Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

आजकाल अनेक पुरुष अविवाहित रहाणे का स्वीकारतात?

ब्लॉग नं: 2025/170

दिनांक: 20 जून, 2025. 

मित्रांनो,

पूर्वी, भारतीय पुरुषांच्या आयुष्यात लग्न हा अंतिम टप्पा मानला जात असे.तो एक कर्तव्य,एक जबाबदारी, प्रौढत्वाचा एक शिक्का असे. पण आता हा प्रवास म्हणा,प्रवाह बदलत चालला आहे. विशेषतः 20 ते 30 या वयोगटातील पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहण्याचा पर्याय निवडत आहेत. हे बंडखोरीसारखे नाही तर आत्मचिंतन आणि स्व-जागरूकतेचा भाग आहे. हे प्रेमापासून पळणे नाही,तर अवास्तव अपेक्षांपासून आणि मानसिक ताणांपासून स्वत:चा बचाव करण्याचा एक प्रयत्न आहे.आजचा ब्लॉग या विषयाला समर्पित आहे.

सविस्तर:

            भारतीय पुरुषांवर अपेक्षांचे वाढलेले ओझे, गैरसमज होण्याची भीती,आर्थिक ताण, तुटत चाललेली घरे, सासू सासऱ्यांच्या सोबत तणाव आणि भावनांना मोकळे करण्यासाठी जागा नसणे या गोष्टी यामुळे पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहणे पसंत करत आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.        

1. अपेक्षांचे वजन:

भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला येताच,त्याच्यावर कर्तव्ये लादली जातात.शिक्षण,नोकरी,लग्न, आणि मुलांचा सांभाळ.मात्र, आजकालचे पुरुष हे पारंपरिक साचे तोडत आहेत.आता केवळ कुटुंब चालवणे पुरेसे नसते.त्यांना आदर्श पती,आर्थिक आधार,भावनिक साथीदार,आणि सासर आणि माहेर या दोन्ही बाजूंनी मानसिक ताण सोसावे लागतात.यामुळे अनेक पुरुष दबावाखाली येतात आणि म्हणून ते अविवाहित राहून, शांततेला अधिक पसंती देतात.

2. गैरसमज होण्याची भीती:

आजच्या लिंग-समानतेच्या युगात, पुरुषांनी भावनिकदृष्ट्या मोकळे राहावे,असुरक्षिततेवर चर्चा करावी अशी अपेक्षा केली जाते. पण असे केल्यावर अनेक वेळा त्यांची थट्टा होते किंवा त्यांना योग्य प्रकारे समजले जात नाही. यामुळे, भावनिक संघर्ष टाळण्यासाठी, काही पुरुष,प्रेम आणि नातेसंबंध टाळतात.

3. आर्थिक ताणतणाव:

भारतीय विवाहप्रथा अनेकांसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असतात.लग्नातील खर्च, हुंड्याच्या अपेक्षा,उच्च जीवनशैली आणि,नोकरीतील अस्थिरता आणि बेरोजगारीचा भार वाढतो.मध्यमवर्गीय पुरुषांना ही आर्थिक ओझे स्वीकारणे कठीण होत आहे, त्यामुळे ते अविवाहित राहण्याचा पर्याय निवडतात.

4. बालपणीच्या जखमा आणि तुटलेली घरे:

विभक्त घरांमध्ये वाढलेल्या पुरुषांनी,त्यांच्या पालकांच्या नातेसंबंधातील त्रास पाहिलेला असतो. त्यामुळे, ते स्वतःच्या भविष्यात,असेच त्रासदायक नातेसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. बालपणातील मानसिक जखमांमुळे,ते आयुष्यात शांती आणि स्थैर्य शोधतात.

5. सासू-सासऱ्यांसोबतचे तणाव:

आजच्या आधुनिक महिलांनी शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळवले असले तरी,पारंपरिक सासू-सासरे अजूनही जुन्या अपेक्षा ठेवतात.यातून पुरुषांना दोन आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, अनेक पुरुष विवाहाचे राजकारण आणि ताण टाळण्यासाठी अविवाहित राहणे पसंत करतात.

6. भावनिक अभिव्यक्तीसाठी जागांचा अभाव:

भारतीय समाज अजूनही मुलांना 'मजबूत' राहण्याचा सल्ला देतो.अश्रूंना कमजोरी मानले जाते.त्यामुळे पुरुषांना त्यांच्या भावनांना मोकळे करण्यासाठी,आवश्यक असलेल्या सुरक्षित जागा मिळत नाहीत. लग्नामुळे ही परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा असते, पण तिथेही त्यांना फक्त कामगिरी करण्याची अपेक्षा असते.

समारोप:

पुरुषांनी अविवाहित राहण्याची निवड केली आहे, ही निवड बंडखोरी नाही, तर स्वाभिमानाने घेतलेला निर्णय आहे. ही भारतीय पुरुषांच्या मानसिकतेतील आणि त्यांच्या नातेसंबंधातील बदल दर्शवते.प्रेम आणि कुटुंब नाकारण्याचा हा निर्णय नाही,तर संतुलित,न्याय्य आणि सुरक्षित आयुष्याची निवड आहे.जोपर्यंत समाज विवाहाची संकल्पना बदलत नाही आणि पुरुषांना भावनिक आधार देण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करत नाही, तोपर्यंत हे पुरुष स्वतःच्या शांतीसाठी आणि स्वाभिमानासाठी या मार्गावर चालत राहतील.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.



Comments

  1. बदलत्या सामाजिक व्यवस्थेने आणलेल्या ताणतणावामुळे

    ReplyDelete
  2. खुपच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...