Skip to main content

Posts

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

रिजर्व बँकेचे नियंत्रण आणि सहकारी बँका

  Blog No.2023/318.   Date: -27 th , December 2023.     मित्रांनो ,             सहकारी बँका विशेषतः नागरी सहकारी बँका या लोकांच्या जिव्हाळ्याच्या बँका समजल्या जातात. गावातले ओळखीचे,जवळचे लोक व्यवस्थापनात असतात.त्यांना आपल्या अर्थविषयक गरजा/समस्या जास्त व्यवस्थित आणि परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितल्या जाऊ शकतात आणि ते समजावून घेऊ शकतात. अशी धारणा खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या गावात अनेक शाखा उघडून देखिल या नागरी सहकारी बँकाकडील ग्राहकांचा ओढा थांबला नाही.दुसरं कारण हे देखिल की राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी खूप नियम सांगतात आणि कागदपत्रे खूप मागतात असं लोकांच म्हणणं आहे.पण खरोखर या बँका सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतात की बँकाच्या संचालकांच्या नात्यातील, संबंधातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि हे सारे करत असतांना त्या बँकिंग नियमांचे उल्लंघन तर करीत नाही ना.हेच आपण आज बघणार आहोत. प्रास्ताविक             ...

गीता जयंती आणि गीतेचे सार

  Blog No.2023/317.   Date: -26 th , December 2023.   मित्रांनो ,   नुकतीच 3 दिवसांपूर्वी आपण  गीता जयंती साजरी केली.प्रथम ज्या भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या भगवान श्रीकृष्णाला विनम्र अभिवादन करतो.त्याचा निस्सीमभक्त धनुर्धारी अर्जुनाला देखिल मी प्रणाम करतो.कारण त्याच्या सारख्या एका समृद्ध श्रोत्याने त्याच तोडीचे प्रश्न श्रीकृष्णाला विचारले. याच दिवशी म्हणजेच "मोक्षदा एकादशी"च्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती.गीतेत एकूण 700 श्लोक आहेत. त्यापैकी 574 श्रीकृष्णाचे, 85 अर्जुनाचे,1 धृतराष्ट्राचा आणि 40 संजयचे आहेत. गीतेत  एकदाही हिंदू हा शब्द वापरलेला नाही.गीता सर्वसमावेशक, सर्वव्यापी आणि सार्वजनिकही आहे.   प्रास्ताविक आपली संस्कृती किती महान आहे,जिथे फक्त मानवाचीच नाही तर ग्रंथांचीही जयंती साजरी केली जाते. इथे आपण गीतेच्या पानांची, मुखपृष्ठाची की बाईंडिंगची पूजा करतो का? नाही,आपण गीतेचे स्मरण करतो आणि त्यात दिलेल्या विचारांमुळे तिची पूजा करतो.त्या विचारांची पूजा म्हणजे गीतेची पूजा.मग गीता जयंती का साजरी केली जाते...

नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) खरोखर सुदृढ आहेत कां?

  Blog No.2023/316.   Date: -25 th , December 2023.   मित्रांनो ,             नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी ( NBFC) म्हणजे काय? हे तुमच्या पैकी बऱ्याच जणांना ठाऊक असेल.कदाचित काही जणांनी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी ( NBFC) कडून वैयक्तिक कर्ज देखिल घेतले असेल.या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी ( NBFC) कडे बँकिंग परवाना नसतो. त्यामुळे त्या तुमचे बचत खाते उघडू शकत नाही.पण त्यांना तुमच्याकडून मुदती ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉजिट स्वीकारण्याची परवानगी असते.या गैर-बँकिंग वित्तीय संस्थेस मग तुम्हाला तुमच्या फिक्स्ड डिपॉजिटवर व्याज द्यावे लागणार.मग या गैर-बँकिंग वित्तीय संस्थांना काही उत्पन्न कमावणे भाग आहे.मग त्या त्यांचे भांडवल आणि तुमचं फिक्स्ड डिपॉजिट ठराविक व्याजाने कर्ज म्हणून देतात.त्यासाठी परतफेडीचा अवधि ठरवून देत असतात.या परतफेड करण्याच्या अवधीत जर दिलेले कर्ज परत नाही आले तर ते एनपीए ( NPA ) होते. या संबंधात आज मी तुमच्याशी बोलणार आहे.   कर्ज एनपीए केव्हा होते ?          ...

मोहम्मद रफी सुरेल आवाजाचा दैवी गायक

  Blog No.2023/315.   Date: -24 th , December 2023.   मित्रांनो,             आज रसिकांचे आवडते गायक मोहम्मद रफी यांची 99 वी जयंती. मोहम्मद रफी यांना लोक आदराने रफी साहाब म्हणतं असतं.भारतात जे दैवी देणगी लाभलेले गायक होऊन गेले,त्यांत एक नांव मोहम्मद रफी यांचे घेता येईल.1941 ला सुरु झालेली त्यांची कारकीर्द ही 1980 ला त्यांचा मृत्यू होईपर्यन्त सुरु होती.त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी एक रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते.आज त्यांना शब्द सुमनांजली वहाण्यासाठीच हा ब्लॉग.   प्रास्ताविक             मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर, 1924 ला पंजाबमधे अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतानसिंग या गांवी झाला.रफी हे उस्ताद अब्दुल वाहिद खान,पंडित जीवनलाल मट्ट आणि फिरोज निजामी यांच्याकडून  शास्त्रीय संगीत शिकले होते.वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी कुंदन लाल सैगल याच्या सोबत गाणे केले.1941 मध्ये रफी यांनी संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पं...