Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

रेपो दर कमी,पण बँकांचे व्याज दर?

ब्लॉग नं  2025/100.

दिनांक: 10 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

          आजचा हा शंभरावा ब्लॉग.2023 च्या 5 जानेवरीपासून मी दररोज ब्लॉग लिहायला सुरुवात केली.पण गेली 2 वर्षे मी सतत रोज एक असे शंभर ब्लॉग लिहू शकलो नव्हतो.घरांत नसणे,काही परिवारीक कार्यक्रम वगैरे होते.पण या वर्षी ते सर्व असतांना देखिल सतत 100 दिवस मी ब्लॉग लिहितो आहे.म्हणून आजचा ब्लॉग ब्लॉग मी माझं आवडतं क्षेत्र अर्थात बँकिंगवर लिहायचं ठरविलं. रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग दुसऱ्यांदा रेपो दर कमी केला आहे.पण बँका ज्यांचे व्याजाचे दर मुख्यतः रेपो दराशी निगडीत असतात,त्या याचा फायदा कर्जदारांना करून देणार आहेत कां? या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.    

सविस्तर:

रेपो रेट म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया,भारतातील बँक आणि वित्तीय संस्थांना सरकारी प्रतिभूती गहाण ठेवून घेऊन, त्याच्या तारणावर जे कर्ज देते, त्या कर्जावर आकारलेला व्याज दर. भारतातील बँकांना कर्ज कां घ्यावे लागते,असा प्रश्न तुमच्या मनांत येऊ शकतो.बँकाकडे जे डिपॉजिट गोळा होत असते,त्यातील 4.0% इतकी रक्कम कॅशच्या स्वरूपात आरबीआय कडे ठेवावी लागते.ज्याला सीआरआर म्हणतात.18% राशी ही कॅश,गोल्ड, सरकारी रोखे आणि सरकार प्राधिकृत प्रतिभूती (security) च्या स्वरूपात ठेवावी लागते, ज्यास एस एल आर म्हणतात, म्हणजे  रु 100/- जमा झाले की  त्यातील रु. 22.00 अशा प्रकारे गेले.तर कर्ज देण्यासाठी उरतात ते रु. 78.00. म्हणून दिलेले कर्ज वेळेत परत येणे गरजेचे असते.कारण depositor चे पैसे तर वेळेत परत द्यावे लागतात आणि नवीन कर्जही द्यावी लागतात. त्यामुळे बँकांना सुद्धा कर्ज घ्यावे लागते. .       

रिवर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिजर्व बँक ऑफ इंडिया जेव्हा भारतातील बँकांकडून कर्ज घेते तेव्हा जो व्याजाचा दर आकारते,तो दर म्हणजे रिवर्स रेपो रेट. जेव्हा बाजारात जास्त तरलता असते, तेव्हा आरबीआय उच्च रिव्हर्स रेपो रेट देऊन ही अतिरिक्त तरलता शोषून घेऊ शकते, ज्यामुळे बँकांना कर्ज देण्याऐवजी आरबीआयकडे निधी जमा करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.सध्या हा दर 3.35% इतका आहे.       

रेपो रेट कां वाढविला आणि कमी केला जातो?

        जेव्हा मुद्रास्फिती  inflation वाढते तेव्हा बाजारातील money supply कमी केला की लोकांची क्रयशक्ती कमी होती आणि  मुद्रास्फिती च्या दरावर त्याचा परिणाम होतो.म्हणून रेपो रेट वाढवून कर्जे महाग केली जातात. जेव्हा आरबीआय ला वाटते की अर्थव्यवस्थेत पैसा आणायला हवा, तेव्हा रेपो रेट कमी केला जातो.रेपो रेट कमी केला की कर्ज स्वस्त होतात. अतिरिक्त पैसा अर्थव्यवस्थेत येतो. लोकांची क्रयशक्ती ही वाढते.

