Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

स्व. महेंद्र कपूर पहाडी आवाजाचा गायक

ब्लॉग नं.2025/009

दिनांक:-9 जानेवारी, 2025.

मित्रांनो,

            आज “मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरेमोती. मेरे देश की धरती.” असं अगदी ठणकावून सांगणाऱ्या बुलंद, पहाडी आवाजाच्या स्व. महेंद्र कपूर यांची जयंती.महेंद्रकपूर यांनी मराठीमध्येही अनेक गाणी गायली.ज्यातील एक म्हणजे “रात्रीस खेळ चाले, या गुढ चांदण्यांचा,संपेल ना कधी ही हा खेल सावल्यांचा.” आज त्यांच्या जयंती दिनी स्व. महेंद्र कपूर यांना ब्लॉग द्वारे शब्द सुमनांजली अर्पण करून या. 

प्रास्ताविक

            स्व. महेंद्र कपूर यांचा जन्म 9 जानेवारी, 1934 चा,त्यांचा जन्म अमृतसर मधे झाला. पार्श्वगायक म्हणून करियर घडवायचे म्हणून ते मुंबईत आले.1953 ची एक फिल्म ‘मदमस्त’ साठी “आप आये तो खयाल-ए-दिल-ए- नाशाद आया” हे त्यांच्या पदार्पणातील गाणं.पुन्हा एकदा ऐकलत तर जाणवणार देखिल नाही की हे त्यांचे पहिलं वहिलं गाणं होतं.

त्यानंतर ‘गुमराह’ मधील “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” या पहिला फिल्म फेयर पुरस्कार मिळाला.लागोपाठच्या ‘हमराज’ मधील “हे नीले गगन के तले धरती का प्यार पले” साठी दूसरा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला.त्यांना जिवनातील तिसरा फिल्म फेयर पुरस्कार ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील “और नही बस और नही,गमके प्याले और नही” या गाण्यासाठी मिळाला. 

त्यांची लोकप्रिय गाणी

            त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमद्धे “किसी पत्थर की मुरत से मोहब्बत का इरादा है”, “लाखों है यहाँ दिलवाले पर प्यार नही मिलता”, “आप आये तो खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया”, “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो”, “हे नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “ऐ प्रीत जहाँ की रीत सदा”, “संसार की हर शै का इतना ही फ़साना है,एक धुंद मे आना है, एक धुंद मे जाना है”; “मेरे देश की धरती सोना उगले”, “अबके बरस तुझे धरती की रानी”, “मांगी थी एक दुवा जो कुबूल हो गई”, “बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी”, “दिलकी यह आरजु थी कोई दिलरुबा मिले”, “तेरे प्यार का आसरा चाहता हूँ” इत्यादिचा समावेश करता येईल.तसेच मराठीतील ““रात्रीस खेळ चाले, या गुढ चांदण्यांचा,संपेल ना कधी ही हा खेल सावल्यांचा.” “आला महाराजा सोबत बैंड बाजा” आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाणी.

पुरस्कार आणि सन्मान

            महेंद्र कपूर यांना तीन फिल्म फेयर पुरस्कार मिळाले ज्यांचा मी वर उल्लेख केलेल्या आहे,त्या शिवाय भारत सरकार तर्फे त्यांना देशाचा चतुर्थ नागरी पुरस्कार “पद्मश्री”  देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठित “लता मंगेशकर पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव केला. 

मृत्यू

            27 सप्टेंबर, 2008 ला त्यांचे त्यांच्या बांद्रा स्थित निवासस्थानी निधन झाले. 

समारोप   

            महेंद्र कपूर या बुलंद,पहाडी आवाजाच्या गायकाने आपले हिन्दी चित्रपट जगतात आपले वेगळे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण केली होती.किशोरकुमार,मोहम्मद रफी आणि मुकेश या त्रिकूटांच्या जगात ते आपलली वेगळी ओळख स्थापित करण्यात यशस्वी झाले होते.त्यांना त्यांच्या 91 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातुपुणे.      

Comments

  1. त्यांच्या गायनाने खूप आनंद दिला. विनम्र अभिवादन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...