

  Blog No.2024/018.   Date: -27 th , January,2024.            मित्रांनो,      आजकाल जरा जास्त प्रमाणात अल्झायमर या रोगाबद्दल बोललं जातंय, ऐकायला मिळतंय,वाचायला मिळतंय.कदाचित लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे हा रोग झालेल्यांची संख्या वाढली असेल,वाढत असेल.म्हणून या रोगाबद्दल आणि याच्या प्रारंभिक लक्षणांबद्दल आपण आज थोडे जाणून घेणार आहोत.यातील काही लक्षणे सर्वसामान्यपणे कमी प्रमाणात प्रत्येकात आढळून येतात. म्हणून लगेच आपल्याला अल्झायमर झालाय असे होतं नाही.पण ही लक्षणे जर एकत्रितपणे आढळल्यास,आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क प्रस्थापित करून आपल्या शंकेचे निरसन करून घेऊ शकतो.कारण या आजारावर अद्याप तरी कायम स्वरूपी असा उपचार शोधून काढण्यात तज्ञांना यश आले नाही.त्यामुळे प्रारंभिक अवस्थेत जर त्याचे निदान झाले तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.आजचा ब्लॉग या विषयावर. प्रास्ताविक                     अल्झायमर हा एक डिजनरेटिव्ह रोग आहे जो मेंदूच...

या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार-योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान

Blog No.2024/017.   Date: -26 th , January,2024.        मित्रांनो,             एवढ्यातच म्हणजे 24 जानेवारीला केंद्र सरकारने बिहारचे भूतपूर्व मुख्यमंत्री,जननायक म्हणून प्रसिद्धीस पावलेले स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर)  प्रदान करण्याचे घोषित करण्यात आले.1988 साली निर्वतलेले कर्पूरी ठाकूर,त्यानंतर जन्मलेल्या पिढीस माहित असणे थोडे अशक्यच पण सर्वसामान्य भारतीयांना त्यांची कितपत ओळख आहे माहित नाही.पण त्यांना हा सर्वोच्य सन्मान दिला जातो आहे कारण त्यांचे कार्यही त्या तोडीचे निश्चितपणे आहे.आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा.आज आपण स्व. कर्पूरी ठाकूर यांना जाणून घेऊ या.   प्रास्ताविक             महाराष्ट्र,देशातील इतर राज्यांचे तुलनेने एक पुढारलेले राज्य.पण भारताच्या उत्तरेकडील राज्ये अजूनही सामाजिक दृष्ट्या तेवढी प्रगत नाही.एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो.गोष्ट ...

विमानांद्वारे होणारे CO2 चे उत्सर्जन एक समस्या

  Blog No.2024/016.   Date: -23 rd , January,2024.           मित्रांनो,             पटकन फ्लाइट पकडून,आपल्याला जिथे जायचे तिथे पोहोचणे म्हणजे गंतव्य स्थानाला ( destination ) पोहोचणे हे आपल्या साऱ्यांसाठी एवढे सोयीचे आहे,कारण  त्यामुळे वेळ तर वाचतोच पण श्रम देखिल वाचतातच. भले ते कदाचित इतर वाहतुकीच्या साधनापेक्षा महाग असू शकते.पण परंतु पृथ्वीसाठी ते इतके सोयीचे नाही.आज याबाबत ब्लॉगमध्ये माहिती घेऊ. प्रास्ताविक    विमाने प्रत्यक्षात ट्रेनच्या प्रति प्रवासी/प्रति किमीपेक्षा 20 पट जास्त CO2 (अर्थात कार्बन डाय ऑक्साइड) आणि बसच्या 4 पट जास्त उत्सर्जित करतात.एकूणच ते सार्वजनिक वाहतुकीतील बस किंवा ट्रेनच्या प्रवासापेक्षा प्रति तास सुमारे 100 पट जास्त CO2 उत्सर्जित करतात.अशा प्रकारे ते दरवर्षी सुमारे 1 अब्ज टन CO2 उत्सर्जित करतात.त्यामुळे विमान वाहतूक अशीच सुरू राहिल्यास , 2050 पर्यंत केवळ विमानांमुळे पृथ्वी 0.1° सेल्सिअस इतकी अधिक गरम होऊ शकते.असे सांगितल्यास ते अधिक ...

अर्थसंकल्प 2024 पासून अपेक्षा

  Blog No.2024/015.   Date: -20 th , January,2024.        मित्रांनो.             1 फेब्रुवारी,2024 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या मोदी सरकारचा शेवटचा (कारण आता 2024 ला निवडणूक आहे,सरकार नरेंद्र मोदी यांचेच असेल,पण या दुसऱ्या टर्मचा शेवटचा)अर्थसंकल्प आहे आणि तो पूर्ण अर्थसंकल्प नसणार. कारण पुढील काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे.त्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल.दरवेळेसचे अर्थमंत्र्यांचे बजेट बघता या बजेटमधे काही लोकप्रिय घोषणा होतील असे मला वाटतं नाही. पण प्रत्येकाला  काही अपेक्षा आहेत आणि पगारदार कर्मचाऱ्यांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यातून अर्थमंत्र्यांकडून काही अपेक्षा आहेत असे त्यांच्याशी बोलतांना जाणवते. त्या मी थोडक्यात मांडत आहे. 1.        महागाई निर्देशांक आणि पगाराच्या उत्पन्नातील वाढ लक्षात घेता करमुक्त उत्पन्नाची सीमा जी रु.250 , 000 आहे ती वाढली पाहिजे अशी अपेक्षा आहे. किती वाढवायची हे अर्थमंत्र्यांनी ठरवावे. 2.    ...