Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

CIBIL स्कोअर: तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा

 ब्लॉग नं. 2025/245.

दिनांक : 3 सप्टेंबर 2025

मित्रांनो,

💳 CIBIL स्कोअर: तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा

            आजच्या काळात कार कर्ज, गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचं झालं तर बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी एकच गोष्ट पाहते,तो म्हणजे तुमचा अर्थात,CIBIL Credit Information Bureo Of India Limited चा स्कोअर पहाते.तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही,हे याच सिबिल स्कोरवर अवलंबून असते आणि व्याजाच्या दरात काही सूट मिळेल कां. हे देखिल सिबिल स्कोरवरून ठरते.हा स्कोअर म्हणजे तुमच्या कर्ज फेडण्याच्या शिस्तीचा आणि जबाबदार वर्तनाचा पुरावा.आजच्या या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.  

सविस्तर:

📊 CIBIL स्कोअर म्हणजे काय?

CIBIL स्कोअर हा 0 ते 900 या दरम्यान असतो.700 वरील स्कोअर चांगला मानला जातो. 800 वरील स्कोअर सर्वात उत्कृष्ट मानला जातो.जास्त स्कोअर म्हणजे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त, तसेच कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची संधी.

📑 तुमचा CIBIL अहवाल काय सांगतो?

CIBIL अहवाल हा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा सविस्तर आराखडा असतो.चांगला स्कोअर वेळेवर EMI भरणे, कर्जाचे नियमित हफ्ते फेडणे, जबाबदार वापर.खराब स्कोअर EMI उशिरा भरणे, कर्ज न फेडणे, थकबाकी वाढवणे.

🌟 चांगला CIBIL स्कोअर का महत्त्वाचा आहे?

कर्ज मंजुरी सोपी होतेबँका आणि NBFC सहज कर्ज मंजूर करतात.कमी व्याजदरउच्च स्कोअरमुळे कर्जावर आकर्षक व्याजदर मिळतात.जास्त क्रेडिट मर्यादाक्रेडिट कार्ड्स आणि इतर कर्जांवर जास्त मर्यादा मिळू शकते.

📝 चांगला स्कोअर राखण्यासाठी सोप्या सवयी:

EMI आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरा.कधीही पेमेंटमध्ये चूक करू नका.जास्त कर्ज घेऊन परतफेडीचा ताण वाढवू नका.क्रेडिट वापर प्रमाण (Credit Utilization Ratio) 30% च्या खाली ठेवा.

CIBIL स्कोअरबद्दल सामान्य प्रश्न:

1.       क्रेडिट रिपोर्ट तपासल्याने स्कोअर कमी होतो का?

उत्तर: नाही. तुमचा रिपोर्ट तपासणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे. उलट, तो नियमित तपासल्याने तुम्ही चुका लवकर ओळखू शकता.

2.       स्कोअर कसा सुधारू शकतो?

उत्तर: वेळेवर थकबाकी भरणे, कर्जाचे ओझे कमी करणे, आणि जबाबदार खर्चाचे नियोजन.

3.       वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी?

उत्तर: मजबूत पासवर्ड वापरा, असुरक्षित नेटवर्कवर संवेदनशील माहिती शेअर करू नका.

4.       700 वरील स्कोअरचा अर्थ काय?

उत्तर:  मजबूत क्रेडिट इतिहास आणि वेळेवर कर्ज फेडण्याची क्षमता.

5.       कमी स्कोअरचे तोटे काय?

उत्तर: कर्जावर जास्त व्याजदर, कर्ज मंजुरीत अडचण.

📝 CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी या सोप्या पायऱ्या:

1.वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्ड बिल भरा,

2.पेमेंट उशिरा झालं की स्कोअर लगेच घसरतो. ऑटो-डेबिट किंवा रिमाइंडर लावा.थकबाकी कमी करा.

3.जास्त कर्ज ठेवू नका.शक्य तितकी थकबाकी वेळेत क्लिअर करा.

4.क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा.उपलब्ध मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापर टाळा.

5.नवीन कर्जाचा अतिरेक करू नका.वारंवार नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्याने तुमचा स्कोअर खराब होतो.

6.क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा.चुका, डुप्लिकेट एंट्री किंवा फसवणूक झालेली तर नाही ना, हे ओळखता येईल.

या छोट्या सवयी अंगीकारल्यास काही महिन्यांतच तुमचा CIBIL स्कोअर सुधारू लागेल आणि भविष्यात कर्ज मिळवणं सोपं होईल.

समारोप:

CIBIL स्कोअर हा केवळ एक आकडा नसून,तुमच्या आर्थिक शिस्तीचं प्रतिबिंब आहे.जबाबदारीने कर्ज घ्या,वेळेवर परतफेड करा,आणि तुमच्या स्कोअरवर लक्ष ठेवा.सिबीलची स्थापना ऑगस्ट, 2000 ला झाली. त्या आधी बँकेत गावात कार्यरत असलेल्या सगळ्या बँकाकडून नो ड्यू certifictae मागवले जात असे.पण सिबील स्कोरच्या अभावी,एखाद्याचे पत मानांकन कळत नसल्याने त्याने आधी घेतलेले कर्ज वेळेत परत केले किंवा नाही.हप्ते ठरविल्याप्रमाणे भरलेत किंवा नाही,त्याने शहराबाहेरच्या एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले आहे कां? तसेच क्रेडिट कार्डविषयी काही माहिती मिळत नसे. सिबीलमुळे एखाद्याचे क्रेडिट मानांकन शक्य झाले आहे.आणि कर्जाबाबतची शिस्त वाढीस लागली आहे.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

Comments

  1. छान माहितीछान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...