Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

झटपट आराम मिळवून देणाऱ्या काही टिप्स

ब्लॉग नं. 2025/119.

दिनांक: 20 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

सकाळी उठल्यापासूनच आपल्या मनात कामांची यादी सुरू होते.घरातील जबाबदाऱ्या पार पाडून ऑफिसला पोहोचेपर्यंत डोक्यात विचारांचा गोंधळ चालू असतो.ऑफिसमध्ये पोहोचल्यावर कामाचा ओघ सुरू होतो, पण त्या गडबडीत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो.दिवसभर खुर्चीत बसून सतत काम करत राहिल्याने डोळ्यांना, मान-पाठीला ताण येतो. थकवा जाणवतो आणि काम करण्याची ऊर्जा कमी होते.मात्र,यावर झटपट आराम देणाऱ्या काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला नवा उत्साह आणि उर्जा मिळेल.यावर आहे आजचा ब्लॉग.

सविस्तर:

1. डोळ्यांचा व्यायाम करा

लॅपटॉपकडे किंवा स्क्रीनकडे सतत पाहिल्याने डोळ्यांवर मोठा ताण येतो. यामुळे डोळे थकलेले वाटू शकतात. काही मिनिटं डोळ्यांचा व्यायाम करून ताजेतवाने वाटू शकते.

  • डोळ्यांची बुबुळं वर-खाली,डावीकडे-उजवीकडे आणि गोलाकार फिरवा.
  • दर दोन तासांनी डोळ्यांना काही सेकंद बंद ठेवा.
  • लांबवर बघण्याचा प्रयत्न करा;यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि ते फ्रेश वाटतात.

2. चहा-कॉफीऐवजी हेल्दी पर्याय निवडा:

काम करताना थकवा जाणवला की, आपण चहा किंवा कॉफी घेतो.काही वेळा यासोबत जंक फूडही खाल्ले जाते.मात्र, अशा सवयी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

  • चहा-कॉफीऐवजी फळं, सुके मेवे किंवा भिजवलेले मूग किंवा चणे खा.
  • हे पदार्थ शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
  • पुरेसे पाणी प्या, कारण शरीर हायड्रेट राहिल्यास ताजेतवाने वाटते.

3. श्वासोच्छवासाच्या क्रिया आणि स्ट्रेचिंग व्यायाम करा:

कामाच्या ब्रेकमध्ये थोडा वेळ काढून श्वासोच्छवासाच्या क्रिया केल्याने मानसिक शांतता मिळते.

  • खोलवर श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. यामुळे मन शांत होतं आणि ताण कमी होतो.
  • खुर्चीत बसून किंवा उभं राहून मान, पाठ आणि हातांचे स्ट्रेचिंग करा.
  • या व्यायामांमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि कामाची तयारी होते.

4. चाला किंवा हलकं फिरा:

दिवसभर खुर्चीत बसून काम केल्याने शरीरात रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे थकवा आणि ताण जाणवतो. यासाठी दर तासाला 5-10 मिनिटं चालण्याचा किंवा हलकं फिरण्याचा प्रयत्न करा.

  • ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये फेरफटका मारा.
  • टेबलवरून उभं राहून स्ट्रेचिंग करा.
  • लिफ्टऐवजी जिना वापरण्याचा प्रयत्न करा; यामुळे ऊर्जा वाढते.

5.हसण्यासाठी वेळ द्या:

ताणतणाव दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजे हसणं. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत थोड्या गप्पा मारा किंवा एखादा हलका-फुलका विनोद ऐकून मनाला आनंद द्या.

  • हसण्यामुळे शरीरात एंडॉर्फिन नावाचे 'हॅपी हार्मोन्स' स्रवत असतात, ज्यामुळे ताण कमी होतो.
  • तुमच्या आवडत्या विनोदी गोष्टी वाचा किंवा व्हिडिओ बघा.

6. कामाचे योग्य नियोजन करा:

कामाचा अतिरेकी ताण असला की मनावर आणि शरीरावर परिणाम होतो.म्हणूनच, तुमच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करा.

  • प्राधान्य असलेल्या कामांना आधी पूर्ण करा.
  • एका वेळी एकच काम करण्यावर लक्ष केंद्रित करा; मल्टीटास्किंगचा प्रयत्न कमी करा.
  • कामाचे तास ठरवून ब्रेक घ्या.

7. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा:

ऑफिसमध्ये खूप वेळ घालवल्यावर डोकं ताजं करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं हा उत्तम उपाय आहे.

  • कामाच्या ब्रेकमध्ये ऑफिसजवळच्या बागेत काही वेळ घालवा.
  • झाडांकडे पाहणं किंवा हिरवळीकडे बघणं ताण दूर करण्यात मदत करतं.

8. स्वतःसाठी प्रेरणादायी कोट्स वाचा:

ताण दूर करण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी प्रेरणादायी कोट्स वाचणे उपयुक्त ठरते.

  • ऑफिसच्या टेबलावर सकारात्मक संदेश किंवा कोट्स ठेवा.
  • रोज सकाळी एक प्रेरणादायी वाक्य वाचा, ज्यामुळे तुमचा दिवस चांगला सुरू होईल.

समारोप:

ताण हे ऑफिसमधील कामाचा अविभाज्य भाग आहे, पण तो योग्य प्रकारे हाताळणे तुमच्या हातात आहे.या साध्या टिप्स तुम्हाला ऑफिसच्या व्यस्त जीवनात ताण कमी करण्यास मदत करतील. त्यातून उत्साह, ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल. काही मिनिटं स्वतःसाठी द्या, आरोग्याला प्राधान्य द्या आणि तुमच्या दिवसाला सकारात्मक वळण द्या.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 



प्रसाद नातु,पुणे.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...