ब्लॉग नं. 2025/120.
दिनांक: 2 मे, 2025.
मित्रांनो,
कालपासून म्हणजेच 1 मे, 2025 पासून एटीएम व्यवहार शुल्क (ATM Charges) वाढविण्यात आले आहेत,अर्थात एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर ज्यादा चार्ज द्यावा लागेल. अर्थात दर महिन्याला ज्या मोफत वापराच्यावर पैसे काढले तर हे दर लागू होते. आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेऊ.
सविस्तर:
कालपासून एटीएम व्यवहार शुल्क वाढले आहे.ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) व्यवहार शुल्कात कालपासून, करण्यात आली आहे अर्थात बँका मासिक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी 2 रुपयांनी वाढ करणार आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केल्यानंतर हे घडले आहे की, बँकांना मोफत वापरापेक्षा जास्त व्यवहारांसाठी एटीएम पैसे काढण्याचे शुल्क वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे.“मोफत व्यवहारांव्यतिरिक्त, ग्राहकाकडून प्रति व्यवहार कमाल 23 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. हे 1 मे 2025 पासून लागू झाले.” असे आरबीआयने 28 मार्च रोजी एका परिपत्रकात म्हटले आहे. आरबीआयचे परिपत्रक सर्व व्यावसायिक बँकांना लागू आहे, ज्यात प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी), सहकारी बँका, अधिकृत एटीएम नेटवर्क ऑपरेटर, कार्ड पेमेंट नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर यांचा समावेश आहे.
एटीएम शुल्क किती वाढले:
मासिक मोफत वापरापेक्षा जास्त बँक एटीएममधून सर्व व्यवहार/काढण्यावर, आता प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये शुल्क आकारले जाईल.पीटीआयच्या अहवालानुसार, जानेवारी 2025 पर्यंत, देशांत 130,902 ऑन-साईट एटीएम (बँकेच्या शाखेजवळ असलेले) आणि कॅश रिसायकलर मशीन (सीआरएम) आणि 85,804 ऑफ-साईट एटीएम आणि सीआरएम आहेत.
तुम्हाला किती वेळा एटीएममधून मोफत पैसे काढता येतील?
सध्या,रिजर्व बँक तुमच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच वेळा आणि इतर बँकांमधून तीन वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी देते,हे महानगरांमधील शाखांसाठी लागू आहे.नॉन-मेट्रो शहरांमध्ये, तुमच्या स्वतःच्या बँकेतील पाच मोफत एटीएम व्यवहारांव्यतिरिक्त, तुम्हाला इतर बँकांमध्ये आणखी पाच व्यवहार करायला मिळतात. तुमच्या बँकेच्या एटीएममध्ये असो किंवा दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये असो, आर्थिक (पैसे काढणे, ठेवी इ.) आणि गैर-आर्थिक व्यवहार (बॅलन्स तपासणे, पिन बदलणे इ.) हे मासिक मोफत व्यवहारांमध्ये समाविष्ट आहेत.
वाढलेल्या शुल्कामुळे फक्त एटीएममधील व्यवहार प्रभावित आहेत का?
नाही.आरबीआयच्या परिपत्रकानुसार, बँकांना (रोख ठेव व्यवहारांव्यतिरिक्त) सीआरएममध्ये,म्हणजे कॅश रिसायकलर मशीनवर केलेल्या व्यवहारांवर (म्युटेटिस म्युटेंडिस) शुल्क वाढ लागू करण्यात येणार आहे.कॅश रिसायकलर मशीन म्हणजे ज्या मशीनवर पैसे जमा करणे (डिपॉजिट करणे) आणि काढणे म्हणजे विड्रॉ करणे हे दोन्ही व्यवहार करता येतात. शिवाय, परिपत्रकात असेही म्हटले आहे की एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्कद्वारे ठरवले जाईल. सध्या, सर्व केंद्रांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार इंटरचेंज शुल्क ₹ 17/- आणि आर्थिक नसलेल्या व्यवहारांसाठी ₹6/- आहे.
एटीएम शुल्क का वाढवले जात आहे?
आरबीआय वेळोवेळी मोफत एटीएम व्यवहारांची संख्या आणि अनिवार्य मोफत वापरापेक्षा जास्त ग्राहकांना लागू करता येणारे कमाल शुल्क अद्यतनित करते. हा त्या सुधारणा प्रक्रियेचा एक भाग आहे.एटीएम मार्फत जी सेवा पुरविण्यात येते ती सेवा महाग झाली तर एटीएम शुल्कात वाढ केली जाते.“ही वाढ वारंवार एटीएम वापरकर्त्यांवर भार टाकू शकते, परंतु ती बिझनेस करस्पॉन्डंट्स (बीसी) आणि डिजिटल-फर्स्ट प्लेयर्ससाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे.” असे बीएलएस ई-सर्व्हिसेसचे अध्यक्ष शिखर अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितले. “एटीएममधून पैसे काढणे महाग होत असल्याने, ग्राहक - विशेषतः ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात - मायक्रोएटीएम आणि बीसी नेटवर्ककडे वाढत्या प्रमाणात वळतील, जे व्यवहारांसाठी शुल्कमुक्त राहतात,” असे ते पुढे म्हणाले.
समारोप:
एटीएम शुल्क वाढीचा परिणाम बँकेत कॅश काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमद्धे वाढ होण्यात होतो.मोफत व्यवहार करून झाले की त्यानंतरचे व्यवहार करण्यासाठी ग्राहक बँकेकडे धावतो.स्टाफच्या संख्येच्या बाबतीत कमर्शियल विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेची संख्या सध्या दयनीय इतकी कमी आहे.ज्यांच्याकडे एटीएम कार्ड बँकेने दिले आहे,त्यांना रिजर्व बँकेने बँकेत येऊन पैसे काढण्यावर शुल्क आकारायला हवे.एटीएम कार्डच्या लिमिटच्या वर पैसे काढायला आला तर शुल्क आकारू नये.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
खूप सुंदर आनी उपयुक्त माहिती. आपले ब्लॉग मी नेहमी वाचत असतो. आपले हे सामाजिक कार्य असेच चालू राहावे ही सदिच्छा.धन्यवाद.
ReplyDeleteमुळातच एटीएम चा उद्देश हा बँकेमध्ये जाऊन कॅश व्यवहार करण्यापासून ग्राहकांना परावृत्त करण्याचा होता. पण रिझर्व बँक प्रत्यक्षात मात्र उलट वागत आहे.
ReplyDeleteआज ग्राहकांना सुशिक्षित करण्यात रिझर्व बँकेने सहभाग वाढवला पाहिजे. कारण अपुऱ्या आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावी बँका त्या सेवा देऊ शकत नाही हे उघड सत्य आहे. रिझर्व बँकेने यावर स्वतःला शक्य नसलं तर दुसरी उपाय योजना करणे गरजेचे आहे. सगळं काही बँकांवर ढकलून चालणार नाही ना