ब्लॉग नं. 2024/306
दिनांक:- 16 डिसेंबर, 2024.
मित्रांनो,
मराठीमध्ये एक म्हण आहे, “आत्याबाईला
मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.” काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना एक सवय आहे,म्हणण्यापेक्षा खोड आहे,जुन्या जुन्या
गोष्टी उकरून काढून ते असं झालं असतं तर तसं झालं नसतं,अशी विधान करून ते चर्चेत राहतात.इतक्यात
त्यांनी असेच एक विधान केले आहे,आजच्या ब्लॉगमध्ये त्यावर चर्चा करूया.
सविस्तर:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, 2014 च्या
सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल, ज्यात भाजपने सत्ता मिळवली होती,कॉंग्रेसने
UPA-2 सरकारच्या काळात, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले
असते आणि डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले असते,तर कदाचित चित्र वेगळे
असते. त्यांच्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या नवीन पुस्तकावर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत,जेव्हा कॉँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या
होत्या,त्या निवडणुकीतील काँग्रेसच्या विनाशकारी कामगिरीवर आपले मत व्यक्त करताना,अय्यर यांनी 2013 मध्ये झालेल्या पराभवाचे खापर "नो गव्हर्नन्स"
ला दिले आहे.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2012 मध्ये प्रमुख नेत्यांच्या आरोग्याच्या
समस्यांमुळे हे झाले.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2012 मध्ये कॉंग्रेसवर दोन संकटे
आली,एक म्हणजे सोनिया गांधी खूप आजारी पडल्या आणि दुसरी म्हणजे डॉ मनमोहन सिंग यांच्या
सहा बायपास सर्जरी झाल्या.त्यामुळे सरकार आणि कॉँग्रेस पक्ष दुबळा झाला.पण तेव्हा देखिल
एक व्यक्ती अशी होती,जी उर्जेने भरलेली होती, विचारांनी
परिपूर्ण होती,तिच्याकडे करिष्मा होता आणि ती पक्ष किंवा
सरकार किंवा दोन्हीही चालवू शकली असती आणि ती व्यक्ती म्हणजे प्रणव मुखर्जी होते,”
असे अय्यर पुढे म्हणाले.
"जर डॉ. मनमोहन सिंग राष्ट्रपती झाले असते आणि प्रणव मुखर्जी पंतप्रधान
झाले असते, तर मला अजूनही वाटते की आम्ही 2014 मध्ये हरलो असतो, परंतु इतक्या मोठ्या अपमानास्पद पराभवाने हरलो नसतो," असे अय्यर यांनी पीटीआयला सांगितले. डिसेंबर 1984 मध्ये 414 जागांवर
असलेला पक्ष 2014 पर्यंत 44 जागांवर घसरला होता.त्याचे कारण म्हणजे 2013 मध्ये
कोणताही कारभार होत नव्हता, प्रत्येकजण आजारातून बरा होत
होता, आमच्यावर असे अनेक आरोप लावण्यात आले होते जे कधीही
न्यायालयामध्ये स्थापित झाले नाहीत. 2G प्रकरणात, जिथे (डीएमके नेते) ए राजा आणि के कनिमोझी यांनी तिहार तुरुंगात एक वर्ष
नजरकैदेत घालवले, पण काहीही बाहेर आले नाही, ”तो पुढे म्हणाला.
अय्यर पुढे म्हणाले की मुखर्जींचा व्यापक अनुभव आणि त्यांची उर्जा सरकारला
अधिक प्रभावीपणे चालवू शकले असते आणि कमीतकमी 44 जागांवर पडणे टाळता आले असते.
“प्रणव मुखर्जी यांनी शासन केले असते तर,त्यांचा कारभार आम्हाला वाचवण्यासाठी पुरेसा
झाला नसता,पण निदान आम्ही 44 जागांपर्यंत खाली आलो नसतो; आम्ही 140
जागांपर्यन्त पोहोचलो असतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात UPA-II सरकारच्या
पडझडीचे एक ज्वलंत चित्र रेखाटले आहे,त्यांची पत्नी सुनीत
यांनी सतत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर निराशा व्यक्त केली,तो वैयक्तिक क्षण देखिल कथन
केला आहे.विरोधकांच्या आरोपांचा आम्ही प्रभावीपणे सामना करू शकलो नाही याबद्दल त्यांनी
सरकारवर टीकाही केली,आणि त्याचे त्यांनी "शासनाचा
लकवा" असे वर्णन केले. अण्णा हजारे यांच्या "इंडिया अगेन्स्ट
करप्शन" आंदोलनाची हाताळणी,चुकीच्या पद्धतीने झाल्याचे ते म्हणतात आणि
कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्याचा परिणाम देखिल UPA-II सरकारवर
झाला. "2014 ची सार्वत्रिक निवडणुक तर आम्ही अक्षरशः उपविजेते आहोत या मानसिकतेतच लढविली,"
असे अय्यर यांनी नमूद केले.
अय्यर यांनी असा युक्तिवाद केला की,प्रणवदांच्या डाव्या विचारसरणीमुळे त्यांना
पंतप्रधान बनवले असते तर व्यापारी समुदाय आणि अमेरिकन लोक नाराज झाले असते.परंतु
त्यांच्यासारखा अनुभवी नेता कुणीही नव्हता.जुगरनॉटने प्रकाशित केलेल्या
राजकारणातील मावेरीकमध्ये अय्यर यांचा राजकीय प्रवास, काँग्रेसमधील
त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते UPA-I मध्ये मंत्री
होण्यापर्यंतचा काळ आणि पक्षाच्या अधःपतनावर पडलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांचा
इतिहास आहे.
“कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर सरकारचा चेहरा
काळवंडण्यातही हातभार लावला," असे अय्यर पुढे म्हणतात. "कदाचित, यूपीए सरकारच्या निवडणुकीच्या संभाव्यतेला अण्णा हजारे यांच्या
नेतृत्वाखालील आंदोलन,आणि 'इंडिया
अगेन्स्ट' आंदोलन,चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने शिक्कामोर्तब
झाले.”अण्णा हजारे यांच्या “भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला” सुरुवातीला रामलीला
मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारणारे गृहमंत्री पी.चिदंबरम हे शेवटी त्यातच गुरफटले
गेले आणि रामलीला मैदान एका बहुचर्चित आंदोलनासाठी 'ग्राउंड
झिरो' झाले.असे अय्यर म्हणतात.
समारोप:
जरा सखोल विचार केला तर,जरी मी “आत्याबाईला
मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.” असं सुरुवातीला
लिहिलं आहे,पण मणिशंकर अय्यर यांच्या म्हणण्यात मला काही प्रमाणात तथ्य वाटतं.कारण
प्रणवदादांच्या कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.पण आता या गोष्टी बोलण्यात
काही अर्थ नाही. जरी प्रणवदादा पंतप्रधान झाले असते तर चित्र निश्चितपणे काही वेगळच
असते.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त
जगा.
प्रसाद
नातु.
Nice blog
ReplyDelete