ब्लॉग नं. 2025/089.
दिनांक:- 30 मार्च, 2025.
मित्रांनो,
आपण जरी स्वीकारत नसलो तरी आपण आजारी पडत असतोच आणि आपलं मन
ही एक अशी गोष्ट आहे की,जी आपल्याला नेहमीच आजारी करून ठेवते जर तुमचे मन कमकुवत असेल
तर.कुठल्याही गोष्टीची सारखी चिंता करत राहाणं, नकारात्मक विचार बाळगणं आणि ते सर्वत्र
व्यक्त करत फिरणं, कुठल्याही गोष्टीवर सतत टिकाच करत राहणं हे देखिल सगळे आजार आहेत.पण
एक गोष्ट मात्र खरी आपण आजारी कां पडतो? त्याचं नेमकं कारण शोधायचा,आपण कधीच प्रयत्न
करत नाही.आजच्या ब्लॉग मध्ये मात्र आपण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सविस्तर:
का
होतो आजार?
आपल्याला
आजार का होतो, हा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो.
त्याचे उत्तर आश्चर्यकारकपणे सोपे आहे,आपण आजार स्वतःहून स्वीकारतो, म्हणून
! हो आपण आजार स्वीकारतो म्हणून ! आपल्यामध्ये
नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे,जी आपल्या शरीराला आजारांपासून
वाचवण्यासाठी अखंड काम करत असते. परंतु आपण आपल्या मनाच्या चुकीच्या धारणा,
अंधश्रद्धा, आणि नकारात्मक विचारांमुळे या
शक्तीला दुर्बळ करतो.
शरीराची नैसर्गिक क्षमता आणि मनाचे
महत्त्व:
आपल्या शरीरात पाण्यावर
तरंगण्याची नैसर्गिक क्षमता आहे.तरीही, माणसं पाण्यात बुडून मरतात,
कारण त्यांनी स्वतःच्या मनाला पटवले असते की, "मला पोहता येत नाही." हत्ती, साप, आणि इतर प्राणी सहजपणे पाण्यात तरंगतात. कारण त्यांना त्यांच्या क्षमतेवर
विश्वास आहे. याचप्रमाणे, आपल्या शरीरात एक नैसर्गिक
प्रतिकारशक्ती आहे, जी आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवते.
पण आपण तिला काम करायची संधीच देत नाही. लहानशा तापासाठी औषधं घेऊन आपण शरीरावर
अविश्वास दाखवतो.प्रतिकारशक्तीला काम करू द्यायचं सोडून आपण औषधोपचारांवर अवलंबून
राहतो, जे शरीरावर अतीव ताण आणते.
अज्ञात मन: आपल्या आरोग्याचा खरा
सूत्रधार:
अज्ञात मन (subconscious mind) आपल्या शरीराच्या आतल्या क्रियांवर नियंत्रण ठेवते.भिती, चिंता, आणि नकारात्मक विचार शरीरावर नकारात्मक
परिणाम करतात.
उदाहरणार्थ:
·
परीक्षेचा ताण असल्यावर पोटात गोळा येतो.
·
भीती वाटल्यावर घशाला कोरड पडते.
·
सतत आनंदी राहणारे लोक क्वचितच आजारी पडतात.
याचा अर्थ आपले विचार आणि भावनिक स्थिती
शरीराच्या कार्यावर थेट प्रभाव टाकतात.
विचारांमुळे होणारे आजार:
1. ब्लडप्रेशर
आणि हृदयविकार:
ज्यांना सतत राग येतो, जे लोक
नेहमीच रक्त खवळल्याच्या किंवा डोक्याचा स्फोट झाल्याच्या भावना व्यक्त करतात,त्यांना हृदयविकारांचा धोका जास्त असतो.त्यांचे विचार त्यांच्या
रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम करतात.
2. आतड्यांचे
विकार:
स्वतःला नकारात्मकपणे
पाहणाऱ्या किंवा स्वतःवर टीका करणाऱ्या लोकांना आतड्यांच्या विकारांचा सामना करावा
लागतो. अशा व्यक्तींमध्ये लहान आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो.
3. अपचन:
बालपणीच्या कडक
शिस्तीचा मनावर परिणाम झाल्यामुळे,काही लोक मलविसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर
नियंत्रण गमावतात. आर्थिक समस्या किंवा कंजुष वृत्ती असलेल्या लोकांमध्येही अपचन
आणि मुळव्याध समस्या जास्त आढळतात.
4. डोकेदुखी:
"त्यानं
किंवा तिनं माझं डोकं खाल्लं,यार " किंवा "माझं डोकं दुखतंय" असे
सतत बोलत राहिल्याने अज्ञात मन डोकेदुखीची सवय लावते. मायग्रेनसारखे विकार यामुळे
अधिक चिघळतात.
5. पाठदुखी
आणि कंबरदुखी:
ज्यांना जबाबदाऱ्यांचे सतत
ओझे वाटते,
अशा लोकांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होतो. हे शरीराच्या
स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे घडते.
आजारांवर उपाय: स्वयंसुचना (Autosuggestions):
औषधोपचार चालू ठेवणं
महत्त्वाचं आहे,
पण आजारांपासून पूर्ण मुक्ती हवी असेल तर अज्ञात मनावर सकारात्मक
परिणाम करणाऱ्या स्वयंसुचनांचा वापर करा.
उदाहरणार्थ डोकेदुखी दूर
करण्यासाठी तंद्रावस्थेत स्वतःला पुढील सूचना द्या:
"माझं
डोकं हलकं होत आहे. रक्त सुरळीत वाहत आहे. माझ्या डोक्यातील ताण कमी होत आहे,
आणि मला हलकं वाटत आहे." अशा स्वयंसुचना अज्ञात मनाला योग्य
संदेश पोचवतात आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची प्रक्रिया सुरू करते.
भावनांचा मुक्त प्रवाह: एक गरज:
भावनांना दडपून ठेवणं
हा रोगांचा उगम आहे. राग,
दु:ख, किंवा अस्वस्थता व्यक्त केली नाही,
तर त्या भावनांचा दाह शरीराला पोखरतो. भावनांना मुक्त करायचं असेल
तर, त्या लिहून काढा आणि नंतर त्या नष्ट करा.
समारोप:
तुम्हाला
नेहमी निरोगी जीवन व्यतीत करायचे असेल तर आरोग्यासाठी सकारात्मक जीवनशैली स्वीकारायला
हवी.तसेच शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर विश्वास ठेवा आणि मानसिक ताणतणाव दूर
ठेवा. भावनांना मुक्त होऊ द्या. आपल्या अज्ञात मनावर सकारात्मक परिणाम करायचा असेल, तर योग्य विचारांची सवय लावा. "भावना अडवल्या तर रोग येतात, आणि व्यक्त केल्या तर मोकळं वाटतं." म्हणून भावना मनांत साठवून ठेवण्याऐवजी
त्यांना मोकळं करा. यामुळे तुमचं शरीर आणि मन
तंदुरुस्त राहील आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकाल.
आजचा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याविषयी
कमेंट बॉक्स मधे जरूर लिहा. पुढील ब्लॉग येई पर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त जगा.
छान आणि मस्त ब्लॉग
ReplyDelete