Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

आपल्या परिवाराचं भविष्य सुरक्षित करा

ब्लॉग नं. 2024/282

दिनांक:- 21 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

            विमा त्यातही आयुर्विमा हे नांव ऐकलं तर लोक तुमच्यापासून दूर पळतांनाचे दिवस पाहिलेत मी. चांगले मित्र देखिल मित्र राह्यलेले नाहीत हे देखिल पाह्यले नाही.आजही परिस्थिति फारशी वेगळी आहे असं मला वाटतं नाही.पण इतक्यात मी सहज एक चेंज म्हणून पाच दिवस एक प्रसिद्ध विमा कंपनीच्या पाच दिवसांच्या वर्क शॉपला गेलो होतो. गेल्या पाच वर्षात मी 12 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या लिहिल्या. थोडी मरगळ आली होती.ती  घालवायची म्हणून जायचं ठरवलं.रोज वाघोलीहून रामवाडीला जायचं,तिथून मेट्रो पकडून आनंदनगरला जायचं,अन तिथून विमा कंपनीच्या ऑफिसला जायचं असा दिनक्रम आणि प्रवास मस्त मजेत पार पडला.यावर आहे आजचा ब्लॉग.

सविस्तर:

     आश्चर्य म्हणजे हे वर्क शॉप मला पटवून गेलं की इन्शुरन्स केवळ कारचा,हौसहोल्ड गुडसचा आणि घराचा महत्वाचा नसतो तर आयुर्विमा देखिल महत्वाचा असतो. अर्थात कोविड 2019 ही जागतिक महामारी देखिल बऱ्याच लोकांना आयुर्विम्याचे महत्व शिकवून गेली.त्या इन्शुरन्स कंपनीचा कोर्स तसा डिझाईन केला होता हे कारण नव्हतच मुळी, पण कधी कधी कुणाकुणाची समजवून सांगण्याची हातोटी इतकी जबरदस्त असते की नीरस आणि कंटाळवाणा विषय देखिल सोपा आणि मनोरंजक होऊ शकतो.

            या वर्क शॉपमध्ये आम्हाला म्हणजे माझ्या सोबत 21 जण होते.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विनीत गडकरी नांवाचे उत्कृष्ठ मार्गदर्शक होते.त्यांनी इन्शुरन्स हा विषय आमच्यासमोर छान उलगडून दाखविला.हसत खेळत त्यांनी आमच्या मनाचा ताबा घेत,जे काही मनावर गरुड केलं होतं. ते केवळ जबरदस्त एवढचं म्हणता येईल.

        आता मूळ विषयाकडे येऊ या.इतक्यात मी जे काही शिकलो,त्यातून टर्म इन्शुरन्स कां घ्यावा याचे मला झालेले आकलन मी आपल्यापुढे ठेवत आहे.

टर्म इन्शुरन्स: तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा

   आयुष्य अनिश्चित आहे, आणि या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी टर्म इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी घेतलेले जीवनविमा संरक्षण. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. विशेष म्हणजे, ही योजना तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण देणारी असते.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स ही एक शुद्ध जीवनविमा पॉलिसी आहे.जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्यांच्या नॉमिनीला निश्चित रक्कम (सम अॅश्युअर्ड) दिली जाते.जर पॉलिसीधारक ठरलेल्या कालावधीमध्ये जिवंत राहिला, तर त्याला कोणतेही परतावे मिळत नाहीत. ही योजना प्रामुख्याने कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार केली जाते.

टर्म इन्शुरन्सचे वैशिष्ट्ये:

1 कमी प्रीमियम:-

इतर जीवनविमा योजनांपेक्षा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो.

2.जास्त सम अॅश्युअर्ड:  u

कमी प्रीमियममध्ये मोठी विमा रक्कम उपलब्ध होते. उदाहरणार्थ प्रती वर्ष रु. एक लाखात एक कोटीचा विमा. (हे फक्त उदाहरणा दाखल दिले आहे,प्रत्यक्ष प्रीमियम आणि विम्याची राशी या संबंधात विमा कंपनीसही संपर्क प्रस्थापित करावा.)   

3. टॅक्स फायदे:

आयकर कलम 80C, 10 (10 D) अंतर्गत पॉलिसीधारकाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

4. अतिरिक्त पर्याय:

अॅक्सिडेंटल डेथ, क्रिटिकल इलनेस, किंवा इनकम रिप्लेसमेंटसाठी अतिरिक्त कव्हर जोडता येते.

5. टर्म इन्शुरन्स का घ्यावा?

अ. कुटुंबाची आर्थिक सुरक्षा:

तुम्ही नसल्यासही तुमच्या कुटुंबाचे जीवनमान कायम राहावे, यासाठी टर्म इन्शुरन्स उपयुक्त आहे.

ब. कर्ज आणि देणी फेडण्यासाठी मदत:

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कर्जाची जबाबदारी कुटुंबावर येऊ नये म्हणून.

क वैयक्तिक आयुष्यातील निरधास्तता:  

टर्म इन्शुरन्स घेतल्याने आयुष्य अधिक निर्धास्त आणि शांत बनते.

योग्य टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडाल?

1.       तुमच्या आर्थिक गरजा आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार करा.

2.       प्रीमियम आणि विमा रक्कमेतील संतुलन तपासा.

3.       कंपनीची विश्वासार्हता आणि क्लेम सेटलमेंट रेशो बघा.

4.       ऑनलाइन योजना खरेदी करताना सवलतींचा विचार करा.

समारोप:

            टर्म इन्शुरन्सवर मी जे शिकलो ते म्हणणे बरोबर नाही,मला जे समजलं ते मी लिहिलंय.माझे तेथील मार्गदर्शक हा ब्लॉग वाचतीलच,त्यांचा यावर अभिप्राय येईलच.वाचकांनी आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवाव,म्हणजे कुणाच्या कामी आल्याचं समाधान मिळेल.   

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.  


Comments

  1. Term insurance explained in very simple way that too with benefits … 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...