RBI ने बुधवारी रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात करण्याची घोषणा केली, ज्यामुळे तो 6% पर्यंत खाली आला. गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) 7 एप्रिलपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

"विकसित होत असलेल्या आर्थिक परिस्थिती आणि दृष्टिकोनाचे सविस्तर मूल्यांकन केल्यानंतर, MPC ने पॉलिसी रेपो दर तात्काळ प्रभावाने 25 बेसिस पॉइंटने 6% पर्यंत कमी करण्यासाठी एकमताने मतदान केले," असे संजय मल्होत्रा ​​म्हणाले. डिसेंबर 2024 मध्ये RBI गव्हर्नर झाल्यानंतर हे त्यांचे दुसरे मोठे धोरणात्मक विधान आहे.

बहुतेक गृहकर्ज आता आरबीआयच्या रेपो रेटसारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेले असल्याने, रेपो रेटमध्ये घट झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर देखील कमी होतात. नवीन कर्जदारांसाठी, बँकांनी त्यांचे दर समायोजित केल्यास हा बदल लवकर लागू होऊ शकतो.विद्यमान कर्जदारांसाठी, फायदा त्यांच्या कर्जाच्या पुनर्संचयित कालावधीवर अवलंबून असतो, जो तिमाही किंवा दर सहा महिन्यांनी असू शकतो.

तथापि, खरी परिस्थिती ही आहे की, अनेक बँकांनी फेब्रुवारीमध्ये केलेली दर कपात अद्याप कर्जदारांना पूर्णपणे दिलेली नाही.तज्ञांचे म्हणणे आहे की या विलंबाची अनेक कारणे आहेत - निधीचा उच्च खर्च, बँकांच्या नफ्यावर दबाव, वाढती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) आणि सर्वसाधारणपणे सावध कर्ज देण्याचा दृष्टिकोन आहे.1 ऑक्टोबर 2019 पासून,आरबीआयने सर्व नवीन फ्लोटिंग रेट वैयक्तिक किंवा किरकोळ कर्जांना रेपो दरासारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडणे अनिवार्य केले. या नियमामुळे, जेव्हा रेपो दर कमी केला जातो, तेव्हा अशा कर्जांवरील कर्ज दर देखील कमी होतात, सहसा पुढील रीसेट तारखेपासून.

उदाहरणार्थ, जर गृहकर्ज थेट रेपो दराशी जोडले गेले असेल, तर आरबीआयने 25 बेसिस पॉइंट कपात केल्याने आदर्शपणे कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची घट झाली पाहिजे. याचा अर्थ मासिक हप्ता (ईएमआय) कमी होऊ शकतो किंवा कर्जदार परतफेडीच्या अटींवर अवलंबून एकूण व्याजावर बचत करू शकतो.

तथापि, या बदलाची गती आणि रक्कम बदलू शकते. रेपो दराशी जोडलेली कर्जे सहसा जलद आणि स्पष्ट बदल दर्शवतात. परंतु काही कर्जे अजूनही MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट) शी जोडलेली असतात, जी रेपो-लिंक्ड कर्जांइतक्या लवकर किंवा त्याच प्रमाणात बदलू शकत नाहीत.

समारोप:

            रिजर्व बँक ऑफ इंडिया, जेव्हा रेपो दर कमी किंवा जास्त करते तेव्हा, या रेपो दराशी लिंक असलेले व्याज दर बँकांनी कमी किंवा जास्त करावे अशी अपेक्षा असते.बँका दर वाढविण्याचे काम ताबडतोब करतात,पण दर करतांना मात्र टाळाटाळ करतात.असे रिजर्व बँक ऑफ इंडियाचे मत बनले आहे.होम लोनचा व्याज दर कमी झाल्यास त्याचा परिणाम गृह कर्जाची मागणी वाढण्यात होते.आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँक यांनी त्यांच्या कर्ज दरांमध्ये 35 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. इंडियन बँकेचा नवीन दर 8.70%, पीएनबीचा 8.85 %, बँक ऑफ इंडियाचा 8.85 % आणि युको बँकेचा दर 8.80% आहे.       

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याविषयी कमेंट बॉक्स मधे जरूर लिहा. पुढील ब्लॉग येई पर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...