ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
Blog No.2023/318. Date: -27 th , December 2023. मित्रांनो , सहकारी बँका विशेषतः नागरी सहकारी बँका या लोकांच्या जिव्हाळ्याच्या बँका समजल्या जातात. गावातले ओळखीचे,जवळचे लोक व्यवस्थापनात असतात.त्यांना आपल्या अर्थविषयक गरजा/समस्या जास्त व्यवस्थित आणि परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितल्या जाऊ शकतात आणि ते समजावून घेऊ शकतात. अशी धारणा खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या गावात अनेक शाखा उघडून देखिल या नागरी सहकारी बँकाकडील ग्राहकांचा ओढा थांबला नाही.दुसरं कारण हे देखिल की राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी खूप नियम सांगतात आणि कागदपत्रे खूप मागतात असं लोकांच म्हणणं आहे.पण खरोखर या बँका सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतात की बँकाच्या संचालकांच्या नात्यातील, संबंधातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि हे सारे करत असतांना त्या बँकिंग नियमांचे उल्लंघन तर करीत नाही ना.हेच आपण आज बघणार आहोत. प्रास्ताविक ...