Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

 Blog No. 2023/75     

Date: 28, March 2023


 

मित्रांनो,

            नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2021 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांच्या बद्दल माहिती नाही असा कुणी संगीत प्रेमी असेल असे वाटत नाही. मी आशाजींबद्दल ब्लॉग करेन पण तो 8 सप्टेंबरला, आशाजींच्या वाढदिवशी.आज त्यांना जो पुरस्कार शुक्रवारी 24 मार्च 2023 ला प्रदान करण्यात आला,त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी थोडे बोलू या.

 

प्रास्ताविक

            महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकार द्वारा दिला जाणारा सर्वात मोठा किंवा सर्वोच्य सन्मान आहे. 1995 ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत असतांना त्यांनी हा सन्मान देणे सुरु केले.2022 पासून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली. रु.25.00 लाख रोख,स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

कुठल्या क्षेत्रातील कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. 

 

1.       कला

2.       साहित्य

3.       खेळ

4.       विज्ञान

5.       समाज सेवा

6.       पत्रकारिता

7.       लोक प्रशासन

8.       चिकित्सा कार्य

 

        ह्या पुरस्कारांची सुरुवात ही 1996 ला झाली.पहिल्या पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात पु.ल. देशपांडे हे होते.आतापर्यंत हा पुरस्कार 18 वेळा प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील तीन, संगीत क्षेत्रातील तीन,विज्ञान क्षेत्रातील चार, समाजसेवा क्षेत्रातील चार आणि खेळ,चिकित्सा कार्य,लोक प्राशन आणि सिनेमा क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. ज्यांची यादी खालीलप्रमाणे:-       

  

 

 

सं

वर्ष

नाम

क्षेत्र

1

१९९६

पु. ल. देशपांडे

साहित्य

2

१९९७

लता मंगेशकर

संगीत

3

१९९९

विजय भटकर

विज्ञान

4

२००१

सचिन तेंडुलकर

खेल

5

२००२

भीमसेन जोशी

संगीत

6

२००३

अभय बंग और रानी बंग

चिकित्सा कार्य

7

२००४

बाबा आमटे

समाज सेवा

8

२००५

रघुनाथ अनंत माशेलकर

विज्ञान

9

२००६

रतन टाटा

लोक प्रशासन

10

२००७

र.कृ. पाटील

समाज सेवा

11

२००८

नानासाहेब धर्माधिकारी

समाज सेवा

12

२००८

मंगेश पाडगाँवकर

साहित्य

13

२००९

सुलोचनादीदी

कला, सिनेमा

14

२०१०

जयंत नारळीकर

विज्ञान

15

२०११

अनिल काकोडकर

विज्ञान

16

२०१५

बलवंत मोरेश्वर पुरंदरे

साहित्य

17

२०२१

आशा भोसले

संगीत

18

2022

आप्पासाहेब धर्माधिकारी

समाजसेवा



    27 वर्षात 18 च वेळा हा पुरस्कार देण्यात आला.या यादीत काही नावे कां नाहीत यांचे आश्चर्य वाटते.जसे सुनील गावस्कर, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम,             


                                                                                                                         प्रसाद नातु,पुणे. 
 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...