Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

HDFC BANK चा क्रेडिट डिपॉजिट रेशो

Blog No. 2024/ 166.  

Date: 28th ,July 2024



मित्रांनो,

            कुठल्याही बँकेचा व्यवसाय हा प्रामुख्याने डिपॉजिट म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणे. ठेवीवर व्याज देणे आणि कर्जदारांकडून कर्ज उपलब्ध दिल्याबद्दल व्याज आकारणे आणि यामाध्यमातून नफा कमविणे अर्थात आस्थापनेचा आणि इतर खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम होय.या व्यवहारात क्रेडिट डिपॉजिट रेशो म्हणजे दिलेले कर्ज आणि एकूण ठेवी यांचे गुणोत्तर सांभाळले जाते.उच्च गुणोत्तर हे सूचित करू शकते की बँकेकडे अनपेक्षित निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरलता नसेल.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 75% चे प्रमाण आरामदायक मानते.म्हणजेच ठेवी रु.100/- च्या असतील आणि कर्ज रु. 75/-चे असेल तर हा रेशो 75% असतो.हे रु.25/- चे अंतर यासाठी ठेवण्यात येते,कारण कर्जाची परतफेड झाली नाही तरी डिपॉजिट ठेवीदाराने जेव्हा परत मागितले तेव्हा ते परत द्यावे लागते. HDHC बँकेचा क्रेडिट डिपॉजिट रेशो हा 104% झाला आहे. हा क्रेडिट डिपॉजिट रेशो चालतो कां? नाही.आज या विषयावर आहे माझा ब्लॉग.

सविस्तर:

जुलै २०२३ रोजी एचडीएफसी बँकेत एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण झाल्यानंतरएचडीएफसी बँकेला काही आव्हानांचा सामना करावा लागला आहे,विशेषत: क्रेडिट-ठेवी (सीडी) गुणोत्तराबाबत. विलीनीकरणामुळे बँकेच्या सीडी रेशोवर लक्षणीय परिणाम झाला आहेजो त्याच्या पोर्टफोलिओमध्ये गृहकर्जांच्या मोठ्या प्रमाणात जोडल्यामुळे वाढला आहे. विलीनीकरणापूर्वीएचडीएफसी बँकेचे सीडी प्रमाण सुमारे 86% होतेपरंतु विलीनीकरणानंतरते 104% झाले आहे.

हे असे कां झाले तर एचडीएफसी लिमिटेड हे फक्त गृह कर्ज देत होते,त्यांच्याकडे ठेवीचा पोर्टफोलिओ त्या प्रमाणात नव्हता. त्यांची सगळी कर्ज एचडीएफसीने बँक स्वतःकडे घेतलीत.त्यामुळे आधीच 86% असलेला हा रेशो आता 100% झाला.भारतात राष्ट्रीयकृत बँकेचे असे झाले असते तर केवढी मोठी बातमी झाली असती. पण ती एचडीएफसी आहे,त्यामुळे अजूनही काही हो हल्ला झाला नाही. असे सांगितले जाते की याच्यातून मार्ग काढण्यासाठी एचडीएफसी धोरणे आहेत.बँकेने आपला ठेव बेस वाढविण्यावर आणि गुणोत्तर योग्य प्रमाणावर आणण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.यासाठी अधिक रिटेल आणि कॉर्पोरेट ठेवी आकर्षित करण्यासाठी बँक तिच्या विस्तृत शाखा नेटवर्क आणि डिजिटल चॅनेलचा लाभ घेत आहे. ग्राहकांची संलग्नता वाढवणे आणि आकर्षक ठेव योजना ऑफर करणे हा या धोरणाचा एक भाग आहे. एचडीएफसी बँक विलीनीकरणानंतर आलेल्या उच्च किमतीच्या कर्जाशी संबंधित खर्चाचे व्यवस्थापन करत आहे. जेथे शक्य असेल तेथे कमी दराने पुनर्वित्त प्राप्त करून आणि एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करून हे खर्च कमी करण्याचे मार्ग ते शोधत आहेत.

असे जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करणे सोपे काम नाही. एचडीएफसी बँकेच्या एकूण ठेवी 18 लाख कोटी आहे. अगदी 90% पर्यन्त क्रेडिट डिपॉजिट रेशो आणायचा तरी रु.180,000 कोटी एवढे डिपॉजिट जमा करावे लागेल.हे सोपे काम नाही.104% क्रेडिट डिपॉजिट रेशो असतांना येणारे संभावित अडथळे.

1.        कर्जात एनपीएचे प्रमाण वाढू देऊन चालणार नाही.

2.       कर्ज देखिल मोठ्या प्रमाणात देता येणार नाही.

3.       जी गृह कर्ज एचडीएफसी लिमिटेड कडून घेतलेली आहेत. ती गृह कर्ज असल्याने जास्त व्याज म्हणजे जास्त उत्पन्न मिळवून देणारी कर्ज नाहीत.याचा कुठे तरी परिणाम नफ्यावर झाल्याशिवाय रहाणार नाही.कारण याचा समतोल घडवून आणण्यासाठी जास्त व्याजाची कर्जे मोठ्या प्रमाणावर द्यावी लागतील ते शक्य नाही.   

4.       एचडीएफसीच्या ठेवीदारांनी जर बँकेकडे मोठ्या प्रमाणावर धांव घेतली तर मुश्किल होऊ शकते.

पण असे होणार नाही.कारण एचडीएफसी एक व्यापारी बँक आहे,पण मी संभावना वर्तविल्या.

समारोप:

एचडीएफसीने आपला कॅपिटलचा बेस आढविण्याचे ठरविले आहे. तसेच एनपीए अॅसेटची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याचे ठरविले आहे. बघूया काय होतं. कारण शेअर बाजार एचडीएफसी बँकेबाबत आशावादी दिसतोय.  

        तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.     

 

 प्रसाद नातुपुणे



Comments

  1. छान माहिती दिली.

    ReplyDelete
  2. अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...