Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

आजकाल अनेक पुरुष अविवाहित रहाणे का स्वीकारतात?

ब्लॉग नं: 2025/170

दिनांक: 20 जून, 2025. 

मित्रांनो,

पूर्वी, भारतीय पुरुषांच्या आयुष्यात लग्न हा अंतिम टप्पा मानला जात असे.तो एक कर्तव्य,एक जबाबदारी, प्रौढत्वाचा एक शिक्का असे. पण आता हा प्रवास म्हणा,प्रवाह बदलत चालला आहे. विशेषतः 20 ते 30 या वयोगटातील पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहण्याचा पर्याय निवडत आहेत. हे बंडखोरीसारखे नाही तर आत्मचिंतन आणि स्व-जागरूकतेचा भाग आहे. हे प्रेमापासून पळणे नाही,तर अवास्तव अपेक्षांपासून आणि मानसिक ताणांपासून स्वत:चा बचाव करण्याचा एक प्रयत्न आहे.आजचा ब्लॉग या विषयाला समर्पित आहे.

सविस्तर:

            भारतीय पुरुषांवर अपेक्षांचे वाढलेले ओझे, गैरसमज होण्याची भीती,आर्थिक ताण, तुटत चाललेली घरे, सासू सासऱ्यांच्या सोबत तणाव आणि भावनांना मोकळे करण्यासाठी जागा नसणे या गोष्टी यामुळे पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहणे पसंत करत आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.        

1. अपेक्षांचे वजन:

भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला येताच,त्याच्यावर कर्तव्ये लादली जातात.शिक्षण,नोकरी,लग्न, आणि मुलांचा सांभाळ.मात्र, आजकालचे पुरुष हे पारंपरिक साचे तोडत आहेत.आता केवळ कुटुंब चालवणे पुरेसे नसते.त्यांना आदर्श पती,आर्थिक आधार,भावनिक साथीदार,आणि सासर आणि माहेर या दोन्ही बाजूंनी मानसिक ताण सोसावे लागतात.यामुळे अनेक पुरुष दबावाखाली येतात आणि म्हणून ते अविवाहित राहून, शांततेला अधिक पसंती देतात.

2. गैरसमज होण्याची भीती:

आजच्या लिंग-समानतेच्या युगात, पुरुषांनी भावनिकदृष्ट्या मोकळे राहावे,असुरक्षिततेवर चर्चा करावी अशी अपेक्षा केली जाते. पण असे केल्यावर अनेक वेळा त्यांची थट्टा होते किंवा त्यांना योग्य प्रकारे समजले जात नाही. यामुळे, भावनिक संघर्ष टाळण्यासाठी, काही पुरुष,प्रेम आणि नातेसंबंध टाळतात.

3. आर्थिक ताणतणाव:

भारतीय विवाहप्रथा अनेकांसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असतात.लग्नातील खर्च, हुंड्याच्या अपेक्षा,उच्च जीवनशैली आणि,नोकरीतील अस्थिरता आणि बेरोजगारीचा भार वाढतो.मध्यमवर्गीय पुरुषांना ही आर्थिक ओझे स्वीकारणे कठीण होत आहे, त्यामुळे ते अविवाहित राहण्याचा पर्याय निवडतात.

4. बालपणीच्या जखमा आणि तुटलेली घरे:

विभक्त घरांमध्ये वाढलेल्या पुरुषांनी,त्यांच्या पालकांच्या नातेसंबंधातील त्रास पाहिलेला असतो. त्यामुळे, ते स्वतःच्या भविष्यात,असेच त्रासदायक नातेसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. बालपणातील मानसिक जखमांमुळे,ते आयुष्यात शांती आणि स्थैर्य शोधतात.

5. सासू-सासऱ्यांसोबतचे तणाव:

आजच्या आधुनिक महिलांनी शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळवले असले तरी,पारंपरिक सासू-सासरे अजूनही जुन्या अपेक्षा ठेवतात.यातून पुरुषांना दोन आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, अनेक पुरुष विवाहाचे राजकारण आणि ताण टाळण्यासाठी अविवाहित राहणे पसंत करतात.

6. भावनिक अभिव्यक्तीसाठी जागांचा अभाव:

भारतीय समाज अजूनही मुलांना 'मजबूत' राहण्याचा सल्ला देतो.अश्रूंना कमजोरी मानले जाते.त्यामुळे पुरुषांना त्यांच्या भावनांना मोकळे करण्यासाठी,आवश्यक असलेल्या सुरक्षित जागा मिळत नाहीत. लग्नामुळे ही परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा असते, पण तिथेही त्यांना फक्त कामगिरी करण्याची अपेक्षा असते.

समारोप:

पुरुषांनी अविवाहित राहण्याची निवड केली आहे, ही निवड बंडखोरी नाही, तर स्वाभिमानाने घेतलेला निर्णय आहे. ही भारतीय पुरुषांच्या मानसिकतेतील आणि त्यांच्या नातेसंबंधातील बदल दर्शवते.प्रेम आणि कुटुंब नाकारण्याचा हा निर्णय नाही,तर संतुलित,न्याय्य आणि सुरक्षित आयुष्याची निवड आहे.जोपर्यंत समाज विवाहाची संकल्पना बदलत नाही आणि पुरुषांना भावनिक आधार देण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करत नाही, तोपर्यंत हे पुरुष स्वतःच्या शांतीसाठी आणि स्वाभिमानासाठी या मार्गावर चालत राहतील.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.



Comments

  1. बदलत्या सामाजिक व्यवस्थेने आणलेल्या ताणतणावामुळे

    ReplyDelete
  2. खुपच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...