Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

हात पाठीमागे नेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय?

ब्लॉग सं. 2025/146.

दिनांकः 27 मे, 2025.

मित्रांनो

            तुम्ही जर हातापायांचे stretching exercises करत नसाल तर,कधी कपडे वळत घालण्यासाठी किंवा काही वारूण खाली काढण्यासाठी हात वर केला तर,लक्षात येतं की हात वर जातं नाहीये.अन मग आपण कां जात नसेल? त्याच्यासाठी काय उपाय करावेत वगैरे वगैरे विचार करू लागतो अन मग हात व्यवस्थित व्हायला आठ दहा दिवसांचा वेळ लागतोच.आज आपण आजच्या ब्लॉगमधून हे जाणून घेऊ या की, हे असं कां होतं आणि त्याची कारणे आणि उपाय.

सविस्तर:

खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे,हा अनेक व्यक्तींना जाणवणारा सामान्य आरोग्यदोष आहे, विशेषत: वयानुसार.जसे की दैनंदिन कामे, जसे ब्लाउज/बनियन किंवा टी शर्ट घालणे किंवा वस्तू उचलणे, अचानक कठीण होऊ शकते.या परिस्थितीला अनेक आरोग्यविषयक कारणे असू शकतात,ज्यामध्ये रोटेटर कफ दुखापत, गोठलेला खांदा forzen shoulder, संधिवात, बर्साइटिस, आणि टेंडिनाइटिस यांचा समावेश होतो.

रोटेटर कफ दुखापत

रोटेटर कफ हा खांद्याच्या सांध्याभोवती असलेल्या स्नायू आणि टेंडन्सचा समूह आहे, जो खांद्याच्या हालचालींसाठी आवश्यक आहे. या दुखापतीची कारणे:

·        स्नायू फाटणे किंवा नुकसान होणे.

·        वयानुसार होणारी झीज.

·        खांद्यावर अनियमित भार पडणे.

लक्षणे

·        खांद्यामध्ये वेदना आणि अशक्तपणा.

·        हात उंचावणे किंवा मागे हलवणे कठीण होणे.

गोठलेला खांदा (Frozen Shoulder)

गोठलेल्या खांद्यामध्ये मसल्स घट्ट होतात,ज्यामुळे वेदना आणि हालचालींमध्ये कडकपणा येतो.
प्रमुख कारणे

·        मधुमेह किंवा थायरॉईडसारखे चयापचय विकार.

·        दीर्घकाळ खांद्याचा निष्क्रियपणा.

इतर संभाव्य कारणे

1.       संधिवात: सांध्यामधील जळजळ आणि हाडांची झीज.

2.       बर्साइटिस: सांध्याभोवतीच्या द्रवाच्या पिशवेत जळजळ होणे.

3.       टेंडिनाइटिस: टेंडन्समध्ये सूज येणे.

उपचार आणि व्यवस्थापन

यावर उपायांसंबंधी बोलतांना तज्ञ म्हणतात,खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे म्हणजे नेहमीच गंभीर समस्या असेल असे नाही. परंतु वेदना कायम राहिल्यास किंवा हालचाली अजून कठीण झाल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार पद्धती:

1.       औषधे: वेदनाशामक औषधे आणि जळजळ कमी करणाऱ्या गोळ्या.

2.       थेरपी:

o   फिजिओथेरपी: कडकपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम.

o   उष्ण उपचार (Hot packs): सांध्यातील जळजळ कमी करणे.

3.       शस्त्रक्रिया: रोटेटर कफ फाटण्यासारख्या गंभीर अवस्थांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

प्रतिबंधक उपाय:

·        नियमित व्यायाम करून खांद्याचे स्नायू मजबूत करणे.

·        दीर्घकाळ एकाच स्थितीत काम केल्यास मधून-मधून विश्रांती घेणे.

·        संतुलित आहाराने हाडे व सांधे निरोगी ठेवणे.

समारोप:

            अशा प्रकारच्या आजारामध्ये ते लवकर लक्षांत येणे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक होऊन बसते.कारण दुर्लक्ष केल्यास हा आजार बळावू शकतो आणि त्याचा त्रास वधू शकतो. म्हणून,      सांधेदुखी किंवा खांद्याच्या कडकपणामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी,लवकरात लवकर उपचार घेऊन जीवनाचा दर्जा सुधारावा. वेळेवर उपचार आणि नियमित काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...