Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

 Blog No. 2023/75     

Date: 28, March 2023


 

मित्रांनो,

            नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2021 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांच्या बद्दल माहिती नाही असा कुणी संगीत प्रेमी असेल असे वाटत नाही. मी आशाजींबद्दल ब्लॉग करेन पण तो 8 सप्टेंबरला, आशाजींच्या वाढदिवशी.आज त्यांना जो पुरस्कार शुक्रवारी 24 मार्च 2023 ला प्रदान करण्यात आला,त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी थोडे बोलू या.

 

प्रास्ताविक

            महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकार द्वारा दिला जाणारा सर्वात मोठा किंवा सर्वोच्य सन्मान आहे. 1995 ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत असतांना त्यांनी हा सन्मान देणे सुरु केले.2022 पासून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली. रु.25.00 लाख रोख,स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

कुठल्या क्षेत्रातील कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. 

 

1.       कला

2.       साहित्य

3.       खेळ

4.       विज्ञान

5.       समाज सेवा

6.       पत्रकारिता

7.       लोक प्रशासन

8.       चिकित्सा कार्य

 

        ह्या पुरस्कारांची सुरुवात ही 1996 ला झाली.पहिल्या पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात पु.ल. देशपांडे हे होते.आतापर्यंत हा पुरस्कार 18 वेळा प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील तीन, संगीत क्षेत्रातील तीन,विज्ञान क्षेत्रातील चार, समाजसेवा क्षेत्रातील चार आणि खेळ,चिकित्सा कार्य,लोक प्राशन आणि सिनेमा क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. ज्यांची यादी खालीलप्रमाणे:-       

  

 

 

सं

वर्ष

नाम

क्षेत्र

1

१९९६

पु. ल. देशपांडे

साहित्य

2

१९९७

लता मंगेशकर

संगीत

3

१९९९

विजय भटकर

विज्ञान

4

२००१

सचिन तेंडुलकर

खेल

5

२००२

भीमसेन जोशी

संगीत

6

२००३

अभय बंग और रानी बंग

चिकित्सा कार्य

7

२००४

बाबा आमटे

समाज सेवा

8

२००५

रघुनाथ अनंत माशेलकर

विज्ञान

9

२००६

रतन टाटा

लोक प्रशासन

10

२००७

र.कृ. पाटील

समाज सेवा

11

२००८

नानासाहेब धर्माधिकारी

समाज सेवा

12

२००८

मंगेश पाडगाँवकर

साहित्य

13

२००९

सुलोचनादीदी

कला, सिनेमा

14

२०१०

जयंत नारळीकर

विज्ञान

15

२०११

अनिल काकोडकर

विज्ञान

16

२०१५

बलवंत मोरेश्वर पुरंदरे

साहित्य

17

२०२१

आशा भोसले

संगीत

18

2022

आप्पासाहेब धर्माधिकारी

समाजसेवा



    27 वर्षात 18 च वेळा हा पुरस्कार देण्यात आला.या यादीत काही नावे कां नाहीत यांचे आश्चर्य वाटते.जसे सुनील गावस्कर, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम,             


                                                                                                                         प्रसाद नातु,पुणे. 
 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...